Pune Rain: आळंदीत इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ, भक्ती सोपान पूल पाण्याखाली

पुणे: वारकरी संप्रदायांच्या महत्वाच्या स्थानांपैकी एक असलेल्या देवाची आळंदी देवस्थान आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसाने कहर केला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना आळंदी नगरपरिषदेने दिल्या आहेत.


याबाबत अधिक माहिती देताना नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले की, आळंदीत इंद्रायणीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. तसेच मावळ भागातही पावसाचा जोर कायम आहे. आळंदी आणि परिसरातही संतत धार सुरू आहे. याचा परिणाम इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढत चालली असून, पुराचे पाणी भक्ती सोपान पुलावरून वाहत आहे. तसेच इंद्रायणी काठच्या पुंडलिक मंदिरात पाणी शिरले आहे.



नागरिकांना सतर्कतेचा इशारा


आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर आणि आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी इंद्रायणी काठी पाहणी करून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. इंद्रायणी नदीकाठच्या दगडी घाटावर पाणी वाहत असल्याने कोणत्याही नागरिकांनी पाण्यात उतरू नये. तसेच स्थानिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य पुरपरिस्थितीला आळा घालण्यासाठी आणि नुकसान टाळण्यासाठी, आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी आणि वेळोवेळी परिस्थितीची सूचना देण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने ध्वनिक्षेपण देखील लावण्यात आले आहेत.



पुण्यात पावसाचा रेड अलर्ट 


पुण्यात मंगळवारीसुद्धा पावसाचा जोर कायम असणार आहे. येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडणार आहे. पुणे शहर, जिल्हा आणि घाट विभागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. पुणे जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात 29 ते 31 मे दरम्यान पुन्हा जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्यातून वर्तवण्यात आलं आहे.





Comments
Add Comment

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या