क्रेडाईमुळे नाशिकचे उत्तम ब्रँडिंग, स्थापना दिवस सोहळ्यात माजी अध्यक्षांची भावना

नाशिक: बांधकाम व्यावसायिकांची एक संस्था ते नाशिक ब्रॅन्डींग, रोजगार निर्मिती व सामाजिक भान असणारी संस्था असा प्रवास बघताना अत्यानंद होत असल्याचा सूर क्रेडाई (CREDAI) नाशिक मेट्रोच्या सर्व माजी अध्यक्षांनी काढला. निमित्त होते क्रेडाई नाशिक मेट्रोच्या ३८ व्या स्थापना दिवसाच्या सोहळ्याचे.


देशातील बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी संस्था क्रेडाई नाशिक मेट्रोचा ३८ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर म्हणाले,  सुरुवातीच्या काळात बांधकाम व्यावसायिकांना एकत्र आणणाऱ्या या संस्थेचा आवाका विविध कार्यांनी आज खूप मोठा झाला आहे. नाशिक हे आज देशपातळीवर काम करणाऱ्या क्रेडाईचे उगमस्थान असल्याचेही त्यांनी अभिमानाने नमूद केले.


गेल्या ३८ वर्षात क्रेडाईने गृहनिर्माणासोबतच शहराचे ब्रॅन्डींग, शहर विकास आराखड्यात योगदान, रेरा व युनिफाईड डीसीपीआरची अंमलबजावणी, सदस्यांसाठी नियमित प्रशिक्षण, विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतले आहेत.


कार्यक्रमामध्ये माजी अध्यक्ष रामेश्वर सारडा, जितेंद्र ठक्कर, नेमीचंद पोतदार, विजय संकलेचा, सुरेश पाटील, अनंत राजेगावकर, अविनाश शिरोडे, सुनील भायबंग, किरण चव्हाण, जयेश ठक्कर, सुनील कोतवाल, उमेश वानखेडे, रवी महाजन व कृणाल पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यासोबतच माजी अध्यक्ष कै. सदुभाऊ शुक्ल यांचे स्मरणदेखील करण्यात आले.
मानद सचिव तुषार संकलेचा म्हणाले, आजमितीला क्रेडाई नाशिक मेट्रोची सदस्यसंख्या ५०० हून अधिक असून युवा विंग, महिला विंग देखील कार्यरत आहेत. कार्यक्रमाची सुरुवात उपाध्यक्ष उदय घुगे यांच्या भाषणाने झाली. तर आभार हंसराज देशमुख यांनी मानले.

Comments
Add Comment

विपुल अमृतलाल शाह यांचा ‘द केरळा स्टोरी 2: गोज़ बियॉन्ड’ — उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि अदिती भाटिया यांच्या प्रभावी कॅरेक्टर पोस्टर्सचे अनावरण

अधिक ताकदवान, अधिक काळोख, अधिक खोल: ‘द केरळा स्टोरी 2: गोज़ बियॉन्ड’मधील प्रमुख महिला कलाकारांचे कॅरेक्टर

हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्च अखेरीस सुरू

पुणे : हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो प्रवास लवकरच मार्च अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. मेट्रो प्रकल्पाने यापूर्वी

भारतातील मलेरिया रुग्णसंख्येत लक्षणीय घट

मुंबई : मलेरिया हा आजार एकेकाळी भारतातील सार्वजनिक आरोग्यासमोरील मोठे आव्हान मानला जात होता. मात्र गेल्या दशकात

‘जा-मर’ म्हणणे जीवन संपविण्यास प्रवृत्त करणे नव्हे!

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल कोची : दोन व्यक्तीच्या भांडणादरम्यान एकाने जा आणि मर यांसारखी विधाने करणे हे

मुंबई-बडोदरा आणि भिवंडी-मनोर मार्गांचे काम युद्धपातळीवर

रस्त्यांच्या जाळ्यांमुळे विकासाची कोंडी फुटणार वसंत भोईर वाडा : गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेचा सामना

किश्तवाड जिल्ह्यातील मोबाईल, इंटरनेट सेवा बंद

नवी दिल्ली : श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात लपून बसलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा