दक्षिण मुंबईला मिळणार आता हेरिटेज लूक

  21

स्ट्रीट लाईटसह दगडी पदपथासह होणार विकास


मुंबई :दक्षिण मुंबईत आल्यानंतर पूर्वीची मुंबई अनुभवता यावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने नरिमन पॉईंट, फोर्ट, मरीन ड्राईव्ह, चर्नी रोड, ग्रँट रोड, गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल परिसर, काळा घोडा व अन्य आजूबाजूच्या परिसराला हेरिटेज लूक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने कामे सुरू झाली असून येथील इमारतींना साजेसे असे पदपथ बांधले जात असून स्ट्रीट लाईट उभारल्या जात आहेत.


दक्षिण मुंबईतील मुंबई महापालिका मुख्यालयासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) व परिसरातील इमारती ब्रिटिशकालीन आहेत. अनेक इमारती १०० ते १५० वर्षे जुन्या असून आजही त्या दिमाखात उभ्या आहेत. पण गेल्या ५० वर्षांत दक्षिण मुंबई व आजूबाजूच्या परिसराचा विकास करताना, पदपथाचे जुने दगड काढून टाकण्यात आले. रस्त्यावरील स्ट्रीट लाईटही बदलण्यात आल्या. रस्ते, दुभाजक यांनीही पूर्वीचे वैभव हरवून बसले. यात मलाड दगडाचा वापर करून पुन्हा पदपथ बांधण्यासह पदपथावर दगडी लाह्या, वाहतूक बेटांचा विकास, हेरिटेज स्ट्रीट लाईट, इमारतींना साजेसे असे रंगकाम व अन्य कामे करण्यात येणार आहे. वर्षभरापूर्वी सीएसएमटी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरील रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात आले असून चर्चगेट ते चेन्नई रोड जाणाऱ्या महर्षी कर्वे रोडलगत पदपथ व हेरिटेज लूक देणाऱ्या स्ट्रीट लाईट बसवण्यात आल्या.



याच पद्धतीने दक्षिण मुंबईतील प्रत्येक रस्त्यावर हेरिटेज लूक असणाऱ्या स्ट्रीट लाईटसह दगडी पदपथ तयार करण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई शहर व उपनगरातील जुने लोखंडी बस स्टॉप व लोखंडी बसथांबे यांचेही लूक बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात १०० बस स्टॉप नावीन्यपूर्ण पद्धतीने बदलण्यात येणार आहेत. ही कामे मुंबई महापालिकासह जिल्हा नियोजन समिती निधीतून करण्यात येणार आहेत.

दक्षिण मुंबईतील फॅशनेबल कपड्यांचा बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फॅशन स्ट्रीटला हेरिटेज लूक देण्यात येणार आहे. यात हेरिटेज स्ट्रीट लाईटसह दगडी पदपथ, एकसमान स्टॉल व आजूबाजूच्या परिसराचा विकास करण्यात येणार आहे. या कामाच्या निविदा प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार असून दिवाळीपूर्वी या कामाचा शुभारंभ होईल, असे सांगण्यात
येत आहे.


Comments
Add Comment

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या

हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

आदिवासी समाजाला अतिरिक्त आरक्षण ? मुख्यमंत्र्यांना पाठवणार प्रस्ताव...

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.  आदिवासी समाजातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये