Janjira Fort Close: मुरुड जंजिरा किल्ला पर्यटनासाठी होणार बंद! कारण आले समोर

अलिबाग: केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले असून, महाराष्ट्रात काही दिवसातच त्याचे आगमन होणार असल्याकारणामुळे, पर्यटकाच्या सुरक्षिततेचा विचार करून पुरातत्व खात्याने दिनांक 26 मे पासून जंजिरा किल्ला पर्यटनासाठी बंद (Murud Janjira Fort Closed for Tourism) करण्याची घोषणा केली आहे.


सध्या राज्यभर अवकाळी पावसाने कहर केला आहे, समुद्रकिनार पट्टीवर देखील हवामान खात्याकडून अनेकदा अलर्ट जारी करण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे मान्सूनच्या  ढगाळ वातावरणासोबत समुद्रात वाढणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना धोका पोहोचण्याची शक्यता असल्याकारणामुळे, पुरातत्व खात्याद्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.


खरे तर लहान मुलांची उन्हाळ्याची सुट्टी अद्याप संपलेली नाही. त्यामुळे, शिवाजी महाराजांचे गडकिल्ले दाखवण्यासाठी सर्वाधिक पालक मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जंजिरा किल्ल्यावर गर्दी करतात. सुट्टीच्या काळांत जंजिरा किल्ला पाहण्यासाठी प्रवेश द्वाराजवळ उतरताना प्रवाशांची होणारी कसरत लक्षात घेता, पावसाळ्यात त्याचे व्यवस्थापन करणे जिकरीचे ठरू शकते. खास करून पावसाळ्यात समुद्रात उंच उसळणाऱ्या लाटा, वादळ, हेलकावे यामुळे होऊ शकणारी दुर्घटना टाळण्यासाठी पुरातत्व विभाग आणि मेरिटाइम बोर्ड दरवर्षी पावसाळ्यात सुरक्षितता म्हणून राजपुरी खाडीतील जंजिरा जलदुर्ग पर्यटकांना पाहण्यासाठी बंद ठेवतात. त्यामुळे पर्यटकांना जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पावसाळा संपण्याची वाट पहावी लागणार आहे.

Comments
Add Comment

Corporate Jihad : कॉर्पोरेट जिहादवर काय म्हणाले मंत्री नितेश राणे ?

पिंपळगाव बसवंत : जबरदस्तीने नमाज पढायला लावणे आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या अधिकृत तक्रारी प्राप्त

Transfer : जी. श्रीकांत छत्रपती संभाजीनगरचे नवे विभागीय आयुक्त

चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; जितेंद्र पापळकर यांची जीएसटी विभागात नियुक्ती मुंबई : राज्य शासनाने

Animal Beauty Parlor : तुम्हाला माहित आहे का? या गावाने चक्क सुरु केलंय, महाराष्ट्रात जनावरांच पाहिलं ब्युटी पार्लर; जाणून घ्या सविस्तर

सातारा : महाराष्ट्रातील गावं आता सुजलाम आणि सुफलाम होण्याच्या दिशेने आपली पाऊले उचलत आहेत. शासनाच्या अनेक योजना

Nanded News : नांदेड हादरले! नाल्यातील साचलेल्या पाण्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

नांदेड : नांदेड शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शहरातील देगलूर नाका परिसरातील

Amravati Crime News : मित्राची रूम, दोन मुली अन् कॅमेऱ्याचं जाळं; परतवाडा व्हायरल व्हिडिओ प्रकरणात अयान अहमदच्या 'त्या' कृत्याचा पोलिसांनी केला पर्दाफाश!

अमरावती : परतवाडा येथे सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणाला आता एक गंभीर वळण

temperature pune : महाराष्ट्र सरकारची नवीन SOP, कडाक्याच्या उन्हात आता दुपारी १२ ते ४ 'सक्तीची विश्रांती'

राज्यात उन्हाचा कडाका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने शहरातील असंघटित क्षेत्रातील