पुणे जिल्ह्यातील वैष्णवी प्रकरणाची नाशिक जिल्ह्यात पुनरावृत्ती

नाशिक : सासरच्या छळामुळे त्रासलेल्या सूनेने आत्महत्या करण्याचा प्रकार पुणे जिल्ह्यात घडला. पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची नाशिक जिल्ह्यात पुनरावृत्ती झाली. नाशिक जिल्ह्यात सासरच्या छळामुळे त्रासलेल्या भक्ती अथर्व गुजराथी या ३७ वर्षांच्या महिलेने आत्महत्या केली. ही घटना नाशिक जिल्ह्यातील गंगापूर परिसरात घडली. भक्तीनेही वैष्णवी प्रमाणेच गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पती आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस तपास सुरू आहे.

भक्ती यांचा अथर्व यांच्याशी सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. या दांपत्याला पाच वर्षांचा मुलगा आहे. लग्नानंतर सासरच्या लोकांकडून भक्ती यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता, असा आरोप त्यांच्या वडिलांनी केला. काही काळ भक्ती माहेरी राहण्यास आली होती. अथर्वने समजूत काढून काही दिवसांपूर्वी भक्तीला घरी नेले होते. सासरी पोहोचताल्यावर पुन्हा एकदा सासरच्यांकडून भक्तीचा जाच करणे सुरू झाले. या जाचाला कंटाळून भक्तीने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर भक्तीच्या आई, वडिलांनी गुजराथी कुटुंबाविरोधात पोलीस तक्रार नोंदवली. अथर्वसह त्याच्या कुटुंबावर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

वैष्णवी हगवणे प्रमाणेच भक्ती गुजराथीच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे भक्ती यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या घडवून ती आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी सखोल तपास करण्याची मागणी भक्तीच्या कुटुंबाने केली आहे. भक्तीच्या मुलाचा ताबा मिळावा यासाठीही तिचे कुटुंब आग्रही आहे.

पुणे जिल्ह्यातील हडपसरमध्येही एका विवाहितेने आत्महत्या केली. महिन्याभरापूर्वीच लग्न झालेल्या दीपा पुजारीने सासरचा जाच असह्य झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलले.
Comments
Add Comment

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु