भारताला स्वसंरक्षणाचा पूर्ण हक्क, ऑपरेशन सिंदूरवर भारताला मिळाला जर्मनीचा पाठिंबा

नवी दिल्ली: दहशतवादाविरुद्ध लाँच केलेल्या भारताच्या सिंदूर ऑपरेशनला जर्मनीने पाठिंबा दिला आहे. जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वेडफुल यांनी सांगितले की दहशतवादाविरुद्ध भारताला आपले संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यासोबतच त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.


ते म्हणाले, आम्ही २२ एप्रिलला भारतावर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याने स्तब्ध झालोत. नागरिकांवर झालेल्या या हल्ल्याची आम्ही निंदा करतो. आमच्या संवेदना पीडितांसोबत आहेत. भारताला निश्चितच दहशतवादाविरुद्ध स्वत:चा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे.



काय म्हणाले एस जयशंकर?


मी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या भारताच्या प्रतिक्रियेनंतर लगेचच बर्लिनला आलो आहे. भारत दहशतवाद कधीच सहन करणार नाही. भारत कधीही अण्वस्त्र धमकीला बधणार नाही आणि भारत पाकिस्तानसोबत पूर्णपणे द्विपक्षीय पद्धतीने व्यवहार करेल. या संबंधात कोणत्याही प्रकारचा भ्रम नसला पाहिजे. आम्ही जर्मनीच्या भूमिकेलाही महत्त्व देतो. प्रत्येक देशाला दहशतवादाविरुद्ध स्वत:चे संरक्षण करण्याचा अधिकार आहे.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू