मुंबईत २८ मे रोजी १५ टक्के पाणीकपात

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच ठाणे व भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पांजरापूर येथील उदंचन केंद्रामधील टप्पा क्रमांक १ येथे नवीन दाबवाढ नियंत्रण टाकी (अँटी सर्ज व्हेसल) कार्यान्वित करण्याचे काम पालिकेच्या वतीने हाती घेतले जाणार आहे.


हे काम बुधवार, २८ मे रोजी सकाळी ९.४५ पासून रात्री १०.४५ वाजेपर्यंत एकूण १३ तासांसाठी नियोजित आहे. त्यामुळे मुंबई शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील बहुतेक विभागांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.



या १३ तासांच्या कालावधीत शहर विभाग व पूर्व उपनगरांमध्ये १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. तसेच ठाणे व भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील ज्या भागास बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा होतो त्या भागांसदेखील ही १५ टक्के पाणीकपात लागू राहणार आहे.

Comments
Add Comment

घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर! सिडकोने केली घरांच्या किमतीमध्ये लक्षणीय घट, जाणून घ्या सविस्तर

नवी मुंबई: जर तुम्ही घर खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूश खबर आहे. कारण सिडकोने माझ्या पसंतीचे

चेंबूरमधील हंडोरेंच्या बालेकिल्ल्याला आरक्षणाचा फटका, हंडोरे कुटुंबाशिवाय असणार काँगेसचा उमेदवार?

शिवसेनेला विधानसभेत खाते खोलण्याची संधी मुंबई (सचिन धानजी): मागील पाच ते सहा निवडणुकांमध्ये चेंबूरमधील एकाच

विक्रमगडमधील १५० आदिवासी मुलांनी अनुभवली मुंबई; सनदी तसेच आयपीएस अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन

मुंबई (प्रतिनिधी): आजवर कधीही रेल्वेने प्रवास न केलेल्या आणि मुंबईही न पाहिलेल्या पालघर जिल्ह्यातील विक्रमगड

भटक्या कुत्र्यांच्या संख्येची अचूक माहिती महापालिका ठेवणार

संख्येचे व्यवस्थापन करणारी प्रणाली महापालिकेकडून विकसित मुंबई (सचिन धानजी): मुंबईतील भटक्या श्वानांच्या

शिउबाठाला मोठा धक्का! ऐन निवडणूकीच्या तोंडावर तेजस्वी घोसाळकर यांचा राम राम

मुंबई: आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच

ग्राहक संरक्षण कायद्यात बदल करण्याची ग्राहक पंचायतची मागणी

मुंबई  : देशातील ग्राहक न्यायालयांमध्ये सध्या साडेपाय लाखांहून अधिक तक्रारी प्रलंबित आहेत. सुनावणीदरम्यान