महाराष्ट्राला पावसाचा दणका, लोकल १० ते २० मिनिटे उशिराने

मुंबई : यंदा मान्सूनचं देशात लवकर आगमन झालंय. महाराष्ट्रात ऐन मे महिन्यात मुसळधार पाऊस पडत आहे. ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट सुरू आहे. पावसाच्या दमदार आगमन झाल्याची वर्दी मुंबईच्या उपनगरीय रेल्वेनेही दिली आहे. लोकल दहा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहेत. राज्यात पुढील तीन ते चार तास पावसाचा जोर असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

पहाटेपासून पाऊस सुरू असल्यामुळे मध्य रेल्वे मुख्य मार्गावर गाड्या दहा ते वीस मिनिटे विलंबाने धावत आहेत. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कर्जत, खोपोली, बदलापूरवरुन मुंबईकडे येणाऱ्या लोकल विलंबाने धावत आहे.तसेच मुंबईहून कल्याण, कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या गाड्याही विलंबाने धावत आहेत. मुंबईच्या आसापसच्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू आहे. पावसाचा जोर वाढताच वीज खंडीत केली जात आहे. काही ठिकाणी वारे ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाहत आहेत. मुंबईसह उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आलाय. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.
Comments
Add Comment

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला