ठाकरे सेना आणि मनसे युतीच्या केवळ वावड्या! 'दोनदा फसवले', संदीप देशपांडेंचा उद्धव सेनेवर थेट हल्ला!

मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युती होण्याच्या चर्चांना जोर आला असताना, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या चर्चांना मोठा धक्का दिला आहे. “ठाकरे गटाने आम्हाला दोन वेळा फसवले आहे,” असा थेट आरोप करत त्यांनी युतीच्या शक्यतेवर पाणी फेरले आहे.



काय म्हणाले संदीप देशपांडे?


देशपांडे म्हणाले, “२०१४ विधानसभा आणि २०१७ महापालिका निवडणुकांपूर्वी आम्ही युतीसाठी पुढाकार घेतला होता. मातोश्रीवर बाळा नांदगावकर यांना पाठवलं होतं. पण चर्चाच सुरू ठेवत त्यांनी आमचा विश्वासघात केला.”


ते पुढे म्हणाले, “सध्या उबाठा गटासोबत आमचा कोणताही संवाद नाही. संजय राऊत दररोज पत्रकार परिषद घेऊन ‘सकारात्मक आहोत’ म्हणतात, पण युती करायची असेल तर प्रत्यक्ष पुढे यावं लागेल. आम्ही फक्त चर्चा नाही, कृती केली होती.”



राज ठाकरे यांच्या मुलाखतीवर संशय


राज ठाकरे यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत युतीबाबत सूचक भाष्य केलं होतं. यावर संदीप देशपांडे म्हणाले, “त्या मुलाखतीत त्यांनी नेमकं काय बोललं आणि काय अर्थ निघाला, यावरच आमच्यात संभ्रम आहे.”


दरम्यान, संजय राऊत यांनी याआधी स्पष्ट केलं होतं की उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक आहेत आणि मराठी माणसासाठी सर्व भेद विसरायला हवे. मात्र मनसेकडून आता आलेल्या प्रतिक्रियेनंतर ही शक्यता अजूनही अंधारातच आहे.


सद्यस्थितीत ठाकरे सेना आणि मनसे युती ही केवळ चर्चेपुरती मर्यादित आहे. संदीप देशपांडेंच्या आक्रमक भूमिकेमुळे युतीच्या शक्यतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane on Nashik Tree Cutting : 'वृक्षतोडीवर आक्षेप, मग बकरी कापताना गप्प का?' पर्यावरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना मंत्री नितेश राणेंचा तिखट सवाल!

मुंबई : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Kumbh Mela 2027) च्या भव्य तयारीला सुरुवात झाली असताना, साधूग्राम उभारणीसाठी

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

भाजपच्या माजी नगरसेविकेने अधिकाऱ्यांना घेतले फैलावर मुंबई  : गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल

आज-उद्या-परवा समुद्रकिनाऱ्यावर काळजी घ्या!

४ ते ७ डिसेंबर दरम्यान सलग तीन दिवस मोठी भरती मुंबई : मुंबईमधील समुद्रकिनाऱ्यांवर फेरफटका कारण्यासाठी जाणारे

निकाल लागून ४५ दिवसांनंतरही भरती प्रक्रिया मंदावलेलीच!

वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य

‘राजगृह’सह चैत्यभूमीवर नागरी सेवा-सुविधा उपलब्ध

सुमारे ८ हजारांहून अधिक अधिकारी - कर्मचारी तैनात मुंबई  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण