पुणे जिल्ह्यातील वैष्णवी प्रकरणाची नाशिक जिल्ह्यात पुनरावृत्ती

नाशिक : सासरच्या छळामुळे त्रासलेल्या सूनेने आत्महत्या करण्याचा प्रकार पुणे जिल्ह्यात घडला. पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची नाशिक जिल्ह्यात पुनरावृत्ती झाली. नाशिक जिल्ह्यात सासरच्या छळामुळे त्रासलेल्या भक्ती अथर्व गुजराथी या ३७ वर्षांच्या महिलेने आत्महत्या केली. ही घटना नाशिक जिल्ह्यातील गंगापूर परिसरात घडली. भक्तीनेही वैष्णवी प्रमाणेच गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पती आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस तपास सुरू आहे.

भक्ती यांचा अथर्व यांच्याशी सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. या दांपत्याला पाच वर्षांचा मुलगा आहे. लग्नानंतर सासरच्या लोकांकडून भक्ती यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता, असा आरोप त्यांच्या वडिलांनी केला. काही काळ भक्ती माहेरी राहण्यास आली होती. अथर्वने समजूत काढून काही दिवसांपूर्वी भक्तीला घरी नेले होते. सासरी पोहोचताल्यावर पुन्हा एकदा सासरच्यांकडून भक्तीचा जाच करणे सुरू झाले. या जाचाला कंटाळून भक्तीने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर भक्तीच्या आई, वडिलांनी गुजराथी कुटुंबाविरोधात पोलीस तक्रार नोंदवली. अथर्वसह त्याच्या कुटुंबावर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

वैष्णवी हगवणे प्रमाणेच भक्ती गुजराथीच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे भक्ती यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या घडवून ती आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी सखोल तपास करण्याची मागणी भक्तीच्या कुटुंबाने केली आहे. भक्तीच्या मुलाचा ताबा मिळावा यासाठीही तिचे कुटुंब आग्रही आहे.

पुणे जिल्ह्यातील हडपसरमध्येही एका विवाहितेने आत्महत्या केली. महिन्याभरापूर्वीच लग्न झालेल्या दीपा पुजारीने सासरचा जाच असह्य झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलले.
Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा