IPL 2025 : IPLच्या समारोप समारंभात 'ऑपरेशन सिंदूर'मधील हिरोंचा होणार गौरव!

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2025) साखळी फेरीतील शेवटचा आठवडा सुरू आहे. त्यानंतर प्लेऑफचे सामने आणि अखेरीस अंतिम सामना खेळवला जाणार आहे. अशातच आयपीएलचा समारोप समारंभ भारतीय सशस्त्र दलांना समर्पित केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बीसीसीआयने जाहीर केले आहे की, आगामी आयपीएल २०२५ चा समारोप समारंभात ऑपरेशन सिंदूर'च्या हिरोंचा सन्मान केला जाणार आहे.


आगामी आयपीएल २०२५ चा समारोप समारंभ हा ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. तेथेच आयपीएलचा अंतिम सामनाही खेळवला जाणार आहे. 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय सैन्याने दहशतवादी तळांविरुद्ध केलेल्या यशस्वी कारवाईचा सन्मान करण्यासाठी हा सोहळा असणार आहे.



बीसीसीआयचे (BCCI)  सचिव देवजीत सैकिया म्हणाले की, बीसीसीआयच्या वतीने आम्ही आमच्या शूर सैनिकांच्या शौर्य, धाडस आणि निःस्वार्थ सेवेला सलाम करतो. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत आपल्या सैनिकांनी दाखवलेले शौर्य देशालाही सुरक्षित ठेवते आणि आपल्या सर्वांना प्रेरणाही देते. या सन्मानार्थ, आम्ही आयपीएल २०२५चा समारोप समारंभ सैन्याला समर्पित करण्याचा आणि आमच्या सैनिकांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षा सर्वप्रथम महत्त्वाची आहे. क्रिकेट हा देशाचा आवडता खेळ आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना यामार्फत सन्मानित करणार आहोत.

Comments
Add Comment

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात

नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षा दलांचे 'कवच' तैनात!

काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट' घाटीत थरकाप उडवणारी थंडी, पण सुरक्षा यंत्रणा अलर्ट जम्मू-कश्मीर : नववर्षाच्या

सेना-नौदल-वायुसेनेची ताकद वाढणार

८० हजार कोटींच्या संरक्षण खरेदीला केंद्राची मंजुरी नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या

छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी ईडीचे छापे

रायपूर : भारतमाला प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करताना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात झालेल्या अनियमिततांच्या