प्रहार    

तपास एसआयटीकडे द्यावा, वैष्णवीच्या वडिलांची मागणी

  87

तपास एसआयटीकडे द्यावा, वैष्णवीच्या वडिलांची मागणी पुणे : वैष्णवीला ज्या दिवशी बेदम मारहाण करण्यात आली त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला, असे शवविच्छेदन अहवाल अर्थात पोस्टमॉर्टेम रिपोर्ट सांगतो. याचा अर्थ संगनमताने कट रचून वैष्णवीची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत अर्थात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडून (एसआयटी) करुन घ्यावा, अशी मागणी वैष्णवी हगवणेचे वडील अनिल कस्पटे यांनी केली आहे.

पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार ज्या दिवशी वैष्णवीने आत्महत्या केली त्या दिवशीही तिला बेदम मारहाण झाली होती. वैष्णवीच्या मृतदेहावार एकूण २९ जखमा आढळल्या. यातील १५ जखमा या मृत्यूआधीच्या २४ तासांतील असल्याचे पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये नमूद आहे. बावधन पोलिसांनी ही माहिती न्यायालयात दिली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना वैष्णवी हगवणेचे वडील अनिल कस्पटे यांनी तपास विशेष तपास पथकामार्फत अर्थात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडून (एसआयटी) करुन घ्यावा, अशी मागणी केली आहे.

शरीरारावरील जखमांबाबत पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये नमूद माहितीनुसार ज्या दिवशी वैष्णवीने आत्महत्या त्या दिवशी तिला बेदम मारहाण झाली होती. तसेच याआधीही वारंवार मारहाण होतच होती. कधी पाईप तर कधी गज वापरुन मारहाण करण्यात आली होती. वैष्णवीचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. छळ करुन वैष्णवीची हत्या करण्यात आली. या प्रकरणात विशेष तपास पथकामार्फत अर्थात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडून (एसआयटी) तपास करुन घेतला तर दोषींना शिक्षा होईल, अशी आशा वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी व्यक्त केली.
Comments
Add Comment

Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा सानियासोबत साखरपुडा संपन्न, पाहा कोण आहे अर्जुनची होणारी पत्नी

मुंबई: भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी अतिशय आनंदाचं वातावरण आहे. त्याचा मुलगा, अष्टपैलू

लालबागचा राजा मंडळाकडून अग्निशमन दल घेते दिवसाला सव्वा लाख भाडे

भाडे कमी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सार्वजनिक

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये एफ-१६ विमान पाडल्याच्या दाव्यावर अमेरिकेचे मौन

वॉशिंग्टन: भारत आणि पाकिस्तान यांच्यात ७ ते १० मे दरम्यान झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या ८८ तासांच्या संघर्षात

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, डॉक्टरचा जागीच मृत्यू!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या एका दुःखद अपघातात ३२ वर्षीय डॉक्टर प्रियांका अहिर यांचा मृत्यू झाला. ही

Stray Dog Shelter : कुत्र्यांमुळे मृत्यू झालेल्यांना परत आणणार आहात का? सुप्रीम कोर्टाने प्राणीप्रेमींना धरले फैलावर; काय आहेत कोर्टाचे कडक आदेश?

नवी दिल्ली : मुंबईत कबुतरखान्यावरून सुरू असलेला वाद थंड पडलेला नाही, तसेच दुसरीकडे दिल्ली-एनसीआरमध्ये भटक्या

मुंबई गणेशोत्सवासाठी सज्ज, चौपाटीवर विसर्जनाची तयारी!

मुंबई : गणेश चतुर्थीच्या आगमनामुळे मुंबईत जोरदार तयारी सुरू झाली आहे, विशेषतः गिरगाव चौपाटीवर, जे विसर्जनाचे एक