Corona Update : कोरोनाची पुन्हा एन्ट्री! मुंबई, दिल्लीसह देशात रुग्णसंख्येत वाढ; रुग्णालयांना अलर्ट जारी!

  86

नवी दिल्ली : कोरोना पुन्हा एकदा भारतात शहरी भागांमध्ये डोके वर काढत आहे. दिल्ली, मुंबई, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि केरळसह अनेक राज्यांत रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे केंद्र सरकारने आणि स्थानिक प्रशासनांनी रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.



देशभरातील वाढती कोरोना आकडेवारी:




  • दिल्ली: २३ नवीन रुग्ण; तीन वर्षांतील ही पहिली मोठी नोंद. दिल्ली सरकारने बेड्स, ऑक्सिजन सिलिंडर, टेस्ट किट्स आणि लस स्टॉक सज्ज ठेवण्याचे आदेश दिले.




  • मुंबई: मे महिन्यात आतापर्यंत ९५ रुग्ण; यातील फक्त १६ रुग्ण रुग्णालयात दाखल. लक्षणे असणाऱ्यांना टेस्ट करण्याचे आवाहन.




  • ठाणे: तीन दिवसांत १० रुग्ण सापडले.




  • केरळ: मे महिन्यात २७२ रुग्णांची नोंद – देशातील सर्वाधिक. मास्क बंधनकारक; रुग्णालये अलर्ट मोडवर.




  • कर्नाटक: ३५ नवीन रुग्ण; एका ९ महिन्यांच्या बाळालाही लागण.




  • नोएडा-गाझियाबाद: नव्याने रुग्ण आढळले.




ही वाढ JN.1 ओमिक्रॉन सब-व्हेरियंटमुळे होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हा प्रकार सध्या जास्त गंभीर नसला, तरी लक्षणे सौम्य असून ताप, गळा खवखवणे, नाक वाहणे, थकवा, डोकेदुखी अशी सामान्य लक्षणे दिसत आहेत.



सतर्क राहा, पण घाबरू नका, असा सल्ला आरोग्य यंत्रणेकडून देण्यात येत आहे. प्रशासनांनी औषधांचा पुरेसा साठा ठेवला असून, इन्फ्लुएंझा आणि सिव्हियर रेस्पिरेटरी इन्फेक्शनची माहिती दररोज अपलोड करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.


सूचना: लक्षणं आढळल्यास त्वरित टेस्ट करून घ्या, मास्क वापरा आणि गर्दी टाळा.

Comments
Add Comment

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला

Vande Bharat Express: रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात केला बदल, जाणून घ्या आता सेमी हाय स्पीड ट्रेन किती वाजता धावणार?

नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सर्वात प्रतिष्ठित आणि आरामदायी ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये

India Post: ट्रम्प टॅरिफमुळे अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरती स्थगित, भारतीय टपालची घोषणा

नवी दिल्ली:  ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या ५० टॅरिफच्या निर्णयानंतर भारतीय टपाल (India Post) ने अमेरिकेकडे जाणारी