Mumbai Gutter : मान्सून दारी, झाली असेल का मुंबईची नालेसफाई ?

  64

पावसाळा, मुंबई आणि मुंबईकरांची दैना...हे एक नातं तयार झालंय. नेहमीच पावसाळा येतो आणि नेहमीच मुंबईची तुंबई होते. मग प्रश्न निर्माण होतो तो मुंबईतल्या नालेसफाईचा. मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. त्यामुळे यंदा मुंबई महानगरपालिकेने किती नालेसफाई केली आणि मुंबईकरांना किती दिलासा मिळणार आहे पाहूया या लेखातून...



मुंबईकरांना पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसलीय. पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाई करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. ज्या परिसरात जास्त पाणी तुंबतं त्या परिसरांकडे महानगरपालिकेने विशेष लक्ष दिलंय. वरळी, दादर, धारावी, सायन, माटुंगा, हिंदमाता, मिलन सबवे यांसारख्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणीकोंडीची शक्यता असते. त्यामुळे या परिसरातील नालेसफाई आणि अन्य उपाययोजनांना महानगरपालिकेनं प्राधान्य दिलंय. मुंबईत पाणी तुंबू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने अनेक उपाय केले आहेत. यामध्ये नाल्यांमधील गाळ काढणं, हाय-कॅपॅसिटी पंप बसवणं, मिठी नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण, कचरा व्यवस्थापन सुधारणं, आणि अतिक्रमण हटवणं यांचा समावेश आहे. दीर्घकालीन उपाय म्हणून वेटलँड्स आणि स्टॉर्मवॉटर ड्रेनेज सिस्टीम सुधारणा करण्यावर भर दिलाय. मुंबईत एकूण २ हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे नाले आणि गटारे आहेत. यातील गाळ, कचरा काढण्याचं काम महानगरपालिकेकडून सुरू आहे.



नालेसफाईचं काम मे महिन्यापूर्वी पूर्ण करणे हे महानगरपालिकेसमोर मोठं आव्हान आहे. त्यातच यंदा लवकर पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. गेल्या वर्षी मे महिन्यापर्यंत ६४ टक्के नालेसफाई झाली होती. यंदाची आकडेवारी सध्या तरी उपस्थित नसली तरी मुंबईकरांना दिलासा मिळावा यासाठी महानगरपालिकेने कंबर कसलीय. अनेक नाल्यामधून गाळ काढण्यात आलाय. त्यामुळे यंदाच्या पावसात मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तरीही यंदाचा पावसाळा मुंबई महानगरपालिकेच्या नालेसफाईची पोलखोल करतो की मुंबई महानगरपालिकेचे दावे टिकतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही