Corona Update : कोरोनाची पुन्हा एन्ट्री! मुंबई, दिल्लीसह देशात रुग्णसंख्येत वाढ; रुग्णालयांना अलर्ट जारी!

नवी दिल्ली : कोरोना पुन्हा एकदा भारतात शहरी भागांमध्ये डोके वर काढत आहे. दिल्ली, मुंबई, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि केरळसह अनेक राज्यांत रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे केंद्र सरकारने आणि स्थानिक प्रशासनांनी रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.



देशभरातील वाढती कोरोना आकडेवारी:




  • दिल्ली: २३ नवीन रुग्ण; तीन वर्षांतील ही पहिली मोठी नोंद. दिल्ली सरकारने बेड्स, ऑक्सिजन सिलिंडर, टेस्ट किट्स आणि लस स्टॉक सज्ज ठेवण्याचे आदेश दिले.




  • मुंबई: मे महिन्यात आतापर्यंत ९५ रुग्ण; यातील फक्त १६ रुग्ण रुग्णालयात दाखल. लक्षणे असणाऱ्यांना टेस्ट करण्याचे आवाहन.




  • ठाणे: तीन दिवसांत १० रुग्ण सापडले.




  • केरळ: मे महिन्यात २७२ रुग्णांची नोंद – देशातील सर्वाधिक. मास्क बंधनकारक; रुग्णालये अलर्ट मोडवर.




  • कर्नाटक: ३५ नवीन रुग्ण; एका ९ महिन्यांच्या बाळालाही लागण.




  • नोएडा-गाझियाबाद: नव्याने रुग्ण आढळले.




ही वाढ JN.1 ओमिक्रॉन सब-व्हेरियंटमुळे होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हा प्रकार सध्या जास्त गंभीर नसला, तरी लक्षणे सौम्य असून ताप, गळा खवखवणे, नाक वाहणे, थकवा, डोकेदुखी अशी सामान्य लक्षणे दिसत आहेत.



सतर्क राहा, पण घाबरू नका, असा सल्ला आरोग्य यंत्रणेकडून देण्यात येत आहे. प्रशासनांनी औषधांचा पुरेसा साठा ठेवला असून, इन्फ्लुएंझा आणि सिव्हियर रेस्पिरेटरी इन्फेक्शनची माहिती दररोज अपलोड करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.


सूचना: लक्षणं आढळल्यास त्वरित टेस्ट करून घ्या, मास्क वापरा आणि गर्दी टाळा.

Comments
Add Comment

Sukhoi Su-30 MKI Crashes: भारतीय हवाई दलाचे सुखोई-३० लढाऊ विमान कोसळले; टेकऑफनंतर बेपत्ता, पायलटचे काय झाले?

मुंबई: भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता सुखोई-३० लढाऊ विमानाबाबत नवीन बातमी समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे