Operation Trashi : पाकड्यांशी लढताना ब्राह्मणवाड्याच्या सुपुत्राला वीरमरण

  48

डोळ्यात तेल घालून शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील वीर जवान संदीप पांडुरंग गायकरला गुरुवारी वीर मरण आले. काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. त्यानंतर बोकाळलेल्या पाकड्यांकडून अधून-मधून सीमेवर गोळीबार केला जात आहे. गुरुवारी पहाटे दहा भारतीय जवानांची तुकडी जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर तैनात होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देताना लढता लढता संदीप गायकर शहीद झाले.



संदीप गायकर अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावाचे रहिवासी होते. अत्यंत शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक म्हणून त्यांना ओळखले जात. भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आलं. सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात संदीप गायकर यांचे दोन सहकारीही गंभीर जखमी झाले. शत्रूशी दोन हात करताना भूमीपूत्र शहीद झाल्याने वृत्त गुरुवारी गावात धडकले. त्यानंतर सर्वत्र शोककळा पसरली.



संदीप यांनी देशासाठी केलेला त्याग आणि दिलेलं बलिदान कायम प्रेरणादायी राहीलं, अशी भावना ब्राह्मणवाड्यातील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. शहीद जवान संदीप गायकर यांच्यावर शुक्रवारी ब्राह्मणवाडा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

खासगी दुचाकींना बाईक टॅक्सी सेवा देण्यास केंद्र सरकारची परवानगी

नवी दिल्ली : देशात प्रथमच केंद्र सरकारने खासगी वापरासाठी नोंदणीकृत दुचाकींना राईड-हेलिंग अ‍ॅग्रीगेटर

Cloudburst Updates : एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर, भूस्खलन अन् ३० जण... हिमाचल प्रदेशात हाहाकार

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशात नैसर्गिक संकटाने तेथील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. अनेक रस्ते भूस्खलनाने बंद

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण