आला रे मान्सून आला, राज्यात कधी बरसणार ?

  104

नवी दिल्ली : उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी. मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले आहे. यंदा मे महिन्यात मान्सून केरळमध्ये पोहोचला आहे. केरळमध्ये लवकर आगमन झाल्यामुळे महाराष्ट्रातही पाऊस लवकर येण्याची शक्यता आहे. मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू राहिला तर राज्यात आठवड्याभरात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.



मागील दोन चार दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे शहरी भागांमध्ये उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला आहे. पण शेतकऱ्यांना फटका बसला आहे. मान्सून आता केरळात दाखल झालाय. त्यामुळे मान्सून महाराष्ट्रात केव्हा बरसणार आहेत याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये वळवाचा पाऊस सुरु आहे. यंदा मान्सून आठवडाभर लवकरच येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरला आहे.

केरळात दाखल झालेला मान्सून हा दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, लक्षद्वीपचा काही भाग, कर्नाटक, तामिळनाडू, दक्षिण आणि मध्य बंगालचा उपसागर या भागात पुढे सरकणार आहे. दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीच्या काही भागात पाऊस आणि वारा यामध्ये बदल होऊ शकतो असा अंदाज हमावान खात्याने वर्तवलाय. आता पुढील साधारण ७ ते ८ दिवसांत म्हणजेच ६ जूनच्या आसपास मान्सून महाराष्ट्रात पोहण्याचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टी, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गसारख्या भागांत प्रथम पाऊस पडेल. यंदा मान्सूनच्या पावसाचं प्रमाणही सरासरीएवढं किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

मान्सूनचा प्रवास पाहता कोकणानंतर तो दहा जूनपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात पोहोचू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. यंदा तर शाळा सुरू होण्यापूर्वीच मान्सूला सुरुवात झालीय. त्यामुळे पावसातून जाताना दप्तर भिजणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांना घ्यावी लागणार आहे.
Comments
Add Comment

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

JeM Terrorist Killed: उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू, एक ठार

उधमपूर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील एका दुर्गम जंगली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ रथयात्रेची आजपासून सुरुवात, रथ ओढणाऱ्या दोऱ्यांची आहेत 'खास' नावे

पुरी : ओडिशामधील पुरी येथे दरवर्षी होणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेला आजपासून म्हणजेच शुक्रवार, २७ जूनपासून झालेली

देशातील ३४५ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली : देशातील ३४५ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया निवडणूक

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे पाच जणांचा मृत्यू

कुल्लू : हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यांसह काही भागांमध्ये ढगफुटी, मुसळधार पाऊस आणि पूर यामुळे

भारतासोबत लवकरच मोठा करार, चीनसोबत करार झाल्यानंतर ट्रम्प यांची घोषणा

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि चीन यांच्यातील मोठ्या व्यापार कराराबाबत