हगवणे कुटुंबाने वैष्णवीचाच नाही तर तिच्या बाळाचाही छळ केला, कस्पटे कुटुंबाचा आरोप

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आता नवनवी माहिती हाती येऊ लागली आहे. हगवणे कुटुंबाने पैशांसाठी वैष्णवीचा छळ केला. या छळाला त्रासलेल्या वैष्णवीने गळफास घेत जीवन संपवले. आता वैष्णवीच्या बाळाचाही छळ झाल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने हस्तक्षेप केल्यानंतर वैष्णवीच्या बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबाला मिळाला आहे. बाळ वैष्णवीच्या माहेरी सुरक्षित आहे. पोलिसांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पती शशांक हगवणे, सासू लता, नणंद करिष्मा, सासरा राजेंद्र आणि दीर सुशील या पाच जणांना अटक केली आहे. पण वैष्णवीच्या बाळाची म्हणजेच जनकराजेची तब्येत अचानक बिघडली. त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आले. वैद्यकीय तपासणी केल्यावर हगवणे कुटुंबाने जनकराजेचाही छळ केल्याचा आरोप कस्पटे कुटुंबाने केला आहे.

वैष्णवीच्या मृत्यूनंतर बाळाला एका व्यक्तीकडे सोपवण्यात आले होते. बाळाचा ठावठिकाणा कोणालाही लवकर कळू नये यासाठी बाळाला सतत गुंगीचे इंजेक्शन देऊन झोपेतच ठेवले जात होते. जेमतेम नऊ महिन्यांच्या बाळाला सतत तीन दिवस गुंगीचे इंजेक्शन देण्यात आले होते. या सततच्या इंजेक्शनचा प्रतिकूल परिणाम झाला आणि बाळाच्या कंबरेजवळ गाठ आली. जनकराजेच्या कमरेला गाठ आल्याचे लक्षात येताच कस्पटे कुटुंबाने बाळाला डॉक्टरांकडे नेले. वैद्यकीय तपासणीतून बाळावर झालेल्या अत्याचाराचा अंदाज आल्याचे कस्पटे कुटुंबाने सांगितले.
Comments
Add Comment

मुंबई महापालिकेत निम्म्यापेक्षा अधिक नवीन चेहरे

तब्बल ११७ प्रथमच आले निवडून, केवळ १०० अनुभवी नगरसेवक मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल

मुंबई महापालिकेत पुन्हा महिलांचाच आवाज, १३० नगरसेविका आल्या निवडून

मुबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महिलांनी बाजी मारल्याचे दिसून येत असून या

मुस्लीम मतदारांची मते यापुढेही निर्णायक ठरणार

मुंबई : संपूर्ण राज्यातील महानगरपालिकांमध्ये एआयएमआयएमचे ९५ च्या आसपास नगरसेवक निवडून आले असून त्यात मुंबईतील

महापालिकेतील नामनिर्देशित नगरसेवकांची संख्या दुप्पट

मागच्या दाराने महापालिकेत प्रवेश करण्यासाठी अनेकांची पक्षाकडे लॉबिंग भाजपला चार आणि उबाठाच्या तीन जणांची

मनपा निवडणुकीच्या निकालानंतर कोल्हापुरात काँग्रेसला धक्का

गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

जे साथ देतील त्यांच्यासोबत, अन्यथा त्यांच्याशिवाय पुढे जाऊ!- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राजकारणात कोणीही शत्रू नाही

मुंबई : “निवडणुका संपल्या, आता आमचा कोणीही शत्रू नाही. जे असतील, ते आमचे वैचारिक विरोधक आहेत. त्यामुळे मुंबईच्या