सीबीएसई शाळांमध्ये आता मराठीचे धडे

  51

मातृभाषेच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन


पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) देशभरातील आपल्या सर्व शाळांमध्ये भाषा शिक्षणविषयक धोरण जारी केले आहे. त्यामुळे सीबीएसई शाळांमध्ये पायाभूत स्तरापासून मातृभाषा किंवा राज्यभाषा शिकविणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सीबीएसई शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


प्राथमिक भाषा ही विद्यार्थ्यास सर्वाधिक परिचित म्हणजेच मातृभाषा असावी. शक्य नसल्यास राज्यभाषा वापरली पाहिजे. मुलाला दुसऱ्या भाषेत मूलभूत साक्षरता येईपर्यंत ही भाषा सर्व विषयांसाठी शिक्षणाचे माध्यम म्हणून देखील काम करेल, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे. सीबीएसई शाळांसाठी मे अखेरीस मातृभाषेच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे.


ही समिती विद्यार्थ्यांच्या भाषिक पार्श्वभूमीचे मूल्यांकन करेल, अभ्यासक्रमात आवश्यक बदल करेल आणि योग्य शिक्षण साहित्य निवडण्यासाठी मार्गदर्शन करेल. शिक्षकांनी जुलैपर्यंत बहुभाषिक शिक्षणाचे विशेष प्रशिक्षणदेखील पूर्ण केले पाहिजे.



राज्यातील शाळांमध्ये मराठी शिकवणे अनिवार्य


तीन ते आठ वयोगटांतील मुलांना त्यांच्या मातृभाषेत मूलभूत साक्षरता विकसित करण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे. पूर्वप्राथमिक ते इयत्ता दुसरीपर्यंत मुलांच्या शिक्षणासाठी मातृभाषा किंवा राज्यभाषा एक अनिवार्य भाषा म्हणून शिकविली जाणार आहे. राज्यातील शाळांमध्ये इंग्रजी आणि हिंदी शिकवले जात असले, तरी मराठी शिकवणे अनिवार्य होईल. मुलांच्या प्रारंभिक वयात मातृभाषेतील शिक्षणामुळे मुलांच्या मानसिक आणि भावनिक विकासाला चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची