जामखेड-सौताडा रस्ता पूर्ण करण्यासाठी २९ पर्यंत अल्टिमेटम

अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा


जामखेड : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या जामखेड सौताडा महामार्गाचे शहरातील खर्डा चौक ते बीड रोड रस्त्याचे काम रखडले आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पुर्ण रस्त्यावर चिखल झाल्याने नागरिक घसरून पडत आहे या रखडलेल्या रस्त्याचे काम येत्या दि २९ पर्यंत करण्यात यावेत अन्यथा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.


गेल्या दोन वर्षांपासून जामखेड शहारातील राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले असून या रखडलेल्या कामामुळे जामखेड शहर तालुका व पर जिल्ह्यातील येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना अतोनात हाल सहन कराव्या लागत आहेत. तसेच या रखडलेल्या कामामळे अनेक मोटारसायकल चालकांचे अपघात होऊन हात मोडणे, पाय मोडणे, अशा अनेक घटना दोन वर्षात घडल्या आहेत. तसेच जून महिन्यात सर्व शाळा विद्यालय सुरु होत आहेत. पावसाळा सुरु झाल्यामुळे रस्त्यावरती चिखलाचे साम्राज्य झाले आहे. रखडलेल्या कामामुळे व हलगर्जीपणा मुळे नागरीकांचे व शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रशासनाने तात्काळ अदांज पत्रकानुसार रस्त्याचे काम दि. २९/०५/२०२५ गुरुवार पर्यंत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असल्याचे पांडुरंग भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये