Pune Rain: जेजुरीच्या पायऱ्यांना धबधब्याचे स्वरूप, पुण्यात पावसाची भुरभुर कायम

पुणे:  राज्यात मान्सूनने पहिल्याच दिवशी धमाकेदार एन्ट्री केली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यात देखील पावसाची भुरभुर कायम आहे. दरम्यान, जेजुरी परिसरात देखील आज सकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे जेजूरी गडाला धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे,


आज सकाळी अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.  अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबा देवस्थानच्या (Jejuri Khandoba Temple) जेजूरी गडाच्या पायऱ्यांवरून पावसाचे पाणी धो धो वाहू लागले. यामुळे भाविकांची तसेच जेजूरी गडावर असलेल्या हार विक्रेत्यांची प्रचंड धावपळ झाली.



जेजूरीच्या नऊ लाख पायऱ्यांवर मूसळधार


जेजुरी जवळच्या नाझरे धरणात काल आलेल्या टॉरनेडोनंतर अतिशय जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जेजुरी गडाच्या पायऱ्यांना धबधब्याचं रुप आलं होतं. अवघ्या काही तासात इथं ढगफुटीसारखा पाऊस झाला.  या  पावसाचा वेग हा इतका प्रचंड होता की, जेजुरीकरांनी आतापर्यंत पहिल्यांदाच पायऱ्यांवरुन असं पाणी वाहताना पाहिलं. जेजुरीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.





अनेकांच्या घरात पाणी शिरले


सलग अर्धा ते पाऊणतास झालेल्या पावसाने नाले व बंधारे तुडुंब भरले, ज्यामुळे अनेकांच्या घरात ही पाणी शिरले. मोरगाव रस्त्यालगतच्या घरात पाणी घुसल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. नगरपालिकेने ताबडतोब उपाययोजना कराव्यात अशी स्थानिकांकडून मागणी केली जात आहे.


Comments
Add Comment

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु