आजीच्या कुशीत वैष्णवीचं बाळ

वैष्णवीचं बाळ कस्पटेंच्या घरात सुरक्षित


अवघ्या २४ वर्षीय वैष्णवीचा लग्नानंतर दोन वर्षातच दुर्दैवी अंत झाला. पैशाच्या हव्यासापोटी एका लेकीचा बळी गेला. चिमुकला जीव पोरका झाला. त्याचा लवकर ताबा मिळावा, यासाठी माहेरच्यांचा जीव कासावीस होत होता. अखेर पाच दिवसांच्या अश्रूंनंतर वैष्णवीच्या दहा महिन्याच्या बाळाला आजीच्या कुशीत विसावण्याची जागा मिळाली. आमची मुलगी गेली... पण तिची माया परत आली, अशा भावनांनी भारावलेल्या वैष्णवीच्या आई स्वाती कस्पटे यांनी नातवाला मिठीत घेतलं. बाळाला पाहून कस्पटे कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले...


?si=qWXfNHl9mZuFj7HZ

ही कहाणी आहे वैष्णवी शशांक हगवणे या २४ वर्षीय विवाहितेची. जिनं आयुष्यातील सगळी स्वप्नं एका धाग्यात गुंफली. मात्र, १७ मे रोजी तिनं गळफास घेत आत्महत्या केली. ही आत्महत्या नाही, तर छळ करून केलेला घात होता, असा आरोप तिच्या पालकांनी केला. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा दहा महिन्यांचा चिमुरडा जनकराजे पोरका झाला. यातील त्रासदायक बाब म्हणजे तिच्या मृत्यूनंतर बाळाचा पत्ता लागू शकत नव्हता. पाच दिवसांपासून त्या बाळाचा ठावठिकाणा नव्हता. अचानक एका अनोळखी व्यक्तीनं बाळाची आजी स्वाती कस्पटे यांना फोन करून तुम्ही शोधत असलेले बाळ माझ्याकडे आहे, असं सांगितलं. हा फोन कॉल म्हणजे अंधारात आशेचा एक टिमटिमता दिवा होता. त्या व्यक्तीनं बाळ घेण्यासाठी बाणेर इथं महामार्गावर बोलावलं. तिथं गेल्यावर चिमुकल्या जनकराजेला आजीच्या स्वाधीन केलं. तो व्यक्ती निघून गेला. बाळ आजी-आजोबांच्या खुशीत सुखरूप आले.


बाळाचे आजोबा अनिल कस्पटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, केवळ आमचं नातवंड नाही, ती आमची वैष्णवी आहे. तिची आठवण, तिची सावली आमच्यासोबत आहे. आम्ही त्याचं बालपण प्रेमानं, काळजीनं फुलवणार आहोत. त्याला आता कोणीही आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही...

Comments
Add Comment

रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक; मंत्री आदिती तटकरे

मुंबई :  रस्त्यावर राहणाऱ्या, अनाथ, एकल आणि दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ पथदर्शी योजना सहा

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

टेक-महाइम्पॅक्ट परिषदेत पहिल्याच दिवशी १५० कोटींचे करार

मुंबई : राज्याच्या तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकासाला मोठी गती देण्यासाठी ‘आयटी’ विभागाच्या वतीने बुधवारी

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत; कृषि मंत्री दत्तात्रय भरणे

द्राक्ष पिकाचा समावेश करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी

Riyan Parag :‘मी काहीही केलं तरी…’ रियान परागचा संताप अनावर; समालोचकांनाही दिला थेट इशारा

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये काल म्हणजेच मंगळवार, १९ मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात जयपूरच्या