पाकिस्तानला धडकी; रशियन युद्धनौका 'तमाल' नौदलाच्या ताफ्यात येणार

गोव्यात आणखी २ युद्धनौका बनवणार


पणजी/मुंबई : भारताची नवीनतम स्टेल्थ क्षेपणास्त्र फ्रिगेट ‘तमाल’ ही युद्धनौका आगामी जून महिन्याच्या अखेरीस रशियातील कालिनिनग्राड येथील यांतर शिपयार्ड येथे औपचारिकपणे भारतीय नौदलात समाविष्ट होणार आहे. संरक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. या बातमीने पाकिस्तानला मात्र चांगलीच धडकी भरली आहे.


यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार तमाल युद्धनौका सप्टेंबरमध्ये भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचेल आणि मुंबईतील वेस्टर्न फ्लीटचा भाग म्हणून सेवा बजावेल. ‘तमाल’ ही रशियाबरोबर करण्यात आलेल्या २.५ अब्ज डॉलर्सच्या करारातील ४ स्टेल्थ फ्रिगेट्सपैकी दुसरी नौका आहे. या करारांतर्गत २ नौका रशियातील यांतर शिपयार्डमध्ये तर उर्वरित २ नौका गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये तयार केल्या जात आहेत. यासाठी रशियाकडून तंत्रज्ञान हस्तांतरण देखील करण्यात येत आहे.



या करारातील पहिली नौका ‘आयएनएस तुशील’ गेल्या डिसेंबरमध्ये यांतर शिपयार्डमध्ये नौदलात समाविष्ट झाली होती आणि ती फेब्रुवारीत भारतात दाखल झाली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत या युद्धनौकेचे स्वागत करण्यात आले होते. त्यांनी ‘तुशील’चे वर्णन भारताच्या वाढत्या सागरी सामर्थ्याचे प्रतीक आणि भारत-रशिया मैत्रीचे दृढचिन्ह असे केले होते.


‘तमाल’ आणि ‘तुशील’ या दोन्ही Krivak III वर्गातील सुधारित फ्रिगेट्स आहेत. या ‘प्रोजेक्ट 1135.6’ अंतर्गत तयार करण्यात आल्या असून, आधीपासूनच ६ अशा फ्रिगेट्स भारतीय नौदलात कार्यरत आहेत. यातील ३ ‘तलवार’ वर्ग आणि ३ ‘तेग’ वर्ग फ्रिगेट्स आहेत. नवीन ‘तमाल’ फ्रिगेटमध्ये सुमारे २६ टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाचा समावेश आहे. यापुर्वीच्या ‘तेग’ वर्ग फ्रिगेट्सच्या तुलनेत ही टक्केवारी दुप्पट आहे.


या फ्रिगेटसाठी भारतातील ३३ कंपन्यांनी योगदान दिले आहे. यात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल), ब्रह्मोस एरोस्पेस (भारत-रशिया संयुक्त उपक्रम), आणि टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्सची उपकंपनी नोव्हा इंटिग्रेटेड सिस्टीम्स यांचा समावेश आहे.


तसेच युद्धनौकेवर आधुनिक शस्त्रास्त्रांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र, सुधारित श्रेणीची ‘श्तील’ पृष्ठभाग-विरुद्ध-हवा क्षेपणास्त्रे, मध्यम श्रेणीतील तोफा, ऑप्टिकली नियंत्रित जवळच्या अंतरावर झपाट्याने गोळीबार करणारे तोफखाने, टॉरपीडोज आणि रॉकेट्स यांचा समावेश आहे. ‘तमाल’च्या नौदलातील समावेशामुळे भारतीय महासागर क्षेत्रातील भारताची सागरी शक्ती अधिक भक्कम होणार आहे.

Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या