Chhagan Bhujbal: नव्याने मंत्री झालेले भुजबळ राजीनामा देण्यास तयार

मुंबई: राज्याच्या मंत्रिमंडळात नव्याने मंत्री झालेल्या छगन भुजबळांनी आज एक मोठं वक्तव्य केलं आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदावरून राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी छगन  भुजबळांची वर्णी लागली चर्चा आहे.  त्यामुळे जर धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर मी राजीनामा देईन असे छगन भुजबळ म्हणाले.


महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांना डावलण्यात आलं होतं. त्यामुळे भुजबळ काहीसे नाराज होते. त्यांनी अनेकदा आपली नाराजी प्रसारमाध्यमांसमोर बोलूनही दाखवली होती. मात्र, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर तब्बल पाच महिन्यांनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आले.  संतोष देशमुख हत्या प्रकरणात दबाव वाढल्याने धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, ज्यामुळे भुजबळांना संधी देण्यात आली अशी चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी प्रसारमध्यमानशी बोलताना मोठे वक्तव्य केलं आहे.



धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर मी राजीनामा देईल: भुजबळ


भविष्यात धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळालं तर भुजबळ काय करणार? असा प्रश्न भुजबळ यांना पत्रकारांकडून विचारण्यात आला. त्यावर छगन भुजबळ यांनी, "उद्या जर धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घ्यायचं ठरलं तर माझी काही हरकत नाही. मी या मंत्रिमंडळात पुन्हा आलोय, सन्मानाने मला परत बोलवलं. धनंजय मुंडे सगळ्यातून मुक्त झाले, त्यांची सगळी लाईन क्लिअर झाली तर मी राजीनामा देईन." असे वक्तव्य केलं आहे.


मंत्रिपद देताना या गोष्टीवर चर्चा झाली होती का या प्रश्नावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, अशा पद्धतीची चर्चा होऊ अगर न होवो, राजीनाम्याचा निर्णय मीच घेणार असे देखील ते पुढे म्हणाले.

Comments
Add Comment

खासदारकीसाठी संजय राऊत लवकरच काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करतील - नवनाथ बन

- औरंगजेब फॅन क्लब चालवणा-या संजय राऊतांना हिंदुत्वाच्या बाता मारत भाजपावर टीका करण्याचा अधिकार

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना श्रद्धांजली

मुंबई: ज्यांच्या व्यासंग आणि संशोधनपूर्ण मांडणीमुळे नव्या पिढीसाठी शिव-शाहू चरित्रांचा अमुल्य असा ठेवा उपलब्ध

कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना मोठा दिलासा; हेक्टरी २२ हजार रुपयांपर्यंत मदत देण्याचा राज्य सरकारचा मानस

मुंबई: गेल्या काही दिवसांत झालेल्या अवेळी पाऊस आणि हवामान बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू पिकाचे मोठे नुकसान

राज्यातील ८९ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर १७९८.७८ कोटी रुपयांचे वितरण

शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण मुंबई : नमो

अजित पवार विमान अपघात प्रकरण: घातपाताचा संशय आढळल्यास दोषींची गय करणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत इशारा

विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीसाठी केंद्राकडे मागणी केली; एएआयबीचा अंतरिम अहवाल प्राप्त मुंबई : उपमुख्यमंत्री