Mumbai Gutter : मान्सून दारी, झाली असेल का मुंबईची नालेसफाई ?

पावसाळा, मुंबई आणि मुंबईकरांची दैना...हे एक नातं तयार झालंय. नेहमीच पावसाळा येतो आणि नेहमीच मुंबईची तुंबई होते. मग प्रश्न निर्माण होतो तो मुंबईतल्या नालेसफाईचा. मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. त्यामुळे यंदा मुंबई महानगरपालिकेने किती नालेसफाई केली आणि मुंबईकरांना किती दिलासा मिळणार आहे पाहूया या लेखातून...



मुंबईकरांना पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसलीय. पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाई करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. ज्या परिसरात जास्त पाणी तुंबतं त्या परिसरांकडे महानगरपालिकेने विशेष लक्ष दिलंय. वरळी, दादर, धारावी, सायन, माटुंगा, हिंदमाता, मिलन सबवे यांसारख्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणीकोंडीची शक्यता असते. त्यामुळे या परिसरातील नालेसफाई आणि अन्य उपाययोजनांना महानगरपालिकेनं प्राधान्य दिलंय. मुंबईत पाणी तुंबू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने अनेक उपाय केले आहेत. यामध्ये नाल्यांमधील गाळ काढणं, हाय-कॅपॅसिटी पंप बसवणं, मिठी नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण, कचरा व्यवस्थापन सुधारणं, आणि अतिक्रमण हटवणं यांचा समावेश आहे. दीर्घकालीन उपाय म्हणून वेटलँड्स आणि स्टॉर्मवॉटर ड्रेनेज सिस्टीम सुधारणा करण्यावर भर दिलाय. मुंबईत एकूण २ हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे नाले आणि गटारे आहेत. यातील गाळ, कचरा काढण्याचं काम महानगरपालिकेकडून सुरू आहे.



नालेसफाईचं काम मे महिन्यापूर्वी पूर्ण करणे हे महानगरपालिकेसमोर मोठं आव्हान आहे. त्यातच यंदा लवकर पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. गेल्या वर्षी मे महिन्यापर्यंत ६४ टक्के नालेसफाई झाली होती. यंदाची आकडेवारी सध्या तरी उपस्थित नसली तरी मुंबईकरांना दिलासा मिळावा यासाठी महानगरपालिकेने कंबर कसलीय. अनेक नाल्यामधून गाळ काढण्यात आलाय. त्यामुळे यंदाच्या पावसात मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तरीही यंदाचा पावसाळा मुंबई महानगरपालिकेच्या नालेसफाईची पोलखोल करतो की मुंबई महानगरपालिकेचे दावे टिकतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत.

Comments
Add Comment

Eknath Shinde : आशाताईंनी स्वर समाधी घेतली! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली

चंद्र-सूर्य आहेत तोवर आशाताईंची गाणी अजरामर राहतील मुंबई : लता दीदी, आशा ताई आणि मंगेशकर कुटुंबाकडून सिने

Asha Bhosle Music Academy : मुंबईत होणार ‘आशा भोसले संगीत अकॅडमी’

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; वांद्रे-अंधेरी दरम्यान जागेचा शोध घेण्यासाठी म्हाडाला आदेश मुंबई : ज्येष्ठ

Pune Municipal Corporation : पुणे महापालिका क्षेत्रीय कार्यालय पुनर्रचनेचा सविस्तर खुलासा सादर करा

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश; सुनेत्रा पवार यांच्या पत्राची दखल, प्रभाग समित्यांच्या सत्तासंतुलनावरून पुणे

Government Recruitment : सरकारी भरती प्रक्रियेत मोठे बदल

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; रिक्त पदे भरण्यासाठी 'यूपीएससी'च्या धर्तीवर नवा आराखडा मुंबई : ‘विकसित महाराष्ट्र

Kalyan-Ahilyanagar Highway Accident : कल्याण अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार तर एक गंभीर जखमी

कल्याण-अहिल्यानगर (Kalyan-Ahilyanagar Highway Accident) महामार्गावर आज म्हणजेच सोमवार १३ एप्रिल रोजी अत्यंत भीषण अपघात घडला. या अपघातात

उबाठा आमदार पुत्राचे संस्कार, माजी उपमहापौरांना बसवले मागच्या रांगेत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेत उबाठाचे आमदार सुनील प्रभू यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्तांसोबत