दापोली-खेड रस्ता बंद! जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा इशारा

खेड : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, त्याचा परिणाम दापोली-खेड प्रमुख राज्य मार्गावर दिसून आला आहे. खेड तालुक्यातील फुरुस गावाजवळ पुलाचे काम सुरू असून, यासाठी तयार करण्यात आलेला पर्यायी मार्ग पावसामुळे चिखलमय झाला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे. आता ही वाहतूक दस्तुरीवरून पालगडमार्गे वळवण्यात आली आहे.


दरम्यान, रायगड जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण २२४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये मुरुड तालुका ३७१ मिमी, श्रीवर्धन ३०७ मिमी, तर सर्वात कमी पेण तालुका ५० मिमी पावसासह सरासरी १४०.५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.



रत्नागिरी जिल्ह्यातही एकूण ९९७.९३ मिमी पाऊस पडला असून, सरासरी ११०.८८ मिमी इतकी नोंद झाली आहे. यामध्ये मंडणगड (२११.२५ मिमी) सर्वाधिक आघाडीवर आहे, तर राजापूर (५९.२५ मिमी) सर्वात कमी पावसाची नोंद आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४६६ मिमी एकूण पाऊस पडला असून, सरासरी ५८.२५ मिमी इतकी नोंद झाली आहे. कुडाळ, कणकवली आणि वैभववाडी या तालुक्यांत ६० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे.



जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर


जगबुडी नदीवरील भराणे नाका पुलाजवळ सकाळी १० वाजेच्या सुमारास पाण्याची पातळी ५ मीटरवर पोहोचली असून, तीच अलर्ट पातळी असल्याने धोका पातळीच्या अगदी जवळ पाणी पोहोचले आहे.


हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील ३ ते ४ तासांमध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. यावेळी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह