Vegetables price hike: पावसामुळे भाज्या महागल्या, किरकोळ बाजारात भाजीपाला 100 च्या पार, जाणून घ्या आजचे दर

पावसामुळे भाजीपाल्याचा तुटवडा, काही दिवस भाजीपाल्याचा उच्चांक कायम 


नवी मुंबई: राज्यात सलग तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतामधील भाजीपाला पाण्यात भिजल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.


परिणामी, एपीएमसी मार्केटमध्ये येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली (Rain Hits Vegetables Supply) आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पावसाआधी ६०० ते ७०० गाड्या मार्केटमध्ये होत्या. पण पावसानंतर बाजारात आता फक्त ४०० ते ४५० गाड्यांचीच आवक होत आहे. त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावरही (Vegetables price hike) झाला आहे.



पुढील काही दिवस भाज्या महागच


सध्या बाजारात आलेला भाजीपाला ओलसर आणि नाशवंत आहे. ग्राहकांना याचा फटका भाजीपाला दरवाढीच्या स्वरूपात बसला आहे. अनेक भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. तर काही भाज्यांनी शंभरी ओलांडली आहे. किरकोळ बाजारात शेवगा 160 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. तर गवार, शिमला मिरची, फ्लॉवर यांसारख्या भाज्यांचे दर 100 ते 130 रुपयांच्या घरात आहेत. त्यामुळे नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर काय आहेत त्यावर एक लक्ष टाकूयात.



किरकोळ बाजारातील भाजीपाला दर (प्रति किलो)



  • शेवगा 150-160 रुपये

  • शिमला मिरची 100-110 रुपये

  • फ्लॉवर 120-130 रुपये

  • गवार 120-130 रुपये

  • टोमॅटो 50-60 रुपये

  • वांगी 60-70 रुपये

  • गाजर 60-70 रुपये

  • काकडी 60-70 रुपये

  • भेंडी 80-90 रुपये

  • कार्ली 80-90 रुपये


पालेभाज्यांचे दर (प्रति जुडी):



  • कोथिंबीर 50 रुपये

  • मेथी 50 रुपये

  • पालक 50 रुपये

Comments
Add Comment

BMC APP : रस्त्यांवर खड्डे दिवसात का? करा माय बीएमसी मार्ग ऍपवर तक्रार

Mumbai : नागरिकांच्या तक्रारींचे जलद व प्रभावी निवारण करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने या वर्षी ‘MyBMC MARG’

BMC : घरकाम करणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी पालिकेचे 'अ‍ॅप' विकसित करा; महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षांची मागणी

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या महिला बचत गटातील सदस्यांना हक्काचा रोजगार

Industrial and commercial water usage : तरण तलाव, बांधकामांच्या ठिकाणच्या जलजोडण्या करणार खंडित

औद्योगिक व व्यावसायिक पाणी वापरात २० टक्के कपात मुंबई: पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १०

'उबाठा' पुन्हा फुटली; सहा खासदार शिंदेंच्या गळाला

संजय राऊत यांचाही दुजोरा; एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीत दाखल मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या तोंडावर

Commissioner Dr. Ashwini Joshi : अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नियुक्ती मुंबई  : मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची

Madhuri Vantara : 'वनतारा'च्या उपचारांनी 'माधुरी' हत्तीण झाली ठणठणीत, लवकरच कोल्हापूरला परतणार

जामनगर: गंभीर आजारपण आणि दोन्ही पायांच्या हाडांच्या दुखापतीमुळे मृत्यूच्या छायेत असलेल्या 'माधुरी' नावाच्या