Pune Rain: आळंदीत इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ, भक्ती सोपान पूल पाण्याखाली

पुणे: वारकरी संप्रदायांच्या महत्वाच्या स्थानांपैकी एक असलेल्या देवाची आळंदी देवस्थान आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसाने कहर केला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना आळंदी नगरपरिषदेने दिल्या आहेत.


याबाबत अधिक माहिती देताना नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले की, आळंदीत इंद्रायणीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. तसेच मावळ भागातही पावसाचा जोर कायम आहे. आळंदी आणि परिसरातही संतत धार सुरू आहे. याचा परिणाम इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढत चालली असून, पुराचे पाणी भक्ती सोपान पुलावरून वाहत आहे. तसेच इंद्रायणी काठच्या पुंडलिक मंदिरात पाणी शिरले आहे.



नागरिकांना सतर्कतेचा इशारा


आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर आणि आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी इंद्रायणी काठी पाहणी करून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. इंद्रायणी नदीकाठच्या दगडी घाटावर पाणी वाहत असल्याने कोणत्याही नागरिकांनी पाण्यात उतरू नये. तसेच स्थानिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य पुरपरिस्थितीला आळा घालण्यासाठी आणि नुकसान टाळण्यासाठी, आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी आणि वेळोवेळी परिस्थितीची सूचना देण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने ध्वनिक्षेपण देखील लावण्यात आले आहेत.



पुण्यात पावसाचा रेड अलर्ट 


पुण्यात मंगळवारीसुद्धा पावसाचा जोर कायम असणार आहे. येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडणार आहे. पुणे शहर, जिल्हा आणि घाट विभागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. पुणे जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात 29 ते 31 मे दरम्यान पुन्हा जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्यातून वर्तवण्यात आलं आहे.





Comments
Add Comment

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत

Ladki Bahin Yojna : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या ४० लाख महिला अपात्रतेच्या उंबरठ्यावर?

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक