वैष्णवी आत्महत्या प्रकरण : सासू, नणंद आणि पतीला २८ मे पर्यंत पोलिस कोठडी

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेले आरोपी सासू लता हगवणे, ननंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांना पोलिसांनी पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं असून, त्यांना २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी दिलेली पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.


पोलिसांकडून हगवणे कुटुंबीयांच्या सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत. वैष्णवीच्या नावावरचं सोनं तारण ठेवून त्यातून मिळालेल्या रकमेचा वापर कुठे झाला, हे अद्याप स्पष्ट नाही.या प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबीयांमधील संबंधांचा तपास करणे गरजेचे आहे.तिन्ही आरोपींची एकत्रित चौकशी करणे आवश्यक असल्यामुळे पोलिसांनी वाढीव कोठडीची मागणी केली होती.त्यानुसार त्यांना २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


पोलिसांच्या तपासात, वैष्णवीला तिच्या सासरच्या मंडळींकडून सतत मानसिक त्रास दिला जात होता. तिला वेळोवेळी मारहाण करण्यात येत होती. कौटुंबिक कलह, हुंड्याची मागणी आणि आर्थिक कारणांमुळे हा छळ दिवसेंदिवस वाढत गेला. अखेर सहनशक्तीचा अंत होऊन वैष्णवीने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी मांडला आहे.तसेच या प्रकरणात अजूनही निलेश चव्हाण हा आरोपी फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक प्रयत्न करत आहे. त्याच्या हगवणे कुटुंबीयांशी असलेल्या संभाव्य संबंधामुळे तपास अधिक गंभीर बनला आहे.


पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, वैष्णवीच्या अंगावर तब्बल २९ मारहाणीचे व्रण आढळले असून, त्यातील ५ ते ६ जखमा आत्महत्येच्या अगदी काही तासांपूर्वी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे अत्यंत गंभीर असून, तिच्यावर सतत शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आता या प्रकरणात पुढे आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार