टॉप २मध्ये पोहोचलेल्या RCBने बिघडवला गुजरातचा खेळ, जाणून घ्या प्लेऑफमध्ये कोण कोणाविरुद्ध खेळणार

  91

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनऊ सुपर जायंट्सला ६ विकेटनी हरवत पॉईंट्सटेबलमध्ये टॉप २मध्ये स्थान मिळवले आहे. या सामन्यासह प्लेऑफची समीकरणे स्पष्ट झाली आहेत. प्लेऑफसाठी मुंबई, आरसीबी, गुजरात आणि आरसीबी या संघांनी क्वालिफाय केले आहे.



अशी आहे पॉईंट्सटेबलची स्थिती


पॉईंट्सटेबलमध्ये १९ गुणांसह पंजाब किंग्सचा संघ अव्वल स्थानावर आहे. तर आरसीबीचा संघ १९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाबचा रनरेट चांगला असल्याने ते अव्वल आहे. तर गुजरात १८ गुणांसह तिसऱ्या आणि मुंबई १६ गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. आयपीएलमध्ये टॉप २मध्ये जागा मिळवणाऱ्या संघाला फायनलमध्ये खेळण्यासाठी २ संधी मिळतात.



प्लेऑफमध्ये कोण कोणाशी भिडणार


२९ मेला आयपीएलचा पहिला क्वालिफायर खेळवला जाईल. या दिवशी टेबलमधील टॉप २ संघ म्हणजेच पंजाब किंग्स आणि आरसीबी यांच्यात टक्कर होईल. हा सामना चंदीगडमध्ये होईल. जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये पोहोचेल. मात्र हरणाऱ्या संघाला आणखी एक संधी मिळेल.






तर ३० तारखेला तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघामध्ये सामना रंगेल. जो संघ पराभूत होईल त्यांचा प्रवास तेथेच संपेल. मात्र जिंकणाऱ्या संघाला क्वालिफायर १मध्ये पराभूत झालेल्या संघाविरुद्ध आणखी एक सामना खेळावा लागेल. हा सामना १ जूनला अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. क्वालिफायर २मधील विजेता संघ ३ जूनला फायनल खेळेल.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल