क्रेडाईमुळे नाशिकचे उत्तम ब्रँडिंग, स्थापना दिवस सोहळ्यात माजी अध्यक्षांची भावना

नाशिक: बांधकाम व्यावसायिकांची एक संस्था ते नाशिक ब्रॅन्डींग, रोजगार निर्मिती व सामाजिक भान असणारी संस्था असा प्रवास बघताना अत्यानंद होत असल्याचा सूर क्रेडाई (CREDAI) नाशिक मेट्रोच्या सर्व माजी अध्यक्षांनी काढला. निमित्त होते क्रेडाई नाशिक मेट्रोच्या ३८ व्या स्थापना दिवसाच्या सोहळ्याचे.


देशातील बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी संस्था क्रेडाई नाशिक मेट्रोचा ३८ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर म्हणाले,  सुरुवातीच्या काळात बांधकाम व्यावसायिकांना एकत्र आणणाऱ्या या संस्थेचा आवाका विविध कार्यांनी आज खूप मोठा झाला आहे. नाशिक हे आज देशपातळीवर काम करणाऱ्या क्रेडाईचे उगमस्थान असल्याचेही त्यांनी अभिमानाने नमूद केले.


गेल्या ३८ वर्षात क्रेडाईने गृहनिर्माणासोबतच शहराचे ब्रॅन्डींग, शहर विकास आराखड्यात योगदान, रेरा व युनिफाईड डीसीपीआरची अंमलबजावणी, सदस्यांसाठी नियमित प्रशिक्षण, विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतले आहेत.


कार्यक्रमामध्ये माजी अध्यक्ष रामेश्वर सारडा, जितेंद्र ठक्कर, नेमीचंद पोतदार, विजय संकलेचा, सुरेश पाटील, अनंत राजेगावकर, अविनाश शिरोडे, सुनील भायबंग, किरण चव्हाण, जयेश ठक्कर, सुनील कोतवाल, उमेश वानखेडे, रवी महाजन व कृणाल पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यासोबतच माजी अध्यक्ष कै. सदुभाऊ शुक्ल यांचे स्मरणदेखील करण्यात आले.
मानद सचिव तुषार संकलेचा म्हणाले, आजमितीला क्रेडाई नाशिक मेट्रोची सदस्यसंख्या ५०० हून अधिक असून युवा विंग, महिला विंग देखील कार्यरत आहेत. कार्यक्रमाची सुरुवात उपाध्यक्ष उदय घुगे यांच्या भाषणाने झाली. तर आभार हंसराज देशमुख यांनी मानले.

Comments
Add Comment

राज्यभरातील व्यापाऱ्यांचा ५ डिसेंबरला लाक्षणिक बंद

पुणे (प्रतिनिधी) : राज्यभरातील व्यापारी विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ डिसेंबर २०२५ रोजी

रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ चित्रपट चर्चेत; रणवीर, माधवन, रामपाल कोणाची भूमिका साकारतायत?

मुंबई : बॉलिवूडचा ऊर्जावान अभिनेता रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट रिलिजच्या प्रतिक्षेत असून,

सायबर फसवणुकींचे नवे डावपेच: सर्वसामान्यांवर वाढता धोका त्यापासून कसे वाचाल फेडेक्सने काय म्हटले? वाचा ....

मुंबई: सायबर गुन्हे आपल्याला कल्पनाही येणार नाही, इतक्या वेगाने बदलत चालले आहेत आणि घोटाळेबाज आता अत्यंत

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

एसीएमई सोलारकडून १०० मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पातील पुढील १६ मेगावॅटचा दुसरा टप्पा सुरू

गुरुग्राम: एसीएमई सोलर होल्डिंग्ज लिमिटेडने गुजरातमधील सुरेंदरनगर येथे असलेल्या त्यांच्या १०० मेगावॅट पवन

वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी १० पट जास्त शुल्क

ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० रुपये नवी दिल्ली : केंद्र सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग