Chhagan Bhujbal: नव्याने मंत्री झालेले भुजबळ राजीनामा देण्यास तयार

मुंबई: राज्याच्या मंत्रिमंडळात नव्याने मंत्री झालेल्या छगन भुजबळांनी आज एक मोठं वक्तव्य केलं आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदावरून राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी छगन  भुजबळांची वर्णी लागली चर्चा आहे.  त्यामुळे जर धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर मी राजीनामा देईन असे छगन भुजबळ म्हणाले.


महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांना डावलण्यात आलं होतं. त्यामुळे भुजबळ काहीसे नाराज होते. त्यांनी अनेकदा आपली नाराजी प्रसारमाध्यमांसमोर बोलूनही दाखवली होती. मात्र, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर तब्बल पाच महिन्यांनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आले.  संतोष देशमुख हत्या प्रकरणात दबाव वाढल्याने धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, ज्यामुळे भुजबळांना संधी देण्यात आली अशी चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी प्रसारमध्यमानशी बोलताना मोठे वक्तव्य केलं आहे.



धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर मी राजीनामा देईल: भुजबळ


भविष्यात धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळालं तर भुजबळ काय करणार? असा प्रश्न भुजबळ यांना पत्रकारांकडून विचारण्यात आला. त्यावर छगन भुजबळ यांनी, "उद्या जर धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घ्यायचं ठरलं तर माझी काही हरकत नाही. मी या मंत्रिमंडळात पुन्हा आलोय, सन्मानाने मला परत बोलवलं. धनंजय मुंडे सगळ्यातून मुक्त झाले, त्यांची सगळी लाईन क्लिअर झाली तर मी राजीनामा देईन." असे वक्तव्य केलं आहे.


मंत्रिपद देताना या गोष्टीवर चर्चा झाली होती का या प्रश्नावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, अशा पद्धतीची चर्चा होऊ अगर न होवो, राजीनाम्याचा निर्णय मीच घेणार असे देखील ते पुढे म्हणाले.

Comments
Add Comment

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

तेजस्वी यादव '४२०' आरोपी, त्यांच्याकडे विश्वासार्हताच नाही, बिहारला मोदी-नितीश यांचे 'डबल इंजिन' सरकारच हवे!; रवी शंकर प्रसाद यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप खासदार रवी शंकर प्रसाद यांनी आज महागठबंधनचे

ठाकरे बंधूंमुळे काँग्रेसमध्ये दोन गट? एकत्र निवडणूक लढण्यास भाई जगतापांचा स्पष्ट नकार

मुंबई : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही, असे वक्तव्य

Prakash Mahajan : 'तो' वारसा फक्त पंकू ताईंचा! करुणा शर्मांच्या विधानाला मनसेच्या माजी नेत्याचे प्रत्युत्तर; प्रकाश महाजनांची पोस्ट चर्चेत

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे राजकीय वारसदार कोण, यावरून