जपानला मागे टाकत भारत झाला जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था

नवी दिल्ली : जपानला मागे टाकत भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था झाला आहे. भारत वेगाने आर्थिक प्रगती करत आहे. भारताच्या पुढे आता केवळ अमेरिका, चीन आणि जर्मनी हे तीन देश आहेत. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी ही माहिती दिली. नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीनंतर सुब्रह्मण्यम यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी भारतीय नागरिकांना ही आनंदाची बातमी दिली. भारताची अर्थव्यवस्था आता चार ट्रिलियन डॉलरची अर्थात चार हजार अब्ज डॉलर म्हणजेच ३४० लाख कोटी रुपयांची झाली आहे.

जगावर मंदीचे सावट आहे. अनेक देशांचे संघर्ष सुरू आहेत. या संघर्षांचा अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. अमेरिकेने वेगवेगळ्या देशांवर परस्पर आयात शुल्क अर्थात रेसिप्रोकल टॅरिफ लावले आहे. काही मुद्यांवर चीन आणि युरोपियन महासंघ विरुद्ध अमेरिका असे टॅरिफ वॉर सुरू आहे. या प्रतिकूल वातावरणात भारताच्या अर्थव्यवस्थेची भरभराट होत आहे. भारताने झपाट्याने प्रगती करत जपानला मागे टाकत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था होण्यापर्यंत मजल मारली आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अर्थात आयएमएफच्या माहितीचा संदर्भ देत भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था झाल्याचे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम म्हणाले. भारताने जपानला मागे टाकल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या विकासाची गती कायम राहिली अथवा वाढली तर पुढील दोन ते तीन वर्षात भारत जर्मनीला मागे टाकून जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केला.

याआधी शनिवार २४ मे रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत त्यांनी देशातील सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.
Comments
Add Comment

बांग्लादेशमध्ये दीपू दासनंतर तिसऱ्या हिंदूची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

ढाका : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांविरोधातील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, मैमनसिंग जिल्ह्यात

'आरपीआय'ला १५ जागांवर महायुती पाठिंबा देणार

रामदास आठवले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर महायुतीकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय)

महानगरपालिका आयुक्तांनी निवडणूक प्रशिक्षण केंद्रांची केली पाहणी

लोअर परळ आणि कांदिवली प्रशिक्षण केंद्रांना दिली भेट मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा

मुंबई-पुणे गाड्यांच्या वेळा १ जानेवारीपासून बदलणार

मुंबई : नव्या वर्षात रेल्वेने एक - दोन दिवसांसाठी फिरायला जाण्याची योजना असेल तर आधी हे वाचा. कारण मुंबई-पुणे

Election Updates : आता कुठे युती-आघाडी, तर कुठे बिघाडी

२९ महापालिकांतील लढतींचे चित्र स्पष्ट; मनसेच्या धास्तीने काँग्रेसने उबाठाशी अधिकची सलगी टाळली मुंबई :

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड