IPL 2025 : IPLच्या समारोप समारंभात 'ऑपरेशन सिंदूर'मधील हिरोंचा होणार गौरव!

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2025) साखळी फेरीतील शेवटचा आठवडा सुरू आहे. त्यानंतर प्लेऑफचे सामने आणि अखेरीस अंतिम सामना खेळवला जाणार आहे. अशातच आयपीएलचा समारोप समारंभ भारतीय सशस्त्र दलांना समर्पित केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बीसीसीआयने जाहीर केले आहे की, आगामी आयपीएल २०२५ चा समारोप समारंभात ऑपरेशन सिंदूर'च्या हिरोंचा सन्मान केला जाणार आहे.


आगामी आयपीएल २०२५ चा समारोप समारंभ हा ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. तेथेच आयपीएलचा अंतिम सामनाही खेळवला जाणार आहे. 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय सैन्याने दहशतवादी तळांविरुद्ध केलेल्या यशस्वी कारवाईचा सन्मान करण्यासाठी हा सोहळा असणार आहे.



बीसीसीआयचे (BCCI)  सचिव देवजीत सैकिया म्हणाले की, बीसीसीआयच्या वतीने आम्ही आमच्या शूर सैनिकांच्या शौर्य, धाडस आणि निःस्वार्थ सेवेला सलाम करतो. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत आपल्या सैनिकांनी दाखवलेले शौर्य देशालाही सुरक्षित ठेवते आणि आपल्या सर्वांना प्रेरणाही देते. या सन्मानार्थ, आम्ही आयपीएल २०२५चा समारोप समारंभ सैन्याला समर्पित करण्याचा आणि आमच्या सैनिकांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षा सर्वप्रथम महत्त्वाची आहे. क्रिकेट हा देशाचा आवडता खेळ आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना यामार्फत सन्मानित करणार आहोत.

Comments
Add Comment

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी

डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?

मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना