मुख्यमंत्र्यांचा आता १५० दिवसांचा कृती आराखडा

पुणे : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५० दिवसांच्या कृती आराखड्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महसूल, ग्रामविकास आणि नगरविकास विभागांच्या प्रत्येकी सहा समित्या स्थापन करण्यात आल्या असून, या समित्यांच्या अहवालानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी धोरणात्मक बदल केले जाणार आहेत.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्यानंतर आता १५० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. त्यासाठी पुण्यात ऑर्किड हॉटेल येथे महसूल विभागाची कार्यशाळा, तर यशवंतराव चव्हाण प्रशासन विकास प्रबोधिनी (यशदा) येथे ग्रामविकास आणि नगरविकास विभागांची कार्यशाळा घेण्यात आली. त्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्येक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किमान सहा ते आठ तास चर्चा केली.


कार्यशाळेला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संबंधित खात्याचे मंत्री, राज्यमंत्री आणि सचिव उपस्थित होते. या कार्यशाळांमधून प्रशासकीय सुधारणेविषयी मंथन करून सुधारणांचे नवे पर्व सुरू करण्यासाठी १५० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी प्रशासकीय बदलांसाठी अभ्यासगटांची नियुक्ती करण्याचाही निर्णय घेण्यात आला. या अभ्यासगटांकडून येणाऱ्या अहवालांवर आधारित धोरण निश्चिती होणार आहे.


प्रत्येक गटासाठी मार्गदर्शक म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. या गटांना विषय ठरवून देण्यात आले असून, हे गट दिलेल्या कालावधीत राज्य सरकारला अहवाल देणार आहेत.

Comments
Add Comment

RO-RO Ferry : मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी 'हाऊसफुल्ल' बुकिंग

- मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ! मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग

Yogesh Kadam : बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध राज्यात कोम्बिंग ऑपरेशन! गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा

मुंबईत 'टास्कफोर्स' तैनात; दाट वस्त्यांमध्ये शोधमोहीम मुंबई : राज्यातील वाढत्या बांगलादेशी घुसखोरांच्या

Modi and Persian scripts : राज्यात मोडी व फारसी लिपी प्रचार-प्रसारासाठी वार्षिक पुरस्कार - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व प्रशासकीय वारशाचे जतन करण्यासाठी राज्य शासनाने मोडी व फारसी

ShivendraRaje Bhonsle : मुंबई-गोवा महामार्गाचे 'मे' अखेरपर्यंत काम पूर्णत्वास; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे विधानपरिषदेत आश्वासन

मुंबई : दरवर्षी होळी आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या

Madhuri Misal : भटक्या श्वानांच्या उपद्रवावर राज्य सरकार मोठं पाऊल उचलणार; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची सभागृहात घोषणा

शिक्षण संस्थांच्या सुरक्षिततेसाठी 'नोडल अधिकारी' नेमणार मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या

Pravin Darekar : अभियांत्रिकीच्या 'डिस्टन्स' पदव्या अवैध; तरीही महापालिकेत पदोन्नत्या कशा? आमदार दरेकरांचा सवाल

मुंबई : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत गेल्या १० वर्षांत परराज्यातील विद्यापीठांच्या पदव्यांच्या आधारे देण्यात