अहिल्यानगरमध्ये संभाव्य दुर्घटनेचा धोका! विद्युत तारांवर लटकलेला फ्लेक्स, प्रशासन दुर्लक्ष करतंय?

अहिल्यानगर: राज्यात गेल्या वर्षी घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत १७ जणांना जीव गमवावा लागला होता. यानंतर राज्यभरात अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग्सविरोधात कडक कारवाईचे आदेश देण्यात आले. मात्र, अजूनही अनेक ठिकाणी प्रशासनाचा हलगर्जीपणा जीवघेणा ठरू शकतो, याचा ताजा प्रत्यय काल अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळाला.


पोलीस अधीक्षक कार्यालय चौकात काल वादळी वाऱ्यामुळे एक मोठा फ्लेक्स तुटून थेट मुख्य वीज वाहक तारांवर अडकला. परिणामी, त्या परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सदर ठिकाणी दिवसभरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते, त्यामुळे कोणतीही चूक जीवघेणी ठरू शकते.



विजेच्या तारांवर लटकणारे फ्लेक्स, नागरिकांमध्ये तीव्र संताप


गेल्या १२ ते १४ तासांपासून हा फ्लेक्स लटकत असून, महावितरण, महानगरपालिका किंवा पोलीस प्रशासनाकडून यावर कोणतीही तत्काळ कारवाई झालेली नाही. परिणामी, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत, प्रशासनाला प्रश्न विचारला आहे की, "मुंबईच्या घाटकोपर दुर्घटनेची पुन्हा पुनरावृत्ती होईपर्यंत प्रशासन डोळेझाक करत राहणार का?". सदर प्रकारावर त्वरीत कारवाई करून फ्लेक्स हटवण्यात यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया