जपानला मागे टाकत भारत झाला जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था

नवी दिल्ली : जपानला मागे टाकत भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था झाला आहे. भारत वेगाने आर्थिक प्रगती करत आहे. भारताच्या पुढे आता केवळ अमेरिका, चीन आणि जर्मनी हे तीन देश आहेत. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी ही माहिती दिली. नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीनंतर सुब्रह्मण्यम यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी भारतीय नागरिकांना ही आनंदाची बातमी दिली. भारताची अर्थव्यवस्था आता चार ट्रिलियन डॉलरची अर्थात चार हजार अब्ज डॉलर म्हणजेच ३४० लाख कोटी रुपयांची झाली आहे.

जगावर मंदीचे सावट आहे. अनेक देशांचे संघर्ष सुरू आहेत. या संघर्षांचा अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. अमेरिकेने वेगवेगळ्या देशांवर परस्पर आयात शुल्क अर्थात रेसिप्रोकल टॅरिफ लावले आहे. काही मुद्यांवर चीन आणि युरोपियन महासंघ विरुद्ध अमेरिका असे टॅरिफ वॉर सुरू आहे. या प्रतिकूल वातावरणात भारताच्या अर्थव्यवस्थेची भरभराट होत आहे. भारताने झपाट्याने प्रगती करत जपानला मागे टाकत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था होण्यापर्यंत मजल मारली आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अर्थात आयएमएफच्या माहितीचा संदर्भ देत भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था झाल्याचे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम म्हणाले. भारताने जपानला मागे टाकल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या विकासाची गती कायम राहिली अथवा वाढली तर पुढील दोन ते तीन वर्षात भारत जर्मनीला मागे टाकून जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केला.

याआधी शनिवार २४ मे रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत त्यांनी देशातील सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.
Comments
Add Comment

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय