मुख्यमंत्र्यांचा आता १५० दिवसांचा कृती आराखडा

पुणे : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५० दिवसांच्या कृती आराखड्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महसूल, ग्रामविकास आणि नगरविकास विभागांच्या प्रत्येकी सहा समित्या स्थापन करण्यात आल्या असून, या समित्यांच्या अहवालानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी धोरणात्मक बदल केले जाणार आहेत.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्यानंतर आता १५० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. त्यासाठी पुण्यात ऑर्किड हॉटेल येथे महसूल विभागाची कार्यशाळा, तर यशवंतराव चव्हाण प्रशासन विकास प्रबोधिनी (यशदा) येथे ग्रामविकास आणि नगरविकास विभागांची कार्यशाळा घेण्यात आली. त्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्येक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किमान सहा ते आठ तास चर्चा केली.


कार्यशाळेला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संबंधित खात्याचे मंत्री, राज्यमंत्री आणि सचिव उपस्थित होते. या कार्यशाळांमधून प्रशासकीय सुधारणेविषयी मंथन करून सुधारणांचे नवे पर्व सुरू करण्यासाठी १५० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी प्रशासकीय बदलांसाठी अभ्यासगटांची नियुक्ती करण्याचाही निर्णय घेण्यात आला. या अभ्यासगटांकडून येणाऱ्या अहवालांवर आधारित धोरण निश्चिती होणार आहे.


प्रत्येक गटासाठी मार्गदर्शक म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. या गटांना विषय ठरवून देण्यात आले असून, हे गट दिलेल्या कालावधीत राज्य सरकारला अहवाल देणार आहेत.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक