Janjira Fort Close: मुरुड जंजिरा किल्ला पर्यटनासाठी होणार बंद! कारण आले समोर

अलिबाग: केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले असून, महाराष्ट्रात काही दिवसातच त्याचे आगमन होणार असल्याकारणामुळे, पर्यटकाच्या सुरक्षिततेचा विचार करून पुरातत्व खात्याने दिनांक 26 मे पासून जंजिरा किल्ला पर्यटनासाठी बंद (Murud Janjira Fort Closed for Tourism) करण्याची घोषणा केली आहे.


सध्या राज्यभर अवकाळी पावसाने कहर केला आहे, समुद्रकिनार पट्टीवर देखील हवामान खात्याकडून अनेकदा अलर्ट जारी करण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे मान्सूनच्या  ढगाळ वातावरणासोबत समुद्रात वाढणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना धोका पोहोचण्याची शक्यता असल्याकारणामुळे, पुरातत्व खात्याद्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.


खरे तर लहान मुलांची उन्हाळ्याची सुट्टी अद्याप संपलेली नाही. त्यामुळे, शिवाजी महाराजांचे गडकिल्ले दाखवण्यासाठी सर्वाधिक पालक मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जंजिरा किल्ल्यावर गर्दी करतात. सुट्टीच्या काळांत जंजिरा किल्ला पाहण्यासाठी प्रवेश द्वाराजवळ उतरताना प्रवाशांची होणारी कसरत लक्षात घेता, पावसाळ्यात त्याचे व्यवस्थापन करणे जिकरीचे ठरू शकते. खास करून पावसाळ्यात समुद्रात उंच उसळणाऱ्या लाटा, वादळ, हेलकावे यामुळे होऊ शकणारी दुर्घटना टाळण्यासाठी पुरातत्व विभाग आणि मेरिटाइम बोर्ड दरवर्षी पावसाळ्यात सुरक्षितता म्हणून राजपुरी खाडीतील जंजिरा जलदुर्ग पर्यटकांना पाहण्यासाठी बंद ठेवतात. त्यामुळे पर्यटकांना जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पावसाळा संपण्याची वाट पहावी लागणार आहे.

Comments
Add Comment

Marathi :मराठीचे धिंडवडे काढणारा 'तो' फलक अखेर हटवला

 'प्रहार'च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठी भाषेची आणि व्याकरणाची

Minister Nitesh Rane : मत्स्यव्यवसाय विभागाने आर्थिक काटकसर करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : मत्स्यव्यवसाय विभागाच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि आर्थिक शिस्त यांना सर्वोच्च प्राधान्य

Police misguidance : दारूचा नाद लई बेक्कार ! थेट पोलिसांना कॉल केला अन...

अकोला : दारूच्या नशेत वाघापूर येथील एका तरुणाने चक्क पोलिसांना फोन केला आणि खोटी माहिती दिल्याचा प्रकार समोर आला

Nitesh Rane : ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून मोती तलावाचे पुनरुज्जीवन करणार - पालकमंत्री नितेश राणे

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे वैभव असलेल्या प्रसिद्ध मोती तलावाचे मूळ ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा

Mahayuti : विधान परिषदेच्या पुण्याच्या जागेसाठी महायुतीतच चुरस

जिल्ह्यात महायुतीचे ७३४ सदस्य आहेत. मात्र, आपल्या या पारंपरिक हक्काच्या जागेवर दावा सांगणारा अजित पवार गट आणि

Pune Porsche Car Accident Case : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात नवा वाद! जामिनावर सुटल्यानंतर अग्रवाल कुटुंबाची जंगी पार्टी, VIDEO व्हायरल

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिली होती.