हगवणे कुटुंबाने वैष्णवीचाच नाही तर तिच्या बाळाचाही छळ केला, कस्पटे कुटुंबाचा आरोप

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आता नवनवी माहिती हाती येऊ लागली आहे. हगवणे कुटुंबाने पैशांसाठी वैष्णवीचा छळ केला. या छळाला त्रासलेल्या वैष्णवीने गळफास घेत जीवन संपवले. आता वैष्णवीच्या बाळाचाही छळ झाल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने हस्तक्षेप केल्यानंतर वैष्णवीच्या बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबाला मिळाला आहे. बाळ वैष्णवीच्या माहेरी सुरक्षित आहे. पोलिसांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पती शशांक हगवणे, सासू लता, नणंद करिष्मा, सासरा राजेंद्र आणि दीर सुशील या पाच जणांना अटक केली आहे. पण वैष्णवीच्या बाळाची म्हणजेच जनकराजेची तब्येत अचानक बिघडली. त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आले. वैद्यकीय तपासणी केल्यावर हगवणे कुटुंबाने जनकराजेचाही छळ केल्याचा आरोप कस्पटे कुटुंबाने केला आहे.

वैष्णवीच्या मृत्यूनंतर बाळाला एका व्यक्तीकडे सोपवण्यात आले होते. बाळाचा ठावठिकाणा कोणालाही लवकर कळू नये यासाठी बाळाला सतत गुंगीचे इंजेक्शन देऊन झोपेतच ठेवले जात होते. जेमतेम नऊ महिन्यांच्या बाळाला सतत तीन दिवस गुंगीचे इंजेक्शन देण्यात आले होते. या सततच्या इंजेक्शनचा प्रतिकूल परिणाम झाला आणि बाळाच्या कंबरेजवळ गाठ आली. जनकराजेच्या कमरेला गाठ आल्याचे लक्षात येताच कस्पटे कुटुंबाने बाळाला डॉक्टरांकडे नेले. वैद्यकीय तपासणीतून बाळावर झालेल्या अत्याचाराचा अंदाज आल्याचे कस्पटे कुटुंबाने सांगितले.
Comments
Add Comment

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र मिळणार, प्रमाणपत्र स्विकारण्यासाठी मंत्री शेलार फान्सला जाणार

मुंबई : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या

महाशिवरात्रीनिमित्त कोकण रेल्वेकडून विशेष रेल्वे; जाणून घ्या वेळ आणि स्थानके

मुंबई : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वेने

नालासोपाऱ्यात बांधकामस्थळी अल्पवयीन मुलाचा अपघाती मृत्यू; पोलिसांकडून चौकशी सुरू

नालासोपारा : नालासोपारा पूर्व भागात सुरू असलेल्या एका बांधकाम प्रकल्पात घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका

IND vs PAK सामना निश्चित; ICCच्या हस्तक्षेपानंतर पाकिस्तानने १० दिवसात टेकले गुडघे

मुंबई : भारत–पाकिस्तान क्रिकेट सामना होणार की नाही, या मुद्द्यावर निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. टी-20 वर्ल्ड

150 days E-Governance Reform Program: ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा

मुंबई: राज्यातील शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राबवण्यात आलेल्या १५०

पक्ष विलीकरणाच्या चर्चा, तरीही सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा ठरला; मोदी-शहांची लवकरच होणार भेट

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गेल्या महिन्यात विमान अपघातात निधन झाले. आणि प्रश्न निर्माण