Monsoon Update: केरळ, तामिळनाडू, कर्नाटकला मान्सूनचा रेड अलर्ट, गोवा-महाराष्ट्रातही अलर्ट

  60

मुंबई:  मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने (IMD) केली आहे. आठ दिवस आधीच मान्सूनने केरळमध्ये दाखल झाल्याने राज्यासह देशासाठी सुखावणारी आणि दिलासादायक बातमी आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकला मान्सूनने घेरलं असून आज (25 मे) तिन्ही भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.


कोकण, गोव्यातील बहुतांश ठिकाणांसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. यात रायगड, पुणे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, चंद्रपूर आणि नागपूर भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.



अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका


मे महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यातल्या जवळपास 85 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तब्बल 22 हजार 233 हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मका, ज्वारी, भाजीपाला, संत्रा, भात, आंबा, फळपिके या पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा अमरावती, जळगाव, नाशिक, चंद्रपूर आणि जालना या जिल्ह्यांना बसल्याचे सांगितले जात आहे.


दरम्यान, मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झाला असून, पुढील दोन दिवसातच मान्सून महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तर आज देखील राज्यातील बहुतांश भागात पावसाचे ढग कायम असल्याचे बघायला मिळत आहेत. आज रविवारी, मुंबई आणि मुंबई उपनगरासह ठाण्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहे. मुंबईत आज पहाटेपासून आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे. दक्षिण मुंबई आणि उपनगर परिसरात सध्या पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. ठाण्यातही पावसाचे आगमन झाले आहे.

Comments
Add Comment

सरकार क्रीडा क्षेत्राला चालना देत आहे : चंद्रशेखर बावनकुळे

शेवगाव : आपले सरकार क्रीडा धोरण पुढे घेऊन जात गावा-गावात खेलो इंडियाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला चालना

राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आली, तर खरी क्रांती : शिवगिरी महाराज

संगमनेर : धर्माच्या कार्यासाठी आणि प्रचार व प्रसार करण्यासाठी राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आली तर खरी क्रांती

​Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर​ चार महिन्यांत ११ बळी!

मुंबई- पुणे या सहा पदरी महामार्गावरील आजघडीला दररोज लाखो वाहने धावतात. यशवंतराव चव्हाण द्रूतगती मार्ग म्हणून

Pune News : बकरी ईद निमित्त पुण्यातील ‘हे’ रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते वाचा

पुणे : मुस्लिम बांधवांसाठी बकरी ईद हा एक महत्वाचा सण आहे. देशभरात ७ जून रोजी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली

Rajgad Fort : पतीसह गेली राजगड फिरायला; पाय घसरला अन् थेट १५० फूट दरीत कोसळली

पुणे : पुण्यातील राजगडावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. पावसाळा सुरु होताच अनेकांनी गाद किल्ले फिरायला सुरुवात केली

राज ठाकरे लागले कामाला, पक्षात मोठे फेरबदल, ९ जूनला ठाकरेंचा दौरा

पुणे :  पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुण्यात