वणी ग्रामस्थांचा महावितरणबाबत तक्रारींचा पाढा, अधिका-यांना धरले धारेवर

वणी:  गेल्या दोन महिन्यांपासून विजेच्या पुरवठ्याबाबत नियमित तक्रारी व त्यामुुुळे सर्वसामान्य ग्राहकांबरोबरच पाणीपुरवठाही होत नसल्याने ग्रामपालिकाही त्रस्त झालेली. अशा परिस्थितीत सरपंच मधुकर भरसट यांनी महावितरण कंपनीचे दिंडोरी उप कार्यकारी अभियंता एस. के. राऊत यांना बोलवत ग्रामस्थांसह समस्यांचा पाढा वाचून महावितरणच्या अधिका-यांना धारेवर धरले.


यावेळी उपसरपंच विलास कड यांनी वीज बिल भरण्याची अंतिम मुदत बाकी असतानाही वीज बिल भरले नाही म्हणून वणीला पाणीपुरवठा करणारी लाईन का तोडली याबाबत जाब विचारला. ट्रान्सफार्मर पाऊस आला की लगेच ब्रेकडाऊन होतो. तसेच अंबानेर, पांडाणे, फोपशी, नांदुरी, चंडीकापुर या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असुन सदर परिसरातील फिडरची लाईट रात्रीच्या वेळी बंद करु नये अशी मागणी काहींनी केली. सरकारी दवाखान्यातील ट्रान्सफाॅर्मरवरून दवाखान्यात होणारा पुरवठाही सुरळीत नाही. गावातील वीज पुरवठा करणारे खांब व त्यावरील लाईन ५० वर्षांपेक्षा अधिक जुनी झाली आहे.


तसेच काही ठिकाणी खांबही जीर्ण झालेले आहेत. तर काही ठिकाणी झुकलेले आहेत. खांबावरील वायरी काही ठिकाणी लोंबकळत असुन त्यांना ताण देऊन त्या ओढून घ्याव्यात अशा अनेक समस्यावजा सूचना करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी उपस्थित ग्रामस्थ व ग्रा. पं. सदस्य यांच्या मार्फत काही सूचना करण्यात आल्या. यावेळी राऊत यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची कानउघडणी करत त्यांना तंबी दिली. तसेच पुढील आठ, दहा दिवसांत प्रलंबित कामे जातीने लक्ष घालून पूर्ण करून देतो असे उपस्थित ग्रामस्थांना आश्वासित केले. दिलेल्या मुदतीत प्रलंबित कामे पूर्ण करून वीज पुरवठा नियमित न केल्यास ग्रामस्थांतर्फे आंदोलन छेडले जाईल, अशी तंबी व्यापारी बँकेचे अध्यक्ष महेद्र बोरा यांनी दिली. यावेळी सहा. अभियंता महेश पवार, महेंद्र मुळकर, पी. बी. शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पारख, विजय बर्डे, जगन वाघ, मीनाताई पठाण, कैलास धुम, अनिल गांगुर्डे, नामदेव पैठणे, संतोष रेहेरे, किशोर बोरा आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments
Add Comment

मला चिंता नाही, सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा पूर्ण पाठिंबा!

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याबद्दल व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली : देशभरात भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत राज्य आणि केंद्र सरकारे प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात

अयोध्येत राम मंदिराचे काम पूर्णत्वास! मुख्य मंदिरासह सहा उपमंदिरांचेही काम पूर्ण

अयोध्या : शतकानुशतके चाललेल्या प्रतीक्षेनंतर अखेर प्रभू श्रीरामांच्या भक्तांसाठी सर्वात मोठी आनंदवार्ता आली

आपला दवाखान्यातील डॉक्टर आणि कर्मचारी यांचा पगार ठाणे महापालिका बॅंक गॅरंटीतून देणार

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आरोग्य विभागाला निर्देश ठाणे : आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड

ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर ‘कांतारा- चैप्टर 1’ या तारखेला दिसणार ओटीटीवर!

मुंबई : ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कांतारा- चैप्टर 1’ आता लवकरच ओटीटीवर येणार आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये