IPL 2025: पंजाबच्या मुंबईवरील विजयाने वाढवल्या RCBच्या अडचणी, जाणून घ्या प्लेऑफचे समीकरण

  56

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी मुंबई आणि पंजाब यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या पंजाबने मुंबईला ७ विकेटनी हरवले. या विजयासह पंजाब किंग्स पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्यांचे १९ गुण आहेत. तर मुंबईचा संघ चौथ्या स्थानावरच राहणार आहे. टॉप २मध्ये पोहोचण्याच्या आशा संपल्या आहेत. मात्र या सामन्यानंतर प्लेऑफच्या समीकरणामध्ये मोठा बदल झाला आहे.



जाणून घ्या प्लेऑफचे गणित


प्लेऑफसाठी ४ संघांनी क्वालिफाय केले आहे. पहिल्या स्थानावर १९ गुणांसह पंजाब किंग्स आहे तर दुसऱ्या स्थानावर गुजरात टायटन्स आहे. त्यांचे १४ सामन्यांत १८ गुण आहे. तिसऱ्या स्थानावर आरसीबीचा संघ आहे. त्याने १३ सामन्यांत १७ गुण आहेत तर १४ सामन्यांत मुंबईचे १६ गुण आहेत. म्हणजेच प्लेऑफसाठी क्वालिफाय केलेल्या ३ संघांनी आपापले १४ सामने खेळले आहेत. केवळ आरसीबीचा एक सामना शिल्लक आहे.



आरसीबीसाठी काय आहेत अडचणी


जर आरसीबीच्या संघाने लखनऊला हरवले तर त्यांचे १९ गुण होतील आणि ते टॉप २मध्ये येतील. तर गुजरात आणि मुंबई तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहतील आणि एलिमिनेटर खेळतील. मात्र आरसीबीने हा सामना गमावला तर ते तिसऱ्याच स्थानावर राहतील आणि एलिमिनेटर राऊंडमध्ये खेळतील. म्हणजेच आरसीबीकडे लखनऊविरुद्ध मोठी संधी आहे.


पंजाब आणि मुंबई यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबईच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद १८४ धावा केल्या होत्या. त्यानंतर पंजाबला १८५ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. याला प्रत्युत्तर देताना पंजाबच्या प्रियांश आर्य आणि जोस इंग्लीश यांनी तुफानी खेळी करताना हा सामना ७ विकेटनी जिंकला.

Comments
Add Comment

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी

बंगळूरू चेंगराचेंगरी : आरसीबीसह आणखी दोघांविरोधात एफआयआर दाखल

बंगळूरू: बंगळुरुमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर अखेर गुन्हा दाखल

श्रीलंकेचा माजी खेळाडू सचित्रा सेनानायके मॅच फिक्सिंगमध्ये दोषी

कोलंबो - श्रीलंकेचा माजी खेळाडू सचित्रा सेनानायके याला मॅच फिक्सिंगसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. २०२० मध्ये लंका