ठाकरे सेना आणि मनसे युतीच्या केवळ वावड्या! 'दोनदा फसवले', संदीप देशपांडेंचा उद्धव सेनेवर थेट हल्ला!

मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युती होण्याच्या चर्चांना जोर आला असताना, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या चर्चांना मोठा धक्का दिला आहे. “ठाकरे गटाने आम्हाला दोन वेळा फसवले आहे,” असा थेट आरोप करत त्यांनी युतीच्या शक्यतेवर पाणी फेरले आहे.



काय म्हणाले संदीप देशपांडे?


देशपांडे म्हणाले, “२०१४ विधानसभा आणि २०१७ महापालिका निवडणुकांपूर्वी आम्ही युतीसाठी पुढाकार घेतला होता. मातोश्रीवर बाळा नांदगावकर यांना पाठवलं होतं. पण चर्चाच सुरू ठेवत त्यांनी आमचा विश्वासघात केला.”


ते पुढे म्हणाले, “सध्या उबाठा गटासोबत आमचा कोणताही संवाद नाही. संजय राऊत दररोज पत्रकार परिषद घेऊन ‘सकारात्मक आहोत’ म्हणतात, पण युती करायची असेल तर प्रत्यक्ष पुढे यावं लागेल. आम्ही फक्त चर्चा नाही, कृती केली होती.”



राज ठाकरे यांच्या मुलाखतीवर संशय


राज ठाकरे यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत युतीबाबत सूचक भाष्य केलं होतं. यावर संदीप देशपांडे म्हणाले, “त्या मुलाखतीत त्यांनी नेमकं काय बोललं आणि काय अर्थ निघाला, यावरच आमच्यात संभ्रम आहे.”


दरम्यान, संजय राऊत यांनी याआधी स्पष्ट केलं होतं की उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक आहेत आणि मराठी माणसासाठी सर्व भेद विसरायला हवे. मात्र मनसेकडून आता आलेल्या प्रतिक्रियेनंतर ही शक्यता अजूनही अंधारातच आहे.


सद्यस्थितीत ठाकरे सेना आणि मनसे युती ही केवळ चर्चेपुरती मर्यादित आहे. संदीप देशपांडेंच्या आक्रमक भूमिकेमुळे युतीच्या शक्यतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.

Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा