Operation Trashi : पाकड्यांशी लढताना ब्राह्मणवाड्याच्या सुपुत्राला वीरमरण

डोळ्यात तेल घालून शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील वीर जवान संदीप पांडुरंग गायकरला गुरुवारी वीर मरण आले. काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. त्यानंतर बोकाळलेल्या पाकड्यांकडून अधून-मधून सीमेवर गोळीबार केला जात आहे. गुरुवारी पहाटे दहा भारतीय जवानांची तुकडी जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर तैनात होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देताना लढता लढता संदीप गायकर शहीद झाले.



संदीप गायकर अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावाचे रहिवासी होते. अत्यंत शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक म्हणून त्यांना ओळखले जात. भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आलं. सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात संदीप गायकर यांचे दोन सहकारीही गंभीर जखमी झाले. शत्रूशी दोन हात करताना भूमीपूत्र शहीद झाल्याने वृत्त गुरुवारी गावात धडकले. त्यानंतर सर्वत्र शोककळा पसरली.



संदीप यांनी देशासाठी केलेला त्याग आणि दिलेलं बलिदान कायम प्रेरणादायी राहीलं, अशी भावना ब्राह्मणवाड्यातील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. शहीद जवान संदीप गायकर यांच्यावर शुक्रवारी ब्राह्मणवाडा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन