Pune Rain: जेजुरीच्या पायऱ्यांना धबधब्याचे स्वरूप, पुण्यात पावसाची भुरभुर कायम

  52

पुणे:  राज्यात मान्सूनने पहिल्याच दिवशी धमाकेदार एन्ट्री केली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यात देखील पावसाची भुरभुर कायम आहे. दरम्यान, जेजुरी परिसरात देखील आज सकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे जेजूरी गडाला धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे,


आज सकाळी अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.  अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबा देवस्थानच्या (Jejuri Khandoba Temple) जेजूरी गडाच्या पायऱ्यांवरून पावसाचे पाणी धो धो वाहू लागले. यामुळे भाविकांची तसेच जेजूरी गडावर असलेल्या हार विक्रेत्यांची प्रचंड धावपळ झाली.



जेजूरीच्या नऊ लाख पायऱ्यांवर मूसळधार


जेजुरी जवळच्या नाझरे धरणात काल आलेल्या टॉरनेडोनंतर अतिशय जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जेजुरी गडाच्या पायऱ्यांना धबधब्याचं रुप आलं होतं. अवघ्या काही तासात इथं ढगफुटीसारखा पाऊस झाला.  या  पावसाचा वेग हा इतका प्रचंड होता की, जेजुरीकरांनी आतापर्यंत पहिल्यांदाच पायऱ्यांवरुन असं पाणी वाहताना पाहिलं. जेजुरीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.





अनेकांच्या घरात पाणी शिरले


सलग अर्धा ते पाऊणतास झालेल्या पावसाने नाले व बंधारे तुडुंब भरले, ज्यामुळे अनेकांच्या घरात ही पाणी शिरले. मोरगाव रस्त्यालगतच्या घरात पाणी घुसल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. नगरपालिकेने ताबडतोब उपाययोजना कराव्यात अशी स्थानिकांकडून मागणी केली जात आहे.


Comments
Add Comment

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Madhuri Misal : नागरिकांना मिळणार दिलासा ! मिळकतकरासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्यसरकारकडे पाठवावा...

पुणे :  मिळकत करावर दंड आणि व्याज लावला जात असल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नागरिकांसाठी मोठा निर्णय

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांना भरवा लागणार युजर शुल्क

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार या प्रतिक्षेत गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईकर आहेत. परंतू

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

Devendra Fadanvis 'आम्ही सर्व जनतेचे सेवक', लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका...

मुंबई : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरुन अडचणीत वाढ

पंचवटीसह द्वारका परिसरात सलग पाचव्या दिवशी पाणीटंचाई

नागरिक त्रस्त : निलगिरी बाग केंद्रावर तांत्रिक बिघाड जैसे थे नाशिक : निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला