हगवणे कुटुंबाने वैष्णवीचाच नाही तर तिच्या बाळाचाही छळ केला, कस्पटे कुटुंबाचा आरोप

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आता नवनवी माहिती हाती येऊ लागली आहे. हगवणे कुटुंबाने पैशांसाठी वैष्णवीचा छळ केला. या छळाला त्रासलेल्या वैष्णवीने गळफास घेत जीवन संपवले. आता वैष्णवीच्या बाळाचाही छळ झाल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने हस्तक्षेप केल्यानंतर वैष्णवीच्या बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबाला मिळाला आहे. बाळ वैष्णवीच्या माहेरी सुरक्षित आहे. पोलिसांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पती शशांक हगवणे, सासू लता, नणंद करिष्मा, सासरा राजेंद्र आणि दीर सुशील या पाच जणांना अटक केली आहे. पण वैष्णवीच्या बाळाची म्हणजेच जनकराजेची तब्येत अचानक बिघडली. त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आले. वैद्यकीय तपासणी केल्यावर हगवणे कुटुंबाने जनकराजेचाही छळ केल्याचा आरोप कस्पटे कुटुंबाने केला आहे.

वैष्णवीच्या मृत्यूनंतर बाळाला एका व्यक्तीकडे सोपवण्यात आले होते. बाळाचा ठावठिकाणा कोणालाही लवकर कळू नये यासाठी बाळाला सतत गुंगीचे इंजेक्शन देऊन झोपेतच ठेवले जात होते. जेमतेम नऊ महिन्यांच्या बाळाला सतत तीन दिवस गुंगीचे इंजेक्शन देण्यात आले होते. या सततच्या इंजेक्शनचा प्रतिकूल परिणाम झाला आणि बाळाच्या कंबरेजवळ गाठ आली. जनकराजेच्या कमरेला गाठ आल्याचे लक्षात येताच कस्पटे कुटुंबाने बाळाला डॉक्टरांकडे नेले. वैद्यकीय तपासणीतून बाळावर झालेल्या अत्याचाराचा अंदाज आल्याचे कस्पटे कुटुंबाने सांगितले.
Comments
Add Comment

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

आनंदाची बातमी, लाखो लोकांना पक्की घरं मिळणार !

प्रतिनिधी: प्रसारमाध्यमांनी दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत

अभिमानास्पद! GII १३९ देशांमध्ये भारत ३९ व्या क्रमांकावर पोहोचला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी:प्रसिद्ध जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या ग्लोबल इनोव्हेशनह इंडेक्स २०२५ (Global Innovation Index GII)मध्ये भारत १३९