कोंझर घाटातील रस्ता खचला; महाड-रायगड मार्ग बंद

किल्ले रायगड परिसरातील गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला


संजय भुवड


महाड : महाड-रायगड रस्त्यावर कोंझर घाटातील मोठ्या धबधब्या समोरील रस्ता कालपासून कोसळत असलेल्या पावसाच्या पाण्याच्या झोतात खचून वाहून गेल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे किल्ले रायगड परिसरातील गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला असून या भागातील जनतेचे आणि पर्यटकांचे मोठे हाल झाले आहेत.


महाड तालुक्यात गेल्या २४ तासापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातून वाहणारे धबधबे मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहेत. महाड रायगड मार्गावर कोंझर घाटात असलेल्या मोठ्या धबधब्या समोर एका मोरीचे काम सुरु असून हे काम अर्धवट अवस्थेत असताना या धबधब्यातून मोठ्या प्रवाहाने पाणी वाहू लागल्याने हा रस्ता खचून वाहून गेला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.



महाड रायगड रस्त्याचे काम गेल्या चार वर्षा पासून अक्षय कस्ट्रक्शन या ठेकेदारामार्फत सुरु असून या मार्गावरील अनेक मो-या तसेच रस्त्याचे काम आजही अर्धवट अवस्थेत आहे.


दोन दिवसांपुर्वी खासदार सुनिल तटकरे यांनी लाडवली पुलाची पाहणी केल्यानंतर या पुलाचे काम दोन दिवसात सुस्थितीत करावे असे आदेश देत कामात दिरंगाई करणा-या ठेकेदाराला दिवसाला १० हजाराचा दंड ठोठावण्याचे आदेश बजावले होते. त्यानंतर अवघ्या दोन दिवसातच हा मार्ग बंद होण्याची नौबत आली असून या मार्गावर अर्धवट अवस्थेत असणा-या मो-यांच्या कामाच्या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रायगड मार्गावरील जनतेकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

कधी सुरू होणार महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ?

मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. विधिमंडळ

ही महादेवाची पवित्र भूमी, इथे 'आय लव्ह महादेव' हीच घोषणा चालेल

मीरा रोड : मीरारोड येथील जेपी नॉर्थ गार्डन सिटीमध्ये नवरात्रीच्या काळात गरबा खेळत असलेल्या महिलांवर धर्मांध

अमित शाहांचा अहिल्यानगर दौरा, रात्री बंद दाराआड मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

शिर्डी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी अमित

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी