अहमदाबाद ते मुंबई दरम्यान भारतातील पहिली बुलेट ट्रेन धावणार

५०८ किमीच्या या अंतरासाठी हाय स्पीड रेल्वे कॉरिडोरची निर्मिती


मुंबई :गुजरातमधील अहमदाबाद ते महाराष्ट्रातील मुंबई या दरम्यान भारतातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. ५०८ किलोमीटरच्या या अंतरासाठी हाय स्पीड रेल्वे कॉरिडोरची निर्मिती करण्यात येत आहे. याविषयी मोठी अपडेट समोर येत आहे. एका वृत्तानुसार, २०२८ पर्यंत गुजरातमधील साबरमती ते वापी यादरम्यान काम पूर्ण होईल. तर २०३० पर्यंत या मार्गावरून बुलेट ट्रेन धावेल. त्यामुळे बुलेट ट्रेनचे स्वप्न अजून पाच वर्षे दूर असल्याचे समोर येत आहे.


नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) रायडरशिप सर्वे केला आहे. त्यामध्ये प्रवाशी संख्या, भाडे किती असावे, ट्रॅफिक किती असेल याचा अंदाज घेण्यात आला आहे. सध्या कार, टॅक्सी, बस, एसी ट्रेन, विमान प्रवास असे पर्याय प्रवाशांकडे आहेत. त्यापेक्षा बुलेट ट्रेन त्यांच्यासाठी कशी फायदेशीर ठरेल यावर मंथन सुरू आहे. हे सर्वेक्षण राष्ट्रीय मार्ग आणि एक्सप्रेसवेच्या जवळपास सुरू करण्यात येईल. अहमदाबाद ते मुंबई ५०८ किलोमीटरचा टप्पा बुलेट ट्रेनसाठी असेल. गुजरातमध्ये ३४८ किमीचे अंतर तर महाराष्ट्रात १५६ किमीची लांबी असेल. महाराष्ट्रात मुंबईत बीकेसी, ठाणे, विरार, भोईसर या स्टेशनची निर्मिती सुरू आहे. तर गुजरातमध्ये वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, साबरमती स्टेशन यांचा समावेश आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, आतापर्यंत ३०० किमीचा वायाडक्टची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबईतील BKC स्टेशनचे काम प्रगतीपथावर आहे. ३८३इपिअर वर्क, ४०१ फाऊंडेश आणि ३२६ किमी गर्डरचे काम पण पूर्ण करण्यात आले आहे.



बुलेट ट्रेनचे गुजरातमधील काम तेजीने होत आहे. तर महाराष्ट्रात भूसंपादनाचा विषयी गंभीर झाला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही भागांविषयी, जंगल अधिग्रहणाविषयी तीव्र मतभेद समोर आले होते. त्यामुळे पर्यावरणाला मोठा धक्का लागण्याची भीती व्यक्त होत होती. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर भारताचा त्या १५ देशांच्या यादीत समावेश होईल, जिथे बुलेट ट्रेन धावते.

Comments
Add Comment

Mira-Bhayandar terror scare : आरोपी जुबैर ‘जिहाद’च्या नावाखाली हिंदूंवर हल्ला करू इच्छित होता- मुख्यमंत्री

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले की, मीरा रोड येथे झालेला संशयित ‘लोन वुल्फ’

Mantralaya : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्पष्टीकरण मुंबई : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या

Devendra Fadanvis : शिवरायांच्या नावावर निरर्थक वाद उकरून काढणे संतापजनक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; आक्षेप घेणाऱ्यांनी 'शिवाजी कोण होता?' पुस्तक वाचले का? मुंबई : "छत्रपती शिवाजी

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीबाबत नवा फॉर्म्युला

दंडात्मक कारवाईला तूर्तास ब्रेक; १ मेपासून राज्यव्यापी मोहीम, चालकांना सहा महिन्यांचा 'दिलासा' मुंबई : राज्यातील

Digital Registration : प्रकल्प बाधितांच्या पात्रतेची डिजिटल नोंदणी करा

- भाजप नगरसेविकेची अर्थसंकल्पीय भाषणाद्वारे मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्यावतीने अनेक

Marathi Bhavan : इतर भाषिकांचे मुंबईत भवन, मराठी भवन का नाही?

- हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत