मुरबाड माळशेज घाटात वाहतूक सुरळीतपणे सुरू

मुरबाड :मुरबाड माळशेज घाट राष्ट्रीय महामार्गावर माळशेज घाटात रस्त्यालगत दरड कोसळल्याची घटना घडली होती. येथे कोणत्या प्रकारची जीवितहानी घडली नाही. राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर तत्काळ दरड बाजूला करण्यात आली. त्यानंतर आता मुरबाड माळशेज घाटात सुरळीतपणे दोन्ही बाजूने वाहतूक सुरू आहे. तसेच घाटात खरा पाऊस जून महिन्यात पडत असतो; परंतु येथे मात्र मे महिन्यातच पावसाळ सुरू झाला आहे.



गुरुवारी पहाटेच्या दरम्यान दरड कोसळल्याची घटना घडली होती; परंतु घाटामध्ये राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे सतर्क कर्मचारी असल्याने दिसून येत आहे. कारण तेथे छोटे-मोठे दगड पडले तर त्यांना तत्काळ हलवण्यासाठी बांधकाम विभागाच्या वतीने जेसीबी/ ट्रॅक्टर इतर साहित्य तैनात करण्यात आले आहे; परंतु माळशेज घाटात रस्त्याचे काम चालू आहे त्यामुळे जाताना/येताना वाहनचालक, प्रवासी व मोटर सायकल स्वार यांनी आपल्या स्वतःची काळजी घेऊन घाटात प्रवास करावा असे आवाहन माळशेज घाट महामार्ग पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.