Vani News: चोरट्यांच्या हल्ल्यात चार मेंढपाळ जखमी; चाैघे अटकेत

वणी:  दिंडोरी तालुक्यातील भोकरपाडा येथील मोकळ्या जागेत अज्ञात सहा लोकांनी शेळ्या आणि मेंढ्या चोरण्याच्या उद्देशाने मारहाण केली. यात चारजण जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली आहे. त्यांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.


२५ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास भोकरपाडा येथील मोकळ्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात वस्ती करून राहणाऱ्या नांदगाव तालुक्यातील मेंढपाळांवर अचानक पिकअप गाडीतून येऊन सहा जणांच्या टोळक्याने मेंढ्या चोरण्याच्या हेतूने मारहाण केली. यात दुर्योधन समाधान वाघमोडे (वय ३०), श्रावण समाधान वाघमोडे (वय ३४), बाळा समाधान वाघमोडे (वय १९), ताराबाई शांताराम शिंदे (वय २८, सर्व रा. दहेगांव ता. नांदगाव) यांच्यावर हल्ला करून जबर मारहाण करत एक शेळी व दोन मोबाईल चोरून नेले. यात चौघे जखमी झाले आहेत. यातील काहींच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात जखमा आहेत. रात्री तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. गंभीर जखमींवर डाॅ.नेहा सिंघल व आरोग्य कर्मचारी दिनेश कडवे, काशीनाथ गावित, कन्हैया शर्मा व परिचारिका शैला गावित, सविता ससाणे यांनी तातडीने उपचार केले.


या प्रकरणात पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली आहे. यात एक विधीसंघर्षित आहे. दोन आरोपी अद्याप फरार आहेत. समाधान संजय कोकाटे (वय २५), आदेश मोहन वटाणे (वय १९) व रमेश धनराज वटाणे (वय २५, सर्व रा. टिटवे ता. दिंडोरी) यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता २८मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानातही धुरंधरची क्रेझ,बंदी असूनही टीव्हीवर झळकतोय धुरंधर २

जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा रणवीर सिंहचा 'धुरंधर २' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

लवकरच 'तुंबाडची मंजुळा' प्रेक्षकांच्या भेटीला येणार

- सिनेमाचं दुसरं पोस्टर रिलीज गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झी स्टुडिओजनं आपल्या आगामी सिनेमा 'तुंबाडची

विक्रम गोखले यांच्या शेवटच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

- निधनाच्या ३ महिन्यांनंतर विक्रम गोखले यांच्या अंतिम सिनेमाचे पोस्टर रिलीज मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज

गिरगावच्या शोभायात्रेत स्वॅग दाखवणं व्हायरल गर्लला पडलं महागात; पोलिसांसह नागरिकही संतापले

गिरगावच्या शोभायात्रेत स्वॅग दाखवणं व्हायरल गर्लला पडलं महागात; पोलिसांसह नागरिकही संतापले मुंबईतील गिरगावसह

मिठीच्या सफाईची घाई; कंत्राटदारांच्या पाया पडणार की खात्यामार्फत करणार?

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आता कंपन्याच पुढे

भारती सिंहच्या काजूला पाहिलं का?

- तीन महिन्यानंतर भारतीनं दाखवला दुसऱ्या मुलाचा चेहरा प्रसिद्ध कॉमेडी क्विन भारती सिंह हिने नुकताच तिच्या