ठाणे महापालिका क्षेत्रात ५१ टक्के नालेसफाई पूर्ण

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईचे काम ५१ टक्के पूर्ण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करण्याचा निर्धार घनकचरा व्यवस्थापन विभागाने केला आहे.


यांत्रिक पद्धतीने होणारी मोठ्या नाल्यांची सफाई ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाली. आता प्रामुख्याने मोठी यंत्रे जाऊ शकत नाही.अशा छोटे नाल्यांचा सफाईचे काम सुरू करण्यात आले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समिती क्षेत्रात छोटे आणि मोठे असे सुमारे २७८ किलोमीटर लांबीचे नाले आहेत. त्यातील मोठ्या नाल्यांची यांत्रिक पद्धतीने बहुतांश सफाई झालेली आहे.


दाट लोकवस्ती असलेल्या भागात जेथे छोटे नाले आहेत तेथे मोठी यंत्रे जाऊ शकत नाहीत. तेथे आता नालेसफाईचे काम सुरू झाले आहे. नालेसफाईच्या कामांची पाहणी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व परिमंडळ उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. नाल्यांतून काढलेला गाळ शक्य तितक्या लवकर हलविण्यात यावा,असे निर्देश या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत.


नियोजित वेळेत नालेसफाईची कामे पूर्ण होतील,असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नालेसफाईबाबतच्या तक्रारींची नोंद घेण्यासाठी प्रभाग समितीनिहाय संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. तेथे येणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्याची सूचना संबंधितांना देण्यात आल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली.

Comments
Add Comment

बँकेचा हप्ता न भरल्यास थेट एआय कॉल करणार

नवी दिल्ली : भारतीय बँकिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच थकीत कर्जाचे प्रमाण ०.५ टक्के किंवा त्याहूनही खाली

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता

१४२ दिवसांच्या योगनिद्रेनंतर जागे होतील श्री हरी विष्णू; 'या' राशींसाठी आहे अत्यंत शुभ काळ!

मुंबई : हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाणारी देवउठनी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी लवकरच येत आहे. या दिवशी

चला हवा येऊ द्या' नंतर निलेश साबळे यांचा नवा अंदाज! महाराष्ट्रातील 'वहिनीं'साठी घेऊन येत आहेत 'वहिनीसाहेब सुपरस्टार' शो

मुंबई: 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोडून बाहेर पडलेले डॉ. निलेश साबळे आता एका नव्या

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात