४ लाखांहून अधिक वाहनधारकांची पाठ!

उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसविण्यास निरुत्साही


विरार :एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही नंबर प्लेट वाहनाला बसविण्याकरिता ३० जूनची अंतिम मुदत आहे असे असले तरी पालघर जिल्ह्यातील वाहनधारकांमध्ये मात्र नंबर प्लेट बसविण्यासाठी निरुत्साहीपणा दिसून येत असून जिल्ह्यातील चार लाखाहून अधिक वाहनधारकांनी अद्याप यासाठी नोंदणीच केली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.



वाहनांची चोरी, गैरवापर टाळण्यासोबतच अपघात झाल्यास संबंधित वाहन मालकाची सर्व माहिती सहजपणे मिळविण्यासाठी एप्रिल २०१९ नंतरच्या सर्व दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना अत्याधुनिक सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यात येत आहेत. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर वितरकाकडूनच ही नंबर प्लेट उपलब्ध करून दिले जाते. मात्र एप्रिल२०१९ पूर्वीच्या वाहनांना अशा प्रकारची नंबर प्लेट बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे वाहनांची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांवर अत्याधुनिक हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्यात येत आहेत.


संपूर्ण देशात ही प्रक्रिया सुरू असून महाराष्ट्रामध्ये ३० एप्रिल २०२५ या तारखेपूर्वी अत्याधुनिक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन असलेली नंबर प्लेट बसविणे अनिवार्य करण्यात आले होते. वाहनधारकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने आता ३० जूनपर्यंत नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. यासाठी सर्वच शहरांमध्ये अधिकृत केंद्र देखील उघडण्यात आलेले आहेत. तसेच वाहनधारकांना स्वतः देखील ऑनलाईन प्रक्रिया करून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट मिळवता येणार आहे.



वाहने ४ लाख ७८ हजार; प्लेट नोंदणी ७० हजार


पालघर जिल्ह्यात एप्रिल २०१९ पूर्वीची ४ लाख ७८ हजार ९३१ वाहने आहेत. त्यापैकी मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ १३ हजार ४६३ वाहनधारकांनी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेटसाठी अर्ज केले होते.


त्यानंतर दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर आता १९ मे पर्यंत ७० हजार ७८८ वाहनधारकांनीच नंबर प्लेटसाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे ४ लाखांहून अधिक वाहनधारकांनी अद्याप नंबर प्लेटसाठी नोंदणी केलेली नाही.


परिणामी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट वाहनांना बसविण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाहनधारकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.




एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसविण्याबाबत आवश्यक जनजागृती करण्यात येत आहे.भविष्यातील दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाहनधारकांनी अधिकृत केंद्रात नोंदणी करावी. आणि वाहनांना नंबर प्लेट बसविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
- अतुल आदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पालघर.


Comments
Add Comment

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार - एकनाथ शिंदे

शिवसेनेतर्फे बुथप्रमुख कार्यशाळा, पदाधिकारी बैठक नाशिक : लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असून बहिणींच्या

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

अरबाज खान झाला बाबा, पत्नी शुरा खानने दिला मुलीला जन्म

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान यांना रविवारी मुलगी झाली. ५८ व्या वर्षी अरबाज

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या

ड्रायव्हरने फरहान अख्तरला घातला १२ लाखांचा गंडा, जाणून घ्या अधिक माहिती...

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याची आई हनी इराणी यांच्या ड्रायव्हरने पेट्रोलच्या नावाखाली तब्बल १२ लाखांचा चुना

'बिग बॉस मराठी ५'चा विजेता सूरज चव्हाण लवकरच विवाहबंधनात

मुंबई : 'बिग बॉस मराठी सीझन ५'चा विजेता सूरज चव्हाणच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतीच कोकण हार्टेड गर्ल