पाकिस्तानी उड्डाणांना भारतीय आकाशात नो एंट्री, भारताने २३ जूनपर्यंत वाढवली बंदी

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान भारत सरकारने पाकिस्तानची विमाने आणि सैन्य उड्डाणांवर आपल्या हवाई क्षेत्रातील बंदी २३ जून पर्यंत वाढवली आहे. हा निर्णय गेल्या महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर घेण्यात आला. या हल्ल्यात २६ निर्दोष नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता.


शुक्रवारी नागरी उड्डाण मंत्रालयाच्या निर्देशानुसार नवीन नोटीस जारी करण्यात आली. यानुसार पाकिस्तानच्या कोणत्याही एअरलाईन्सच्या उड्डाणांना भारतीय आकाशा प्रवेश दिला जाणार आहे. यात सैन्याच्या विमानांचाही समावेश आहे.



पाकिस्तानने वाढवली होती बंदी


हे पाऊल अशा वेळेस उचलले जेव्हा दोन दिवसांपूर्वी मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की पाकिस्ताननेही सर्व भारतीय विमानांना आपल्या एअरस्पेसची बंदी एक महिन्यांनी वाढवली होती.


पाकिस्तानने पहिल्यांदा २३ एप्रिलला भारतीय विमानांसाछी एअरस्पेस बंद केले होते. पहलगाम हल्ल्यानंतरचा तो दिवस होता.



काय सांगतात नियम?


आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या नियमानुसार एअरस्पेसवरील बंदी अधिकाधिक एक महिन्यांसाठी लावता येते. त्यानंतर पुन्हा रिन्यू करावी लागते. भारताने पाकिस्तानच्या विमानांना बंदी मेमध्ये जाहीर केली होती. यात पाकिस्तानच्या सर्व विमानांवर बंदी घालण्यात आली होती. भारताने ही बंदी लावत स्पष्टपणे दाखवले होते की जोपर्यंत सीमेवर दहशतवाद बंद होत नाही तोपर्यंत हवाई संपर्कही शक्य नाही.

Comments
Add Comment

Uttar Pradesh: तीन बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला वडिलांचा फोन जप्त

उत्तर प्रदेशा: गाझियाबादमधील एका घराच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या तीन बहिणींच्या

Bharat Bandh: केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

मुंबई : विविध कामगार संघटनांनी आज, गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर

Crime: प्रिन्सिपल सुनेसोबत सासऱ्याचे नको ते प्रकार, नात्याला काळिमा फासणारी घटना समोर

मुंबई: नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या एका प्रतिष्ठित

Vande Mataram : शाळांपासून संसदेपर्यंत आता संपूर्ण 'वंदे मातरम्' घुमणार! केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, सर्व ६ कडवी आता अनिवार्य

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची ठिणगी टाकणाऱ्या 'वंदे मातरम्' या गीताचा सन्मान वाढवण्यासाठी

Sunetra Pawar : दिल्लीत राजकीय खलबतं! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोदी-शाहांच्या भेटीला, तर रोहित पवारही राजधानीत

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र आज मुंबईहून देशाची राजधानी दिल्लीत सरकले आहे. राज्याच्या

Rohit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात नव्हे घातपात!

- रोहित पवार यांनी व्यक्त केला संशय; पूर्व विदर्भातील नेत्याच्या फाईलवर सही करण्यास उशीर झाल्याने करावा लागला