गडचिरोलीत चार नक्षलवादी ठार

गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातील कवंडे पोलीस मदत केंद्रापासून जवळ असलेल्या जंगलात चकमक झाली. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिला नक्षलवादी आहेत.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम.रमेश यांच्या नेतृत्वात सी-६० पथकाचे ३०० जवान आणि केंद्रीय राखीव दलाची एक तुकडी गुरुवारी दुपारी कवंडे आणि नेलगुंडा येथून इंद्रावती नदी परिसरात रवाना Penr होती. या सुरक्षा पथकाशी नक्षलवाद्यांची चकमक झाली. चकमकीत दोन पुरुष आणि दोन महिला असे एकूण चार नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा पथकाने घटनास्थळावरुन एक स्वयंचलित रायफल, एक ३०३ रायफल, एक भरमार बंदूक, वॉकीटॉकी आणि इतर साहित्य जप्त केले. याआधी २१ मे रोजी सुरक्षा पथकाने नक्षलवाद्यांचा नेता नंबाला केशव राव उर्फ गगन्ना याच्यासह २७ नक्षलवाद्यांना ठार केले होते.

मागील तीन दिवसांपासून कवंडे आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसात गडचिरोलीचत सुरक्षा पथकांनी नक्षलवाद्यांना दणका दिला. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये करेगुट्टा येथे सुरक्षा पथकाने ३१ नक्षलवाद्यांना ठार केले होते. नंतर अबुझमाडमध्ये नक्षलवाद्यांच्या सर्वोच्च नेता बसवराजू याच्यासह २७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. छत्तीसगडमध्ये अनेक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. सुरक्षा पथकांना मिळत असलेल्या यशामुळे नक्षलवाद्यांची कोंडी झाली आहे.
Comments
Add Comment

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन