कोमट पाणी पिण्याचे अफलातून फायदे

पाण्याला जीवन असं म्हटलं जातं.. निरोगी आयुष्य जगण्यासाठी भरपूर पाणी प्यायला हवं. पुरेसं पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करणं आरोग्यदायी मानलं जातं. त्यात गरम किंवा कोमट पाणी रोज सकाळी उठल्यावर पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचं आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात. काही दिवसात पावसाला सुरू होतोय. त्यामुळं गरम पाणी प्यायल्यानं कोणते फायदे होऊ शकतात ते आपण पाहूया...


शरीराचं चयापचय आणि आरोग्य नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज सुमारे आठ ते १० ग्लास पाणी प्यायला हवं. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, अशा लोकांनी गरम पाण्याचं सेवन केलं, तर तुमची पचनशक्ती मजबूत होईल आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवणार नाही.


कोमट पाणी प्यायल्यास काही प्रमाणांत चोंदलेल्या नाकाला आराम मिळतो आणि बंद नाकाची तक्रारही दूर होते.


कोमट पाणी प्यायल्याने मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यास मदत मिळते.. गरम पाणी प्यायल्यानं त्वचा शरीराच्या आतून हायड्रेट राहते, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार दिसते. गरम पाण्यानं पचनक्रिया सुधारते आणि पोटातील गॅसची समस्या कमी होते.


सकाळी सकाळी तुम्ही गरम पाणी प्यायल्यास पचनक्रिया लगेचच सुरू होते आणि शरीरातील विषद्रव्य पदार्थही निघून जाण्यास मदत होते.

Comments
Add Comment

Lalbaug visarjan 2025: मुंबईच्या एकतेचे दर्शन: लालबागचा राजा आणि भायखळ्याची हिंदुस्तानी मशीद Video पहाच..

मुंबई: आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देताना, मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्यात एक अनोखे आणि

"खासदारांना मिळणार राजेशाही निवास! ७ BHK, मॉड्युलर किचनसह सर्व सोयी"

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत दिल्लीच्या बाबा खडकसिंह मार्गावर नव्याने बांधलेल्या खासदारांच्या खास

पुणे जिल्ह्याचा कायापालट होणार , ३ नव्या महापालिका तयार होणार

पुणे : पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठी

महाराष्ट्रातील सरपंचांना दिल्लीत मोठा मान

महाराष्ट्रातील १७ सरपंचांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीतून आमंत्रण नवी दिल्ली : यंदाच्या

Rakhi : रक्षाबंधनासाठी २१ हजार कोटींचे मार्केट सज्ज!

राखी, मिठाई, फळे, गिफ्टमधून कोट्यवधींची उलाढाल रक्षाबंधनाच्या आगमनाने देशभरातील बाजारपेठा रंगीबेरंगी आणि

प्रणिती शिंदे वादात, स्वत:च खोदला खड्डा

प्रणिती शिंदेंचे वादग्रस्त वक्तव्य, चित्रा वाघांनी सुनावलं पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या ऑपरेशन