रायगड जिल्ह्यात ८ जूनपर्यंत जमावबंदी

अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना


अलिबाग : रायगड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या शिफारशीनुसार आणि अपर जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार ८ जूनपर्यंत मध्यरात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.



जिल्ह्यातील खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग या औद्योगिक भागांमध्ये कामगार संघटनांकडून आंदोलन व संप पुकारले जात असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याशिवाय धार्मिक व जातीय तणावाचे प्रसंग, तसेच आगामी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती (३१ मे), किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याला झेड प्लस दर्जाची सुरक्षा महाराष्ट्र सरकारने द्यावी, तसेच इतर विविध मागण्याकरिता किल्ले रायगडच्या पायथ्याशी बेमुदत धरणे आंदोलन (३१ मे) आणि छत्रपती शिवाजी महाराज ३५२ वा राज्याभिषेक सोहळा कार्यक्रम (६ जून) यामुळे देखील अस्थिरता उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन ही अधिसुचना जारी करण्यात आली आहे.



जमावबंदी दरम्यान या गोष्टींना बंदी


जमावबंदी दरम्यान शस्त्र, लाठ्या, सुरे, तलवारी इत्यादी वस्तू बाळगणे, स्फोटक किंवा ज्वलनशील पदार्थ घेऊन फिरणे, दगडफेक किंवा क्षेपणास्त्रे बाळगणे व तयार करणे, प्रतिमा किंवा आकृत्यांचे सार्वजनिक प्रदर्शन करणे, आक्षेपार्ह घोषणा, गाणी किंवा वाद्य वाजविणे, धोकादायक भाषण, हावभाव, चित्रप्रदर्शन पाच किंवा अधिक व्यक्तींचा जमाव परवानगीशिवाय जमविणे याला मनाई असणार आहे.



आयोजित कार्यक्रम वगळले


या अधिसुचनेतून शासकीय अधिकारी, शासकीय कर्तव्यावरील कर्मचारी, तसेच शवयात्रा व अंत्यविधीसाठी जमणारा जमाव, आणि तहसीलदारांच्या परवानगीने आयोजित कार्यक्रम वगळण्यात आले आहेत. तहसिलदार किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यावरच कोणताही उत्सव, सभा, मिरवणूक आयोजित करता येणार असून, त्याची जबाबदारी आयोजकांची असणार असून, पोलीस व जिल्हा प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही

बँकेचा हप्ता न भरल्यास थेट एआय कॉल करणार

नवी दिल्ली : भारतीय बँकिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच थकीत कर्जाचे प्रमाण ०.५ टक्के किंवा त्याहूनही खाली

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता