Keral Monsoon : मान्सून केरळात दाखल!

महाराष्ट्रात कधी बरसणार ?


उकाड्याने हैराण झालेल्या सर्वांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत. त्यातच यंदा पाऊस लवकर पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. मान्सून आता केरळात दाखल झालाय. तेव्हा हा मान्सून महाराष्ट्रात केव्हा बरसणार आहे ते पाहूयात या लेखातून...




गेल्या दोन - चार दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडतोय. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळतोय तर शेतकऱ्यांना फटका बसतोय. मात्र मान्सून आता केरळात दाखल झालाय. त्यामुळे मान्सून महाराष्ट्रात केव्हा बरसणार आहे याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये वळवाचा पाऊस सुरु आहे. यंदा मान्सून आठवडाभर लवकरच येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. २७ मे रोजी मान्सून दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज यंदा खरा ठरलाय.



केरळात दाखल झालेला मान्सून हा दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, लक्षद्वीपचा काही भाग, कर्नाटक, तामिळनाडू, दक्षिण आणि मध्य बंगालचा उपसागर या भागात पुढे सरकणार आहे. दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीच्या काही भागात पाऊस आणि वारा यामध्ये बदल होऊ शकतो असा अंदाज हमावान खात्याने वर्तवलाय. आता पुढील साधारण ७ ते ८ दिवसांत म्हणजेच ६ जूनच्या आसपास मान्सून महाराष्ट्रात पोहण्याचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टी, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गसारख्या भागांत प्रथम पाऊस पडेल. यंदा मान्सूनच्या पावसाचं प्रमाणही सरासरीएवढं किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.


मुंबईतील नालेसफाई पाहता मुंबईकरांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. मान्सूनचा प्रवास पाहता कोकणानंतर तो १० जूनपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात पोहोचू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. यंदा तर शाळा सुरू होण्यापूर्वीच मान्सूला सुरुवात झालीय. त्यामुळे पावसातून जाताना दप्तर भिजणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांना घ्यावी लागणार आहे.

Comments
Add Comment

लक्ष्य सेनची जपान मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहचा सहज पराभव नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुममातो

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे

आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाली 'सोलर शाळा'

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि अंबानी उद्योग समूहातील सदस्य आणि ‘रोझी ब्लू

नाशिक जिल्हा परिषदेची नूतन इमारत गतिमान कारभारासाठी उपयुक्त ठरेल : मुख्यमंत्री

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन

नाशिक : केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून ‘स्पेशल असिस्टंट टू स्टेटस् फॉर कॅपिटल

किआ इंडियाने किआ आणि मल्टीब्रँड वाहनांसाठी नवीन वॉरंटी प्लॅनसह व्यवसायात मजबूती नोंदवली

किआ इंडियाने किआ मेक प्री-मालकीच्या कारचे प्रमाणपत्र वय ५ वर्षांवरून ७ वर्षांपर्यंत वाढवले आहे, २४ महिने किंवा