Pune Rain: जेजुरीच्या पायऱ्यांना धबधब्याचे स्वरूप, पुण्यात पावसाची भुरभुर कायम

पुणे:  राज्यात मान्सूनने पहिल्याच दिवशी धमाकेदार एन्ट्री केली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यात देखील पावसाची भुरभुर कायम आहे. दरम्यान, जेजुरी परिसरात देखील आज सकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे जेजूरी गडाला धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे,


आज सकाळी अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.  अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबा देवस्थानच्या (Jejuri Khandoba Temple) जेजूरी गडाच्या पायऱ्यांवरून पावसाचे पाणी धो धो वाहू लागले. यामुळे भाविकांची तसेच जेजूरी गडावर असलेल्या हार विक्रेत्यांची प्रचंड धावपळ झाली.



जेजूरीच्या नऊ लाख पायऱ्यांवर मूसळधार


जेजुरी जवळच्या नाझरे धरणात काल आलेल्या टॉरनेडोनंतर अतिशय जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जेजुरी गडाच्या पायऱ्यांना धबधब्याचं रुप आलं होतं. अवघ्या काही तासात इथं ढगफुटीसारखा पाऊस झाला.  या  पावसाचा वेग हा इतका प्रचंड होता की, जेजुरीकरांनी आतापर्यंत पहिल्यांदाच पायऱ्यांवरुन असं पाणी वाहताना पाहिलं. जेजुरीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.





अनेकांच्या घरात पाणी शिरले


सलग अर्धा ते पाऊणतास झालेल्या पावसाने नाले व बंधारे तुडुंब भरले, ज्यामुळे अनेकांच्या घरात ही पाणी शिरले. मोरगाव रस्त्यालगतच्या घरात पाणी घुसल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. नगरपालिकेने ताबडतोब उपाययोजना कराव्यात अशी स्थानिकांकडून मागणी केली जात आहे.


Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे