Vani News: चोरट्यांच्या हल्ल्यात चार मेंढपाळ जखमी; चाैघे अटकेत

वणी:  दिंडोरी तालुक्यातील भोकरपाडा येथील मोकळ्या जागेत अज्ञात सहा लोकांनी शेळ्या आणि मेंढ्या चोरण्याच्या उद्देशाने मारहाण केली. यात चारजण जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली आहे. त्यांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.


२५ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास भोकरपाडा येथील मोकळ्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात वस्ती करून राहणाऱ्या नांदगाव तालुक्यातील मेंढपाळांवर अचानक पिकअप गाडीतून येऊन सहा जणांच्या टोळक्याने मेंढ्या चोरण्याच्या हेतूने मारहाण केली. यात दुर्योधन समाधान वाघमोडे (वय ३०), श्रावण समाधान वाघमोडे (वय ३४), बाळा समाधान वाघमोडे (वय १९), ताराबाई शांताराम शिंदे (वय २८, सर्व रा. दहेगांव ता. नांदगाव) यांच्यावर हल्ला करून जबर मारहाण करत एक शेळी व दोन मोबाईल चोरून नेले. यात चौघे जखमी झाले आहेत. यातील काहींच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात जखमा आहेत. रात्री तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. गंभीर जखमींवर डाॅ.नेहा सिंघल व आरोग्य कर्मचारी दिनेश कडवे, काशीनाथ गावित, कन्हैया शर्मा व परिचारिका शैला गावित, सविता ससाणे यांनी तातडीने उपचार केले.


या प्रकरणात पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली आहे. यात एक विधीसंघर्षित आहे. दोन आरोपी अद्याप फरार आहेत. समाधान संजय कोकाटे (वय २५), आदेश मोहन वटाणे (वय १९) व रमेश धनराज वटाणे (वय २५, सर्व रा. टिटवे ता. दिंडोरी) यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता २८मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

भारताला मोठा धक्का! प्रतीका रावल दुखापतीमुळे विश्वचषक उपांत्य फेरीतून बाहेर

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर प्रतीका रावल हिला झालेल्या दुखापतीमुळे ती

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिका, भारत-आफ्रिका आमनेसामने; दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर

मुंबई : ऑस्ट्रेलिया मालिकेचं आव्हान संपण्याआधीच टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेची तयारी करत

'ह्युमन कोकेन' हिंदी सायकॉलॉजिकल थ्रिलर लवकरच होणार रिलीज ! पुष्कर जोगचा नवा प्रयोग

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीत क्वचित पाहिलेलं, वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषा मिटवणारं जग आता पडद्यावर येणार

मुंबईहून सुटणाऱ्या लोकमान्य टिळक एक्सप्रेसचा अपघात टळला

मुंबई : उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथे एक मोठा रेल्वे अपघात टळला. मुंबईहून भागलपूरला जाणारी लोकमान्य टिळक

'जामतारा २' फेम सचिन चांदवडेची २५ व्या वर्षी आत्महत्या, 'असुरवन'च्या प्रदर्शनापूर्वीच संपवली जीवनयात्रा

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेता सचिन चांदवडे (Sachin Chandavade) याने २५ व्या

मुंबईमध्ये उभारणार आलिशान 'मरिना'! समुद्र पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई बंदर प्राधिकरणाचे महत्त्वाचे पाऊल

मुंबई: मुंबईला लाभलेल्या अथांग समुद्राचा आणि समुद्रकिनाऱ्यांचा, समुद्राशी निगडित उपक्रमांसाठी वापर