Thane Corona Death: मोठी बातमी! ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू

ठाणे: कोरोनाने पुन्हा एकदा आपली दहशत गाजवायला सुरुवात केली आहे. तीन वर्षापूर्वी पूर्ण जगात हाहाकार पसरवणाऱ्या या महामारीने पुन्हा एकदा आपले हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. भारतात देखील कोरोनाचे रुग्ण आढळले असून, गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या शहरांत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच, ठाणे जिल्ह्यातून मोठी माहिती समोर येत आहे. ठाण्यात अवघ्या 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  ही एक मोठी चिंतेची बाब असून,  यानंतर सर्वांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.



ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी


मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा कोरोनाने बळी घेतला आहे. ठाण्यातील कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 21 वर्षीय तरुणावर गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर उपचार चालू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालं.  हा तरुण मुंब्रा येथील रहिवासी होता, ज्याचा शनिवारी सकळी 6 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. त्याला 22 मे रोजी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार चालू असताना त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल काल समोर आला होता. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.



मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ


मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण  झपाट्याने वाढत आहे. सध्या मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या ही 185 पर्यंत पोहोचली आहे. येत्या काही दिवसांत या रुग्णसंख्येत आणखीन भर पडण्याची शक्यता आहे. मे महिन्यापासून मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून केले जात आहे.



नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा


गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र तसेच देशाच्या इतर भागात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच कोरोना संसर्गाची लक्षणं आढळल्यास त्वरित चाचणी करून घ्यावी, असे सांगितले जात आहे. सोबतच कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे देखील आवाहन केले जात आहे.

Comments
Add Comment

Kalyan Power Cut : कल्याण ते बदलापूर वीजपुरवठा बंद; ‘या’ भागांत सकाळी ६ ते ११ पर्यंत शटडाऊन

कल्याण : कल्याण, डोंबिवली परिसरासह टिटवाळा, अंबरनाथ आणि बदलापूरमधील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

Niranjan Davkhare : ठाणे जिल्ह्यात भटक्या श्वानांसाठी वस्तीपासून दूर ४ ते ५ एकर जागेवर निवारा केंद्र उभारावे; आमदार निरंजन डावखरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागाच्या हद्दीतील वाढत असलेल्या भटक्या

Pankaja Munde : अंबरनाथचं मांजर प्रकरण माहिती आहे का ?

अंबरनाथ : अंबरनाथच्या रॉयल फ्लोरा फेज-२ मध्ये २६ जुलैला बाराव्या मजल्यावरून एक मांजर खाली ढकलून दिल्याचा

Ambernath : अंबरनाथमध्ये मांजरीला इमारतीवरून फेकून ठार केल्याचा आरोप; पंकजा मुंडेंची दखल, पोलिसांना कारवाईच्या सूचना

मुंबई : अंबरनाथ येथील रॉयल फ्लोरा फेज-2 परिसरात मांजरीला इमारतीच्या 12व्या मजल्यावरून खाली फेकून ठार केल्याचा

MHADA Thane : ठाण्यात म्हाडाची घरं आता स्वस्त! ४४ ते ४६ लाखांत मिळणार सदनिका; नव्याने निघणार लॉटरी

ठाण्यातील चितळसर-मानपाडा येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पातील घरांच्या किमती आता कमी होणार आहेत. उपमुख्यमंत्री

Dog bite incident in Kalyan : कल्याणमध्ये एकाच पिसाळलेल्या भटक्या श्वानाचा धुमाकूळ; अवघ्या सात तासांत तब्बल १३० जणांना घेतला चावा

कल्याण : कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय परिसरातील संदीप हाॅटेल भागात रविवारी दुपारपासून एका पिसाळलेल्या