बदल्यांचे काय?

नगर जिल्ह्यात पोलीस बदल्यांचा संभ्रम; कर्मचारी व कुटुंबीय चिंतेत


अहिल्यानगर : नगर जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत सध्या मोठा संभ्रम व अस्वस्थता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रशासकीय बदल्यांची अपेक्षा होती. काही विभागांमध्ये त्या पूर्ण झाल्या असल्या तरी पोलीस विभागात मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.


जिल्ह्यात सध्या ४५० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत. अनेकांनी बदल्यांसाठी अर्ज करून पर्यायही सुचवले आहेत. मात्र, जून महिना जवळ येऊनही शाळा सुरु होण्याच्या उंबरठ्यावर असताना त्यांना अजूनही निश्चित माहिती मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये प्रचंड मानसिक तणाव आणि गोंधळाचं वातावरण आहे.नवीन बदली होणार की नाही ? झालीच तर कधी होणार? मुलांचे शिक्षण, प्रवेश प्रक्रिया, कुटुंबाचे नियोजन यावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. शाळा सुरु झाल्यानंतर जर बदली झाली, तर नवीन ठिकाणी शाळेत प्रवेश मिळेल का? हा मोठा प्रश्न कर्मचारी वर्गासमोर उभा आहे.त्याचबरोबर संलग्न बदली ही आणखी एक गंभीर बाब बनली आहे. काही कर्मचाऱ्यांना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठिकाणी बदलीचे आदेश मिळाले असले तरी संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी त्यांना कार्यमुक्त करत नाहीत.


यामागे ‘संलग्न ठेवण्याचे कारण’ दिले जाते. मात्र, हे निर्णय वरिष्ठांच्या मर्जीवर अवलंबून असल्याने अनेक पोलीस ठाण्यांमध्ये वर्षानुवर्षे तेच कर्मचारी कार्यरत आहेत, तर काहींना सतत बदल्यांचा सामना करावा लागतो.माजी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी बदल्यांसाठी प्रक्रिया सुरू केली होती. पात्र कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते. मात्र, त्यांची मुंबईला बदली झाल्यानंतर ही प्रक्रिया थांबली. आता नवीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी नुकताच पदभार स्वीकारल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्या निर्णयांकडे लागले आहे.पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी स्पष्ट आहे. बदली प्रक्रियेबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यायकारक संलग्नाच्या प्रक्रियेला थांबवावे आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांच्या गरजांचा विचार करावा. पोलीस कर्मचारी अहोरात्र जनतेची सेवा करतात, कायदा- सुव्यवस्थेसाठी जीव धोक्यात घालतात.

Comments
Add Comment

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Nitesh Rane : ओसरगाव टोलनाक्यावर 'एमएच-०७' वाहनांना टोलमाफी

 पालकमंत्री नितेश राणे यांची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; स्वतंत्र मार्गिका, व्यावसायिक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, दोन चिमुकल्यांसह चालक गंभीर

Buldhana : राज्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) पुन्हा एकदा

Forest Minister Ganesh Naik : कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशात बिबट सफारी विकसित करणार

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबाच्या धर्तीवर व्याघ्र प्रकल्प मुंबई :

Chhagan Bhujbal : शिवभोजन केंद्र चालकांना दरमहा अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक मंत्री छगन भुजबळ यांचे विधान परिषदेत आश्वासन

बंद शिवभोजन केंद्रे पुन्हा सुरू करण्यास प्राधान्य; निधीसाठी अर्थ विभागाशी चर्चा करणार मुंबई : राज्यातील

Maharashtra Monsoon 2026 : राज्यात २४ ते २७ जूनदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

मुंबई : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण