क्रेडाईमुळे नाशिकचे उत्तम ब्रँडिंग, स्थापना दिवस सोहळ्यात माजी अध्यक्षांची भावना

नाशिक: बांधकाम व्यावसायिकांची एक संस्था ते नाशिक ब्रॅन्डींग, रोजगार निर्मिती व सामाजिक भान असणारी संस्था असा प्रवास बघताना अत्यानंद होत असल्याचा सूर क्रेडाई (CREDAI) नाशिक मेट्रोच्या सर्व माजी अध्यक्षांनी काढला. निमित्त होते क्रेडाई नाशिक मेट्रोच्या ३८ व्या स्थापना दिवसाच्या सोहळ्याचे.


देशातील बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी संस्था क्रेडाई नाशिक मेट्रोचा ३८ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर म्हणाले,  सुरुवातीच्या काळात बांधकाम व्यावसायिकांना एकत्र आणणाऱ्या या संस्थेचा आवाका विविध कार्यांनी आज खूप मोठा झाला आहे. नाशिक हे आज देशपातळीवर काम करणाऱ्या क्रेडाईचे उगमस्थान असल्याचेही त्यांनी अभिमानाने नमूद केले.


गेल्या ३८ वर्षात क्रेडाईने गृहनिर्माणासोबतच शहराचे ब्रॅन्डींग, शहर विकास आराखड्यात योगदान, रेरा व युनिफाईड डीसीपीआरची अंमलबजावणी, सदस्यांसाठी नियमित प्रशिक्षण, विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतले आहेत.


कार्यक्रमामध्ये माजी अध्यक्ष रामेश्वर सारडा, जितेंद्र ठक्कर, नेमीचंद पोतदार, विजय संकलेचा, सुरेश पाटील, अनंत राजेगावकर, अविनाश शिरोडे, सुनील भायबंग, किरण चव्हाण, जयेश ठक्कर, सुनील कोतवाल, उमेश वानखेडे, रवी महाजन व कृणाल पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यासोबतच माजी अध्यक्ष कै. सदुभाऊ शुक्ल यांचे स्मरणदेखील करण्यात आले.
मानद सचिव तुषार संकलेचा म्हणाले, आजमितीला क्रेडाई नाशिक मेट्रोची सदस्यसंख्या ५०० हून अधिक असून युवा विंग, महिला विंग देखील कार्यरत आहेत. कार्यक्रमाची सुरुवात उपाध्यक्ष उदय घुगे यांच्या भाषणाने झाली. तर आभार हंसराज देशमुख यांनी मानले.

Comments
Add Comment

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक; मंत्री आदिती तटकरे

मुंबई :  रस्त्यावर राहणाऱ्या, अनाथ, एकल आणि दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ पथदर्शी योजना सहा

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

टेक-महाइम्पॅक्ट परिषदेत पहिल्याच दिवशी १५० कोटींचे करार

मुंबई : राज्याच्या तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकासाला मोठी गती देण्यासाठी ‘आयटी’ विभागाच्या वतीने बुधवारी

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत; कृषि मंत्री दत्तात्रय भरणे

द्राक्ष पिकाचा समावेश करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी