Mumbai Gutter : मान्सून दारी, झाली असेल का मुंबईची नालेसफाई ?

पावसाळा, मुंबई आणि मुंबईकरांची दैना...हे एक नातं तयार झालंय. नेहमीच पावसाळा येतो आणि नेहमीच मुंबईची तुंबई होते. मग प्रश्न निर्माण होतो तो मुंबईतल्या नालेसफाईचा. मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. त्यामुळे यंदा मुंबई महानगरपालिकेने किती नालेसफाई केली आणि मुंबईकरांना किती दिलासा मिळणार आहे पाहूया या लेखातून...



मुंबईकरांना पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसलीय. पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाई करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. ज्या परिसरात जास्त पाणी तुंबतं त्या परिसरांकडे महानगरपालिकेने विशेष लक्ष दिलंय. वरळी, दादर, धारावी, सायन, माटुंगा, हिंदमाता, मिलन सबवे यांसारख्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणीकोंडीची शक्यता असते. त्यामुळे या परिसरातील नालेसफाई आणि अन्य उपाययोजनांना महानगरपालिकेनं प्राधान्य दिलंय. मुंबईत पाणी तुंबू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने अनेक उपाय केले आहेत. यामध्ये नाल्यांमधील गाळ काढणं, हाय-कॅपॅसिटी पंप बसवणं, मिठी नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण, कचरा व्यवस्थापन सुधारणं, आणि अतिक्रमण हटवणं यांचा समावेश आहे. दीर्घकालीन उपाय म्हणून वेटलँड्स आणि स्टॉर्मवॉटर ड्रेनेज सिस्टीम सुधारणा करण्यावर भर दिलाय. मुंबईत एकूण २ हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे नाले आणि गटारे आहेत. यातील गाळ, कचरा काढण्याचं काम महानगरपालिकेकडून सुरू आहे.



नालेसफाईचं काम मे महिन्यापूर्वी पूर्ण करणे हे महानगरपालिकेसमोर मोठं आव्हान आहे. त्यातच यंदा लवकर पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. गेल्या वर्षी मे महिन्यापर्यंत ६४ टक्के नालेसफाई झाली होती. यंदाची आकडेवारी सध्या तरी उपस्थित नसली तरी मुंबईकरांना दिलासा मिळावा यासाठी महानगरपालिकेने कंबर कसलीय. अनेक नाल्यामधून गाळ काढण्यात आलाय. त्यामुळे यंदाच्या पावसात मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तरीही यंदाचा पावसाळा मुंबई महानगरपालिकेच्या नालेसफाईची पोलखोल करतो की मुंबई महानगरपालिकेचे दावे टिकतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत.

Comments
Add Comment

पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ

मुंबई : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत

लोकलच्या दारात उभे राहणे म्हणजे निष्काळजीपणा नव्हे; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई : स्वप्नांची दुनिया आणि मायानगरी असलेल्या मुंबईत प्रत्येक जण आपली स्वप्न पूर्ण करायला येत असतो. आणि बघता

आयआयटी बॉम्बेकडून भारतासाठी ‘स्वदेशी एआय’ची तयारी

भारतीय भाषांसाठी नव्या तंत्रज्ञान युगाची सुरुवात मुंबई : देशातील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल

भोसरी भूखंड घोटाळ्यात एकनाथ खडसे यांना दणका

दोषमुक्तीबाबतचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला मुंबई : एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री असताना आपल्या पदाचा

कस्तुरबा रुग्णालयातील बर्न्स केअर कक्षाची होणार सुधारणा

आयसीयूसह सर्वसाधारण खाटांची जागा सुसज्ज मुंबई : संसर्गजन्य रोगाच्या आजारांसाठी असलेल्या कस्तुरबा

जुनी शालेय इमारत पाडताना पोर्टेबल पर्यायी शाळा आसपासच सुरु करणार

पुनर्विकास करण्यात येणाऱ्या शालेय इमारतींसाठी महापालिकेने उचलले असे पाऊल मुंबई : माहिममधील महापालिका शाळा