Mumbai Gutter : मान्सून दारी, झाली असेल का मुंबईची नालेसफाई ?

पावसाळा, मुंबई आणि मुंबईकरांची दैना...हे एक नातं तयार झालंय. नेहमीच पावसाळा येतो आणि नेहमीच मुंबईची तुंबई होते. मग प्रश्न निर्माण होतो तो मुंबईतल्या नालेसफाईचा. मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. त्यामुळे यंदा मुंबई महानगरपालिकेने किती नालेसफाई केली आणि मुंबईकरांना किती दिलासा मिळणार आहे पाहूया या लेखातून...



मुंबईकरांना पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसलीय. पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाई करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. ज्या परिसरात जास्त पाणी तुंबतं त्या परिसरांकडे महानगरपालिकेने विशेष लक्ष दिलंय. वरळी, दादर, धारावी, सायन, माटुंगा, हिंदमाता, मिलन सबवे यांसारख्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणीकोंडीची शक्यता असते. त्यामुळे या परिसरातील नालेसफाई आणि अन्य उपाययोजनांना महानगरपालिकेनं प्राधान्य दिलंय. मुंबईत पाणी तुंबू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने अनेक उपाय केले आहेत. यामध्ये नाल्यांमधील गाळ काढणं, हाय-कॅपॅसिटी पंप बसवणं, मिठी नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण, कचरा व्यवस्थापन सुधारणं, आणि अतिक्रमण हटवणं यांचा समावेश आहे. दीर्घकालीन उपाय म्हणून वेटलँड्स आणि स्टॉर्मवॉटर ड्रेनेज सिस्टीम सुधारणा करण्यावर भर दिलाय. मुंबईत एकूण २ हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे नाले आणि गटारे आहेत. यातील गाळ, कचरा काढण्याचं काम महानगरपालिकेकडून सुरू आहे.



नालेसफाईचं काम मे महिन्यापूर्वी पूर्ण करणे हे महानगरपालिकेसमोर मोठं आव्हान आहे. त्यातच यंदा लवकर पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. गेल्या वर्षी मे महिन्यापर्यंत ६४ टक्के नालेसफाई झाली होती. यंदाची आकडेवारी सध्या तरी उपस्थित नसली तरी मुंबईकरांना दिलासा मिळावा यासाठी महानगरपालिकेने कंबर कसलीय. अनेक नाल्यामधून गाळ काढण्यात आलाय. त्यामुळे यंदाच्या पावसात मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तरीही यंदाचा पावसाळा मुंबई महानगरपालिकेच्या नालेसफाईची पोलखोल करतो की मुंबई महानगरपालिकेचे दावे टिकतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत.

Comments
Add Comment

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदा मुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे

मुंबईत २०० पेक्षा वायू गुणवत्ता निर्देशांक असल्यास उद्योग आणि बांधकामे बंद करा

महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.