Prince Narula : लग्नाच्या सात वर्षांनी प्रसिद्ध जोडप्याने पुन्हा केले लग्न, नोंदणी पद्धतीने केला विवाह

  75

मुंबई : सोशिअल मीडिया व टेलिव्हिजन विश्वात सर्वात प्रसिद्ध जोडपं म्हणजे प्रिन्स नरुला व त्याची पत्नी युविका चौधरी. प्रिन्स व नरुला यांनी गेल्यावर्षी चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली होती. लग्नाच्या ६ वर्षानंतर प्रिन्स व युविका यांनी १९ ऑक्टोबर रोजी मुलीला जन्म दिला. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं होतं. अशातच आता या जोडप्याबद्दल आणखी एक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे दोघांनी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे.


युविका आणि प्रिन्स यांच्या लग्नाला ७ वर्षे झाली आहेत आणि लग्नाच्या सात वर्षांनी लेकीच्या जन्मानंतर या दोघांनी पुन्हा एकदा विवाह केला आहे. दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं आहे आणि या लग्नाबद्दल युविकाने यूट्यूबवर एक व्लॉग व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. ‘माझे दुसरे लग्न’ असं शीर्षक असलेला व्लॉग व्हिडीओ तिने शेअर केला आहे, ज्यात तिने साधा अनारकली ड्रेस परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे.



लेकीच्या जन्मानंतर प्रिन्स आणि नरुला यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांच्या नात्यात काही कारणांनी आलबेल नसल्याचं म्हटलं जात होतं. शिवाय युविकाने गेल्यावर्षी २४ नोव्हेंबर रोजी प्रिन्सच्या वाढदिवसानिमित्त पोस्टही शेअर केली नव्हती. पण कालांतराने युविकाने एका मुलाखतीत असं काहीही झालं नसल्याचं सांगितलं होतं आणि त्यांच्या नात्याबद्दल स्पष्टता दिली होती.

Comments
Add Comment

गोविंदा फक्त माझाच! घटस्फोटाच्या चर्चांना सुनीता आहूजा यांनी दिला पूर्णविराम

मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा यांच्यात घटस्फोटाची

Swwapnil Joshi: मिठाईऐवजी अर्धा किलो तांदूळ आणा...घरच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्यांसाठी स्वप्नील जोशीचं आवाहन

मुंबई: आजपासून दहा दिवस राज्यभरात गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2025) धामधूम पाहायला मिळणार आहे, घराघरात आणि विविध सार्वजनिक

रणबीर-आलियाच्या नवीन घराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आलिया संतापली

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुंबईत एक नवं घर बांधत आहेत, ज्याची किंमत

गोडवा आणि तिखटपणाची मेजवानी – ‘वडापाव’ चित्रपटाचा चविष्ट टीझर प्रदर्शित!

मुंबई : मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीत वडापावचं स्थान खास आहे . वडापाव म्हटलं की जिभेला पाणी सुटतं. वडा जसा

२५० कोटींचा अलिशान बंगला तयार, रणबीर-आलिया लवकरच करणार गृहप्रवेश

मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर अखेर तयार झाले आहे. गेल्या अनेक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात