४ लाखांहून अधिक वाहनधारकांची पाठ!

उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसविण्यास निरुत्साही


विरार :एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही नंबर प्लेट वाहनाला बसविण्याकरिता ३० जूनची अंतिम मुदत आहे असे असले तरी पालघर जिल्ह्यातील वाहनधारकांमध्ये मात्र नंबर प्लेट बसविण्यासाठी निरुत्साहीपणा दिसून येत असून जिल्ह्यातील चार लाखाहून अधिक वाहनधारकांनी अद्याप यासाठी नोंदणीच केली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.



वाहनांची चोरी, गैरवापर टाळण्यासोबतच अपघात झाल्यास संबंधित वाहन मालकाची सर्व माहिती सहजपणे मिळविण्यासाठी एप्रिल २०१९ नंतरच्या सर्व दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना अत्याधुनिक सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यात येत आहेत. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर वितरकाकडूनच ही नंबर प्लेट उपलब्ध करून दिले जाते. मात्र एप्रिल२०१९ पूर्वीच्या वाहनांना अशा प्रकारची नंबर प्लेट बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे वाहनांची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांवर अत्याधुनिक हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्यात येत आहेत.


संपूर्ण देशात ही प्रक्रिया सुरू असून महाराष्ट्रामध्ये ३० एप्रिल २०२५ या तारखेपूर्वी अत्याधुनिक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन असलेली नंबर प्लेट बसविणे अनिवार्य करण्यात आले होते. वाहनधारकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने आता ३० जूनपर्यंत नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. यासाठी सर्वच शहरांमध्ये अधिकृत केंद्र देखील उघडण्यात आलेले आहेत. तसेच वाहनधारकांना स्वतः देखील ऑनलाईन प्रक्रिया करून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट मिळवता येणार आहे.



वाहने ४ लाख ७८ हजार; प्लेट नोंदणी ७० हजार


पालघर जिल्ह्यात एप्रिल २०१९ पूर्वीची ४ लाख ७८ हजार ९३१ वाहने आहेत. त्यापैकी मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ १३ हजार ४६३ वाहनधारकांनी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेटसाठी अर्ज केले होते.


त्यानंतर दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर आता १९ मे पर्यंत ७० हजार ७८८ वाहनधारकांनीच नंबर प्लेटसाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे ४ लाखांहून अधिक वाहनधारकांनी अद्याप नंबर प्लेटसाठी नोंदणी केलेली नाही.


परिणामी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट वाहनांना बसविण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाहनधारकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.




एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसविण्याबाबत आवश्यक जनजागृती करण्यात येत आहे.भविष्यातील दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाहनधारकांनी अधिकृत केंद्रात नोंदणी करावी. आणि वाहनांना नंबर प्लेट बसविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
- अतुल आदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पालघर.


Comments
Add Comment

Ranveer Singh : प्रसिद्ध कलाकार होण्यापूर्वी रणवीरसोबत घडला 'हा' घृणास्पद प्रकार

- रणवीरलाही सामोर जावं लागलं 'कास्टिंग काउच'ला मुंबई : बॉलिवूडमध्ये नवख्या कलाकारांना या इंडस्ट्रीत काम

Bigg Boss Marathi 6 : बीग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेची तारीख ठरली ?

मुंबई : बीग बॉस मराठी ६ सीजन वादग्रस्त ठरल्यामुळे सर्वत्र या सीजनची जोरदार चर्चा रंगली असल्याचे पाहायला

सुरु होणार भक्तीचं महापर्व; संत सखुबाई घेणार जलसमाधी

मुंबई : ‘सन मराठी’वरील ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेत प्रेक्षकांना लवकरच एक अत्यंत भावनिक आणि थरारक भाग पाहायला

Sonalee Kulkarni Manjula song : मंजुळा गाण्यातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी महाराष्ट्राची अप्सरा सज्ज

मुंबई : प्रेक्षकांच्या मनावर अप्सरा म्हणून राज्य करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता हटके आणि नव्या अंदाजात

उन्हाळ्यात कोल्डड्रिंक्सऐवजी 'या' आरोग्यवर्धक पदार्थाचं सेवन करा, जाणून घ्या फायदे

उन्हाळ्याचा तडाखा सध्या सर्वत्र जाणवत आहे. अनेकजण उन्हाळ्यात फ्रेश राहण्यासाठी आणि घशाची कोरड घालवण्यासाठी

Cup Bashi Movie : लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार सासू-सुनेची 'ही' कमाल जोडी, 'कप बशी' सिनेमाचं पोस्टर रिलीज

सासू आणि सुनेचं नातं म्हटलं की प्रेम, आदर राग तर कधी रुसुवे फुगवे अशा संमिश्र भावना येतात. लवकरच या नात्यातील एक