टॉप २मध्ये पोहोचलेल्या RCBने बिघडवला गुजरातचा खेळ, जाणून घ्या प्लेऑफमध्ये कोण कोणाविरुद्ध खेळणार

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनऊ सुपर जायंट्सला ६ विकेटनी हरवत पॉईंट्सटेबलमध्ये टॉप २मध्ये स्थान मिळवले आहे. या सामन्यासह प्लेऑफची समीकरणे स्पष्ट झाली आहेत. प्लेऑफसाठी मुंबई, आरसीबी, गुजरात आणि आरसीबी या संघांनी क्वालिफाय केले आहे.



अशी आहे पॉईंट्सटेबलची स्थिती


पॉईंट्सटेबलमध्ये १९ गुणांसह पंजाब किंग्सचा संघ अव्वल स्थानावर आहे. तर आरसीबीचा संघ १९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाबचा रनरेट चांगला असल्याने ते अव्वल आहे. तर गुजरात १८ गुणांसह तिसऱ्या आणि मुंबई १६ गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. आयपीएलमध्ये टॉप २मध्ये जागा मिळवणाऱ्या संघाला फायनलमध्ये खेळण्यासाठी २ संधी मिळतात.



प्लेऑफमध्ये कोण कोणाशी भिडणार


२९ मेला आयपीएलचा पहिला क्वालिफायर खेळवला जाईल. या दिवशी टेबलमधील टॉप २ संघ म्हणजेच पंजाब किंग्स आणि आरसीबी यांच्यात टक्कर होईल. हा सामना चंदीगडमध्ये होईल. जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये पोहोचेल. मात्र हरणाऱ्या संघाला आणखी एक संधी मिळेल.






तर ३० तारखेला तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघामध्ये सामना रंगेल. जो संघ पराभूत होईल त्यांचा प्रवास तेथेच संपेल. मात्र जिंकणाऱ्या संघाला क्वालिफायर १मध्ये पराभूत झालेल्या संघाविरुद्ध आणखी एक सामना खेळावा लागेल. हा सामना १ जूनला अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. क्वालिफायर २मधील विजेता संघ ३ जूनला फायनल खेळेल.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत