Monsoon Update: केरळ, तामिळनाडू, कर्नाटकला मान्सूनचा रेड अलर्ट, गोवा-महाराष्ट्रातही अलर्ट

मुंबई:  मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने (IMD) केली आहे. आठ दिवस आधीच मान्सूनने केरळमध्ये दाखल झाल्याने राज्यासह देशासाठी सुखावणारी आणि दिलासादायक बातमी आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकला मान्सूनने घेरलं असून आज (25 मे) तिन्ही भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.


कोकण, गोव्यातील बहुतांश ठिकाणांसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. यात रायगड, पुणे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, चंद्रपूर आणि नागपूर भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.



अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका


मे महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यातल्या जवळपास 85 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तब्बल 22 हजार 233 हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मका, ज्वारी, भाजीपाला, संत्रा, भात, आंबा, फळपिके या पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा अमरावती, जळगाव, नाशिक, चंद्रपूर आणि जालना या जिल्ह्यांना बसल्याचे सांगितले जात आहे.


दरम्यान, मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झाला असून, पुढील दोन दिवसातच मान्सून महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तर आज देखील राज्यातील बहुतांश भागात पावसाचे ढग कायम असल्याचे बघायला मिळत आहेत. आज रविवारी, मुंबई आणि मुंबई उपनगरासह ठाण्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहे. मुंबईत आज पहाटेपासून आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे. दक्षिण मुंबई आणि उपनगर परिसरात सध्या पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. ठाण्यातही पावसाचे आगमन झाले आहे.

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०