जपानला मागे टाकत भारत झाला जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था

नवी दिल्ली : जपानला मागे टाकत भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था झाला आहे. भारत वेगाने आर्थिक प्रगती करत आहे. भारताच्या पुढे आता केवळ अमेरिका, चीन आणि जर्मनी हे तीन देश आहेत. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी ही माहिती दिली. नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीनंतर सुब्रह्मण्यम यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी भारतीय नागरिकांना ही आनंदाची बातमी दिली. भारताची अर्थव्यवस्था आता चार ट्रिलियन डॉलरची अर्थात चार हजार अब्ज डॉलर म्हणजेच ३४० लाख कोटी रुपयांची झाली आहे.

जगावर मंदीचे सावट आहे. अनेक देशांचे संघर्ष सुरू आहेत. या संघर्षांचा अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. अमेरिकेने वेगवेगळ्या देशांवर परस्पर आयात शुल्क अर्थात रेसिप्रोकल टॅरिफ लावले आहे. काही मुद्यांवर चीन आणि युरोपियन महासंघ विरुद्ध अमेरिका असे टॅरिफ वॉर सुरू आहे. या प्रतिकूल वातावरणात भारताच्या अर्थव्यवस्थेची भरभराट होत आहे. भारताने झपाट्याने प्रगती करत जपानला मागे टाकत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था होण्यापर्यंत मजल मारली आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अर्थात आयएमएफच्या माहितीचा संदर्भ देत भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था झाल्याचे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम म्हणाले. भारताने जपानला मागे टाकल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या विकासाची गती कायम राहिली अथवा वाढली तर पुढील दोन ते तीन वर्षात भारत जर्मनीला मागे टाकून जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केला.

याआधी शनिवार २४ मे रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत त्यांनी देशातील सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.
Comments
Add Comment

Ahilyanagar: भरवस्तीत दुचाकीस्वाराचा गोळीबार; कुख्यात गुंड सागर मोहळकर रक्ताच्या थारोळ्यात

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातले जामखेड पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरून गेले आहे. जामखेडमध्ये

Iran Israel War: इराणने दिला जगाला इशारा; ट्रम्प भडकले

मुंबई: अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवत जागतिक व्यापाराला

मुख्यमंत्री फडणवीसांंचा निर्णय; धडाकेबाज IAS अधिकाऱ्याची नागपूरमधून बदली

नागपूर: नागपूर महापालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी यांची बदली करण्यात आली आहे. अभिजीत चौधरी यांच्यावर पुणे महानगर

T20 : दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरली चोकर्स, फिन एलनचे वादळी शतक आणि न्यूझीलंडची दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक

कोलकाता  : न्यूझीलंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला सहज पराभूत केले.

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करतील

मुंबई : शेतकरी कर्जमाफीबाबत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलच्या