पाकिस्तानी उड्डाणांना भारतीय आकाशात नो एंट्री, भारताने २३ जूनपर्यंत वाढवली बंदी

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान भारत सरकारने पाकिस्तानची विमाने आणि सैन्य उड्डाणांवर आपल्या हवाई क्षेत्रातील बंदी २३ जून पर्यंत वाढवली आहे. हा निर्णय गेल्या महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर घेण्यात आला. या हल्ल्यात २६ निर्दोष नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता.


शुक्रवारी नागरी उड्डाण मंत्रालयाच्या निर्देशानुसार नवीन नोटीस जारी करण्यात आली. यानुसार पाकिस्तानच्या कोणत्याही एअरलाईन्सच्या उड्डाणांना भारतीय आकाशा प्रवेश दिला जाणार आहे. यात सैन्याच्या विमानांचाही समावेश आहे.



पाकिस्तानने वाढवली होती बंदी


हे पाऊल अशा वेळेस उचलले जेव्हा दोन दिवसांपूर्वी मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की पाकिस्ताननेही सर्व भारतीय विमानांना आपल्या एअरस्पेसची बंदी एक महिन्यांनी वाढवली होती.


पाकिस्तानने पहिल्यांदा २३ एप्रिलला भारतीय विमानांसाछी एअरस्पेस बंद केले होते. पहलगाम हल्ल्यानंतरचा तो दिवस होता.



काय सांगतात नियम?


आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या नियमानुसार एअरस्पेसवरील बंदी अधिकाधिक एक महिन्यांसाठी लावता येते. त्यानंतर पुन्हा रिन्यू करावी लागते. भारताने पाकिस्तानच्या विमानांना बंदी मेमध्ये जाहीर केली होती. यात पाकिस्तानच्या सर्व विमानांवर बंदी घालण्यात आली होती. भारताने ही बंदी लावत स्पष्टपणे दाखवले होते की जोपर्यंत सीमेवर दहशतवाद बंद होत नाही तोपर्यंत हवाई संपर्कही शक्य नाही.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे