कोमट पाणी पिण्याचे अफलातून फायदे

पाण्याला जीवन असं म्हटलं जातं.. निरोगी आयुष्य जगण्यासाठी भरपूर पाणी प्यायला हवं. पुरेसं पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करणं आरोग्यदायी मानलं जातं. त्यात गरम किंवा कोमट पाणी रोज सकाळी उठल्यावर पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचं आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात. काही दिवसात पावसाला सुरू होतोय. त्यामुळं गरम पाणी प्यायल्यानं कोणते फायदे होऊ शकतात ते आपण पाहूया...


शरीराचं चयापचय आणि आरोग्य नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज सुमारे आठ ते १० ग्लास पाणी प्यायला हवं. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, अशा लोकांनी गरम पाण्याचं सेवन केलं, तर तुमची पचनशक्ती मजबूत होईल आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवणार नाही.


कोमट पाणी प्यायल्यास काही प्रमाणांत चोंदलेल्या नाकाला आराम मिळतो आणि बंद नाकाची तक्रारही दूर होते.


कोमट पाणी प्यायल्याने मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यास मदत मिळते.. गरम पाणी प्यायल्यानं त्वचा शरीराच्या आतून हायड्रेट राहते, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार दिसते. गरम पाण्यानं पचनक्रिया सुधारते आणि पोटातील गॅसची समस्या कमी होते.


सकाळी सकाळी तुम्ही गरम पाणी प्यायल्यास पचनक्रिया लगेचच सुरू होते आणि शरीरातील विषद्रव्य पदार्थही निघून जाण्यास मदत होते.

Comments
Add Comment

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न स्वप्नच रहाणार, ४२६ फ्लॅट्सची सोडत, पण किंमती आवाक्याबाहेर? वाचा A टू Z

मुंबईत ‘घर’ का परवडेना? किंमत ५४ लाखांपासून १ कोटीपर्यंत! मग 'अत्यल्प व अल्प उत्पन्न' गटाचा नेमका अर्थ काय? मुंबई :

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस ‘मातोश्री’त का ठेवला ?' नार्को टेस्ट कराच!

बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावरुन नवा वाद, रामदास कदमांनी दिली धक्कादायक माहिती मुंबई : गोरेगावच्या नेस्को

ठाकरे बंधूंच्या 'युती'आधीच राजकीय 'बॉम्ब'! 'युती'चा सस्पेन्स कायम!

महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने धुरळा नव्हे तर चक्क चिखलफेक पहायला मिळाली. सर्वांचं

शिंदेंचं एक पाऊल मागे! निवडणुकीत शिवसेना धाकटा भाऊ होणार, शिंदेंना कमी जागा मिळणार?

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डावपेच आणि रणनीतीमुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा बॅकफूटवर गेलेत.