ठाकरे सेना आणि मनसे युतीच्या केवळ वावड्या! 'दोनदा फसवले', संदीप देशपांडेंचा उद्धव सेनेवर थेट हल्ला!

मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युती होण्याच्या चर्चांना जोर आला असताना, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या चर्चांना मोठा धक्का दिला आहे. “ठाकरे गटाने आम्हाला दोन वेळा फसवले आहे,” असा थेट आरोप करत त्यांनी युतीच्या शक्यतेवर पाणी फेरले आहे.



काय म्हणाले संदीप देशपांडे?


देशपांडे म्हणाले, “२०१४ विधानसभा आणि २०१७ महापालिका निवडणुकांपूर्वी आम्ही युतीसाठी पुढाकार घेतला होता. मातोश्रीवर बाळा नांदगावकर यांना पाठवलं होतं. पण चर्चाच सुरू ठेवत त्यांनी आमचा विश्वासघात केला.”


ते पुढे म्हणाले, “सध्या उबाठा गटासोबत आमचा कोणताही संवाद नाही. संजय राऊत दररोज पत्रकार परिषद घेऊन ‘सकारात्मक आहोत’ म्हणतात, पण युती करायची असेल तर प्रत्यक्ष पुढे यावं लागेल. आम्ही फक्त चर्चा नाही, कृती केली होती.”



राज ठाकरे यांच्या मुलाखतीवर संशय


राज ठाकरे यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत युतीबाबत सूचक भाष्य केलं होतं. यावर संदीप देशपांडे म्हणाले, “त्या मुलाखतीत त्यांनी नेमकं काय बोललं आणि काय अर्थ निघाला, यावरच आमच्यात संभ्रम आहे.”


दरम्यान, संजय राऊत यांनी याआधी स्पष्ट केलं होतं की उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक आहेत आणि मराठी माणसासाठी सर्व भेद विसरायला हवे. मात्र मनसेकडून आता आलेल्या प्रतिक्रियेनंतर ही शक्यता अजूनही अंधारातच आहे.


सद्यस्थितीत ठाकरे सेना आणि मनसे युती ही केवळ चर्चेपुरती मर्यादित आहे. संदीप देशपांडेंच्या आक्रमक भूमिकेमुळे युतीच्या शक्यतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून