महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना १ जूनपासून पुस्तके मिळणार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधील इयत्ता १ली ते १०वीपर्यंच्या विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके मिळावीत यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. शिक्षण विभागाने मागणी केलेल्या पुस्तकांपैकी जवळपास ९६ टक्के पुस्तकांचा पुरवठा बालभारतीकडून मुंबई महानगरपालिकेला करण्यात आला आहे. ही सर्व पुस्तके २७ मेपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या सर्व १२ 'शहर साधन केंद्रा' पर्यंत पोहचवण्यात आली.


९वी व १०वीची पुस्तके १ जूनपासून शाळांमध्ये पोहचविण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताच पुस्तके मिळणार आहे. पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यात येतात. ही पुस्तके बालभारतीकडून मागविण्यात येतात. पालिकेच्या शिक्षण विभागाने इयत्ता १ली ते ८वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी २० लाख ८२ हजार ६६१ पुस्तके, तर इयत्ता ९वी, १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ५ लाख २० हजार ५५२ पुस्तकांची मागणी बालभारतीकडे केली.


महानगरपालिकेने मागणी केलेल्या पुस्तकांपैकी १ लाख १५ हजार १४८ पुस्तके पुढील टप्प्यात येणार आहे. यामध्ये इयत्ता १ली ते ८वी पर्यंतची १ लाख ९ हजार ११५ पुस्तके असून, इयत्ता ९वी व १०वीची ६ हजार ३३ पुस्तके आहेत. या पुस्तकांचा बालभारतीकडून पुरवठा करण्यात येणार आहे. ही पुस्तके येताच ती 'शहर साधन केंद्रां' पर्यंत पोहचविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत