Chhagan Bhujbal: नव्याने मंत्री झालेले भुजबळ राजीनामा देण्यास तयार

मुंबई: राज्याच्या मंत्रिमंडळात नव्याने मंत्री झालेल्या छगन भुजबळांनी आज एक मोठं वक्तव्य केलं आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदावरून राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी छगन  भुजबळांची वर्णी लागली चर्चा आहे.  त्यामुळे जर धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर मी राजीनामा देईन असे छगन भुजबळ म्हणाले.


महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांना डावलण्यात आलं होतं. त्यामुळे भुजबळ काहीसे नाराज होते. त्यांनी अनेकदा आपली नाराजी प्रसारमाध्यमांसमोर बोलूनही दाखवली होती. मात्र, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर तब्बल पाच महिन्यांनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आले.  संतोष देशमुख हत्या प्रकरणात दबाव वाढल्याने धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, ज्यामुळे भुजबळांना संधी देण्यात आली अशी चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी प्रसारमध्यमानशी बोलताना मोठे वक्तव्य केलं आहे.



धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर मी राजीनामा देईल: भुजबळ


भविष्यात धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळालं तर भुजबळ काय करणार? असा प्रश्न भुजबळ यांना पत्रकारांकडून विचारण्यात आला. त्यावर छगन भुजबळ यांनी, "उद्या जर धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घ्यायचं ठरलं तर माझी काही हरकत नाही. मी या मंत्रिमंडळात पुन्हा आलोय, सन्मानाने मला परत बोलवलं. धनंजय मुंडे सगळ्यातून मुक्त झाले, त्यांची सगळी लाईन क्लिअर झाली तर मी राजीनामा देईन." असे वक्तव्य केलं आहे.


मंत्रिपद देताना या गोष्टीवर चर्चा झाली होती का या प्रश्नावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, अशा पद्धतीची चर्चा होऊ अगर न होवो, राजीनाम्याचा निर्णय मीच घेणार असे देखील ते पुढे म्हणाले.

Comments
Add Comment

UBT: उबाठाकडून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली; परभणीत बसवला मुस्लिम महापौर

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्या प्रखर हिंदुत्वाचा आणि मराठी

राज्य सरकारचे टाटा ट्रस्ट आणि नाम फाउंडेशनसोबत सामंजस्य करार

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :

Navnath Ban: काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी स्वाभिमानाची भाषा करू नये; नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई: वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार विसरून काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी

PMO Office Shift: तब्बल ७८ वर्षांनंतर पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी पंतप्रधान कार्यालयचा (पीएमओ)

Kiren Rijiju: काँग्रेसच्या खासदारांकडून लोकसभा अध्यक्षांना शिवीगाळ; भाजपा नेत्याकडून व्हिडीओ शेअर

मुंबई: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी (१२ फेब्रुवारी) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या सभागृहातील

मुंबईच्या धर्तीवर 'ठाणे शहर विकास समिती' स्थापन करा; उपमहापौर कृष्णा पाटील यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

ठाणे: ठाणे शहराचा वाढता विस्तार आणि नागरी गरजा लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही 'ठाणे शहर