जामखेड-सौताडा रस्ता पूर्ण करण्यासाठी २९ पर्यंत अल्टिमेटम

  28

अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा


जामखेड : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या जामखेड सौताडा महामार्गाचे शहरातील खर्डा चौक ते बीड रोड रस्त्याचे काम रखडले आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पुर्ण रस्त्यावर चिखल झाल्याने नागरिक घसरून पडत आहे या रखडलेल्या रस्त्याचे काम येत्या दि २९ पर्यंत करण्यात यावेत अन्यथा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.


गेल्या दोन वर्षांपासून जामखेड शहारातील राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले असून या रखडलेल्या कामामुळे जामखेड शहर तालुका व पर जिल्ह्यातील येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना अतोनात हाल सहन कराव्या लागत आहेत. तसेच या रखडलेल्या कामामळे अनेक मोटारसायकल चालकांचे अपघात होऊन हात मोडणे, पाय मोडणे, अशा अनेक घटना दोन वर्षात घडल्या आहेत. तसेच जून महिन्यात सर्व शाळा विद्यालय सुरु होत आहेत. पावसाळा सुरु झाल्यामुळे रस्त्यावरती चिखलाचे साम्राज्य झाले आहे. रखडलेल्या कामामुळे व हलगर्जीपणा मुळे नागरीकांचे व शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रशासनाने तात्काळ अदांज पत्रकानुसार रस्त्याचे काम दि. २९/०५/२०२५ गुरुवार पर्यंत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असल्याचे पांडुरंग भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही