किसान सभेचा दिंडोरीत मोर्चा

  18

तहसील कार्यालयाच्या आवारात घोषणाबाजी; वाहतुकीची काही काळ कोंडी


दिंडोरी : अखिल भारतीय किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने माकपचे जिल्हा सचिव रमेश चौधरी, डी.वाय.एफ.आय तालुका अध्यक्ष आप्पा वाटणे, किसान सभा तालुकाध्यक्ष देविदास वाघ, जनवादी महिला संघटनेच्या तालुकाध्यक्ष लक्ष्मीबाई काळे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी दिंडोरी तहसील येथे मोर्चा काढण्यात आला. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून मोर्चास प्रारंभ करत थेट तहसील कार्यालयात मोर्चा येताच शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले, यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते, पो. नि. रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


काही काळ चक्का जाम : दिंडोरी पंचायत समितीच्या समोर मोर्चाच्या सुरुवातीस निळवंडीरोड वर वाहनाचा काही काळ चक्का जाम झाला होता. यावेळी शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करा असा हुंकार मोर्चा वेळी देण्यात येत होती, नाशिक - कळवण रास्त्यावर एक तास वाहतुकीची कोंडी झाली होती, यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.


किसान सभेच्या मागण्या :




  • वनाधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा.

  • तालुक्यातील सर्व एमआयडीसी व कारखान्यातील रोजगारात स्थानिक युवक, युवतींना ८०% प्राधान्य द्यावे.

  • ऑनलाईन रेशन कार्ड करून लाभार्थ्यांना शिधा वाटप करा,

  • वृद्धापकाळ, विधवा महिला पेन्शन चालू करण्यासाठी प्रलंबित प्रकरणे निकाली काढा.

  • जनसुरक्षा विधेयक मागे घ्या.

  • हेग्जोगोन न्यूट्रिशियन कंपनीच्या कामगारांना पूर्वत कामावर घ्या,

  • सफाई कामगारांना किमान वेतन लागू करा.

Comments
Add Comment

केळ्यांचा भाव घसरला; उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

जळगाव: काही दिवसापूर्वी २ हजाराच्या वर गेलेला केळीचा भाव आता १२०० रूपयांपर्यंत घसरल्यामुळे केळी उत्पादकांना

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण

त्रंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बाहेरगावहून येणाऱ्या

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,

‘सुखोई’च्या आवाजाने दिडोंरी थरथरली

घरांच्या काचा फुटल्या २५ किमी परिसरात आवाजाचे पडसाद स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण तलाठी, तहसीलदारांकडून

छगन भुजबळांनी दिला ध्वजारोहणाला नकार? हे आहे कारण

नाशिक: १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी झेंडा कोण फडकवणार? यावरून राज्यात वातावरण पेटलेले आहे. नाशिक आणि रायगड या दोन

इगतपुरीच्या रिसोर्टमधील कॉल सेंटरवर CBI चा छापा

अमेरिका, कॅनडासह परदेशी नागरिकांची फसवणूक नाशिक: इगतपुरी येथील रिसोर्टमधून विदेशी नागरिकांना फोन करून