गडचिरोलीत चार नक्षलवादी ठार

  71

गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातील कवंडे पोलीस मदत केंद्रापासून जवळ असलेल्या जंगलात चकमक झाली. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिला नक्षलवादी आहेत.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम.रमेश यांच्या नेतृत्वात सी-६० पथकाचे ३०० जवान आणि केंद्रीय राखीव दलाची एक तुकडी गुरुवारी दुपारी कवंडे आणि नेलगुंडा येथून इंद्रावती नदी परिसरात रवाना Penr होती. या सुरक्षा पथकाशी नक्षलवाद्यांची चकमक झाली. चकमकीत दोन पुरुष आणि दोन महिला असे एकूण चार नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा पथकाने घटनास्थळावरुन एक स्वयंचलित रायफल, एक ३०३ रायफल, एक भरमार बंदूक, वॉकीटॉकी आणि इतर साहित्य जप्त केले. याआधी २१ मे रोजी सुरक्षा पथकाने नक्षलवाद्यांचा नेता नंबाला केशव राव उर्फ गगन्ना याच्यासह २७ नक्षलवाद्यांना ठार केले होते.

मागील तीन दिवसांपासून कवंडे आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसात गडचिरोलीचत सुरक्षा पथकांनी नक्षलवाद्यांना दणका दिला. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये करेगुट्टा येथे सुरक्षा पथकाने ३१ नक्षलवाद्यांना ठार केले होते. नंतर अबुझमाडमध्ये नक्षलवाद्यांच्या सर्वोच्च नेता बसवराजू याच्यासह २७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. छत्तीसगडमध्ये अनेक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. सुरक्षा पथकांना मिळत असलेल्या यशामुळे नक्षलवाद्यांची कोंडी झाली आहे.
Comments
Add Comment

Tata Hospital : भारतात टाटा रुग्णालयामध्ये प्रथमच एमआयबीजी पद्धतीचा वापर, न्यूरोब्लास्टोमा रुग्णाचा जीव वाचला...

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून न्यूरोब्लास्टोमा (Neuroblastoma) कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होतं आहे. यापूर्वी अनेक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून